शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

नव्या बदलांशी ‘बिबट्या’ जुळवून घेतोय; मात्र अधिवासावरील आक्रमणाने स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 17:41 IST

औरंगाबाद आणि आसपासच्या गावांच्या सीमा  एकच होत आल्यामुळे आता मागे सरकायला प्राण्यांना जागाच उरली नाही.

ठळक मुद्देपूर्व दिशा वगळता इतर तिन्ही बाजूंनी औरंगाबाद शहराला डोंगरांनी वेढलेले आहे. औरंगाबाद परिसरातील डोंगरांत ६० वर्षांपूर्वी होते बिबट्यासह वन्यप्राण्यांचे वास्तव्य

औरंगाबाद : पूर्व दिशा वगळता इतर तिन्ही बाजूंनी औरंगाबाद शहराला डोंगरांनी वेढलेले आहे. अगदी ५०-६० वर्षांपूर्वीही येथील डोंगरांवर दाट वनराई होती. ब्रिटिश रेकॉर्ड आणि त्यानंतरही भारतीय रेकॉर्डनुसार या डोंगरांवर बिबट्यांप्रमाणे इतरही अनेक वन्यप्राणी होते. त्यामुळे औरंगाबादकरांना बिबट्या अजिबातच नवा नाही. मात्र, वन्यजीवांच्या अधिवासावर वाढलेले आक्रमण हीच मोठी चिंता असून, बिबट्यांचे शहरात येणे म्हणजे नव्या बदलांशी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.

काही दिवसांपूर्वी एन-१ या भरवस्तीत आढळलेल्या बिबट्याने औरंगाबादकरांना चांगलेच घाबरवून सोडले. यानंतर मंगळवारी सायंकाळी सातारा डोंगरावर बिबट्या आला होता, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरण अभ्यासकांशी संवाद साधला असता, बिबट्या हा औरंगाबादला कधीच नवा नव्हता. पण २००६ च्या जंगल हक्क कायद्यामुळे जंगलांवर प्रचंड वेगाने झालेल्या अतिक्रमणाचा हा परिपाक आहे, असे मत माजी वन अधिकारी तसेच पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले.

निवृत्त वन अधिकारी राजेंद्र धोंडगे म्हणाले की, ‘पूर्वी हवामान आणि पाणी यादृष्टीने औरंगाबाद अतिशय उत्तम होते. त्यामुळेच मलिक अंबर येथे नहरींद्वारे पाण्याची व्यवस्था करू शकले. १९५०-५५ या काळात जटवाडा भागात खूप बिबटे असायचे. तेथे जाऊन बिबट्यांची शिकार केली जायची आणि शिकार करणाऱ्याच्या धाडसाचे कौतुक होऊन शहरातून त्याची मिरवणूक काढली जायची. मात्र, लोेकसंख्या वाढत गेली, तसतसे बिबट्यांसह सगळेच प्राणी मागे- मागे सरकू लागले. त्यांना त्यांचे भक्ष मिळायचे, त्यामुळे ते तेथे निवांत असायचे. पण आता जालना, खुलताबाद, फुलंब्री, बिडकीनपर्यंत औरंगाबाद शहर विस्तारले. या प्राण्यांचा अधिवास कमी झाला. केक कापल्याप्रमाणे औरंगाबाद लगतचे डोंगर पोखरले जात आहेत. औरंगाबाद आणि आसपासच्या गावांच्या सीमा  एकच होत आल्यामुळे आता मागे सरकायला प्राण्यांना जागाच उरली नाही. त्यामुळे मग ते मानवी वस्तीत येऊन खाद्य शोधू लागले आहेत. हे प्राण्यांनी स्वीकारलेले ‘अ‍ॅडॉप्शन’ असून, नव्या व्यवस्थेत ते स्वत:ला सामावून घेत आहेत.’ 

वनहक्क कायद्याने अतोनात नुकसान२००६ ला केंद्र सरकारने वनहक्क कायदा केला. या अंतर्गत २००५ पर्यंत ज्यांचे जंगलात बेकायदेशीर अधिवास असतील, ते सर्व अधिवास आणि अतिक्रमण नियमित करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणावरील अवैध अतिक्रमणे नियमित झाली. आजच्या घडीला राजकारण्यांकडूनही ‘वोट बँक’ च्या दृष्टीने या कायद्याचे समर्थन केले जात आहे. पण यामुळे जंगले, वन्यजीव आणि जैवविविधता यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या कायद्यामुळे जंगलातील सुरक्षितता संपली, नैसर्गिक शांतता भंगली आणि मानवी वस्तीत प्राणी येण्यास सुरुवात झाली. तरी मुंबई- पुण्याच्या तुलनेत औरंगाबादला बऱ्याच उशिरा या गोष्टी सुरू झाल्या.- राजेंद्र धोंडगे, निवृत्त वन अधिकारी

अन्नसाखळी निर्माण करावीमराठवाड्यात ३ टक्के जंगल आहे, असे वन विभागाकडून सांगितले जाते. पण प्रत्यक्षात ते दीड टक्क्यांपेक्षाही कमी आहे. भक्ष्य कमी झाल्याने वन्यजीव शहरी भागात येत आहेत. वन विभागाने त्यांच्या जमिनीत झाडे तर लावलीच पाहिजेत, पण जाणीवपूर्वक अन्नसाखळीही तयार केली पाहिजे. नागपूर- मुंबई तीन महामार्ग उपलब्ध असताना नव्या समृद्धी महामार्गाची गरज नाहीच. १ लाखाच्या आसपास झाडे यासाठी तोडली असून, मोठ्या प्रमाणावर जैवविविधता नष्ट झाली आहे. डीएमआयसीमध्येही २४ खेडी घेतली गेली. यातील शेतजमिनी नष्ट झाल्या आणि जैवविविधता संपली. - प्रा. विजय दिवाण, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादleopardबिबट्याforestजंगल