शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
3
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
4
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
5
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
6
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
7
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
8
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
9
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
10
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
11
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
12
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
13
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
14
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
15
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
16
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
17
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
18
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
19
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
20
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

Ganesh Festival 2019 : श्री गणेश विसर्जनानंतर नागरिकांची कर्तव्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 09:44 IST

विसर्जनाची मिरवणूक रस्त्याने जाताना अनेक नागरिक आपल्या मूर्ती विसर्जनासाठी ट्रकमध्ये देतात.

- सुजाता देशपांडे

जळगाव : गणेश स्थापनापूजन हे सर्वत्र उत्साहात पार पडते. विसर्जनाच्या मिरवणुकीतही जल्लोष असतो. हे सर्व पार पडल्यावर शहराचे रंगरूप बरेच बदलते. पाहुणा गेल्यावर घरात पसारा असतो. तसेच शहराचेही स्वरूप असते; पण नागरिकांनी जबाबदारी घेतली तर शहर लवकर पूर्वस्थितीत येऊ शकते.

विसर्जनाची मिरवणूक रस्त्याने जाताना अनेक नागरिक आपल्या मूर्ती विसर्जनासाठी ट्रकमध्ये देतात. मूळ मूर्तीची आणि आलेल्या मूर्तींची फुले, हार, दूर्वा रस्त्यांवर पडतात. शिवाय उत्सव संपल्यावर मंडप तोडले जातात. दहा दिवस जनता दर्शनासाठी गर्दी करते. मोठ्या प्रमाणावर हार, दूर्वा, फुले त्या-त्या मंडपाजवळ पडलेले असतात. हे सर्व नागरिकांनी निदान आसपासचे तरी गोळा करावे, अशी फुले, दूर्वा आपापल्या बागेत टाकून जमिनीत जिरवावी. शक्य नसेल तर मनपाच्या निर्माल्य कलशात टाकावे. यामुळे स्वच्छता व भावनांचा सन्मान दोन्ही होईल.

रस्त्यावर गुलालही मुबलक प्रमाणात असतो. आपल्या परिसरातील गुलाल गोळा करून मनपाच्या गाडीत टाकला तर खूपच मोठी देशसेवा होईल. विसर्जनाच्या ठिकाणी प्लास्टिकच्या अनेक सजावटी वस्तू पसरलेल्या असतात. त्या गोळा करून मनपाच्या कुंडीत टाकाव्यात. 

गणेशोत्सवात प्लास्टिकचा वापर तर करायलाच नको. मात्र, जर होत असेल तर विसर्जनावेळी झालेली सर्व घाण ही साफ केलीच पाहिजे, तसेच प्लास्टिक नदीत जाणार नाही याची काळजीदेखील घेतली पाहिजे. गणेशोत्सव हा मांगल्याचा उत्सव आहे, त्याचे मांगल्य टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचा -हास होणार नाही याची काळजी घेणे ही सर्व भक्तांची जबाबदारी आहे. 

विसर्जनाच्या ठिकाणी... : जिथे विसर्जन होते तिथे नागरिकांच्या सहकार्याची खूपच आवश्यकता आहे. या ठिकाणी नागरिकांनी गट करून विसर्जनाच्या ठिकाणी नारळ, नारळाच्या कवट्या, शेंड्या इतरत्र पसरलेल्या असतात. नारळाचे खोबरे काढून तलावात टाकले तर हे खोबरे माशांना अन्न म्हणून उपयोगी ठरते.  कुंकू व हळदीपासून तयार झालेल्या अक्षता पाण्यात टाकल्यास पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे गणेशभक्तांनी हे टाळायला हवे. 

घंटागाड्यांचा वापर करावागणेशभक्तांनी निर्माल्य तलावात किंवा नदीत टाकू नये. रस्त्याच्या कडेला सजावटीचे प्लास्टिक सामान, मिरवणुकीतील भक्तांचे पाणी प्यायचे पेले, प्रसादाच्या वाट्या या गोष्टी गोळा करून मनपाच्या घंटागाडीतच टाकाव्यात.

आरोग्यासाठी घातक !गुलालाचे कण येणाऱ्या वाहनांमुळे आणि हवेमुळे वातावरणात पसरतात यामुळे श्वसनाद्वारे शरीरात जाऊ शकतात जे आरोग्यासाठी घातक आहे. 

(लेखिका जळगाव येथील भारती पर्यावरण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत.)

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरणJalgaonजळगाव