शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

Ganesh Festival 2019 : बदलता गणेशोत्सव आणि सामाजिक पर्यावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 10:28 IST

गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले.

यादव तरटे पाटील

अमरावती - गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. मात्र, या गणेशोत्सवाचे स्वरूप आणि त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलला आहे. काही अपवाद वगळता या उत्सवाच्या उपयुक्ततेकडे आपले सपशेल दुर्लक्ष झाले आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा शिरकाव होय. त्यातून निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या समस्या म्हणजे एक वेगळेच आवाहन आपल्या समोर निर्माण झाले आहे. सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकॉल आणि विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर तसेच रासायनिक रंगाचा वापर, अतिरेकी गुलाल उधळण या सर्व प्रकारामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

ज्या भावनेतून गणेशोत्सवाची निर्मिती झाली त्याच समाजाचे आरोग्यही यातून धोक्यात येत आहे. आपल्या अतिशय महत्त्वाच्या मुख्य गरजा म्हणजे प्राणवायू, प्राणी आणि अन्न... आणि याच नेमक्या धोक्यात येत आहेत. गणेशोत्सवातून होणारे जल, ध्वनी आणि हवेचे प्रदूषण यामुळे केवळ आपलेच नाही तर पृथ्वीचे आरोग्यसुद्धा धोक्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पाण्यात न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्ती आपल्याला दिसतात. हे बघून कोण्याही गणेशभक्ताचे मन उद्विग्न झाल्याशिवाय राहणार नाही.

रासायनिक रंग अधिक भयंकर

रासायनिक रंगांनी मूर्ती रंगवल्या जातात हे अधिक भयंकर वास्तव आहे. जल, ध्वनि प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतो आहे.मूत्रसंस्थेचे कार्य, डोळ्यांचे विकार, कर्करोग तर अनेक त्वचेचे आजारदेखील यातून संभवतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पाणी प्रदूषित होतेच. शिवाय मातीचा पोतही खराब होतो.

(लेखक दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत)

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवenvironmentपर्यावरण