शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

Ganesh Festival 2019 : श्री गणेश विसर्जनानंतर नागरिकांची कर्तव्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 09:44 IST

विसर्जनाची मिरवणूक रस्त्याने जाताना अनेक नागरिक आपल्या मूर्ती विसर्जनासाठी ट्रकमध्ये देतात.

- सुजाता देशपांडे

जळगाव : गणेश स्थापनापूजन हे सर्वत्र उत्साहात पार पडते. विसर्जनाच्या मिरवणुकीतही जल्लोष असतो. हे सर्व पार पडल्यावर शहराचे रंगरूप बरेच बदलते. पाहुणा गेल्यावर घरात पसारा असतो. तसेच शहराचेही स्वरूप असते; पण नागरिकांनी जबाबदारी घेतली तर शहर लवकर पूर्वस्थितीत येऊ शकते.

विसर्जनाची मिरवणूक रस्त्याने जाताना अनेक नागरिक आपल्या मूर्ती विसर्जनासाठी ट्रकमध्ये देतात. मूळ मूर्तीची आणि आलेल्या मूर्तींची फुले, हार, दूर्वा रस्त्यांवर पडतात. शिवाय उत्सव संपल्यावर मंडप तोडले जातात. दहा दिवस जनता दर्शनासाठी गर्दी करते. मोठ्या प्रमाणावर हार, दूर्वा, फुले त्या-त्या मंडपाजवळ पडलेले असतात. हे सर्व नागरिकांनी निदान आसपासचे तरी गोळा करावे, अशी फुले, दूर्वा आपापल्या बागेत टाकून जमिनीत जिरवावी. शक्य नसेल तर मनपाच्या निर्माल्य कलशात टाकावे. यामुळे स्वच्छता व भावनांचा सन्मान दोन्ही होईल.

रस्त्यावर गुलालही मुबलक प्रमाणात असतो. आपल्या परिसरातील गुलाल गोळा करून मनपाच्या गाडीत टाकला तर खूपच मोठी देशसेवा होईल. विसर्जनाच्या ठिकाणी प्लास्टिकच्या अनेक सजावटी वस्तू पसरलेल्या असतात. त्या गोळा करून मनपाच्या कुंडीत टाकाव्यात. 

गणेशोत्सवात प्लास्टिकचा वापर तर करायलाच नको. मात्र, जर होत असेल तर विसर्जनावेळी झालेली सर्व घाण ही साफ केलीच पाहिजे, तसेच प्लास्टिक नदीत जाणार नाही याची काळजीदेखील घेतली पाहिजे. गणेशोत्सव हा मांगल्याचा उत्सव आहे, त्याचे मांगल्य टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचा -हास होणार नाही याची काळजी घेणे ही सर्व भक्तांची जबाबदारी आहे. 

विसर्जनाच्या ठिकाणी... : जिथे विसर्जन होते तिथे नागरिकांच्या सहकार्याची खूपच आवश्यकता आहे. या ठिकाणी नागरिकांनी गट करून विसर्जनाच्या ठिकाणी नारळ, नारळाच्या कवट्या, शेंड्या इतरत्र पसरलेल्या असतात. नारळाचे खोबरे काढून तलावात टाकले तर हे खोबरे माशांना अन्न म्हणून उपयोगी ठरते.  कुंकू व हळदीपासून तयार झालेल्या अक्षता पाण्यात टाकल्यास पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे गणेशभक्तांनी हे टाळायला हवे. 

घंटागाड्यांचा वापर करावागणेशभक्तांनी निर्माल्य तलावात किंवा नदीत टाकू नये. रस्त्याच्या कडेला सजावटीचे प्लास्टिक सामान, मिरवणुकीतील भक्तांचे पाणी प्यायचे पेले, प्रसादाच्या वाट्या या गोष्टी गोळा करून मनपाच्या घंटागाडीतच टाकाव्यात.

आरोग्यासाठी घातक !गुलालाचे कण येणाऱ्या वाहनांमुळे आणि हवेमुळे वातावरणात पसरतात यामुळे श्वसनाद्वारे शरीरात जाऊ शकतात जे आरोग्यासाठी घातक आहे. 

(लेखिका जळगाव येथील भारती पर्यावरण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत.)

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरणJalgaonजळगाव