शहरं
Join us  
Trending Stories
1
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
2
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
3
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
4
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
5
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
6
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
7
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
8
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
9
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
10
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
11
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
12
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
13
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
14
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
15
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
16
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
17
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
18
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
20
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

पर्यावरण कायदे धाब्यावर बसवून नवा महाबळेश्वर प्रकल्प उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 07:14 IST

सह्याद्रीच्या पठारावरील सातारा तालुक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५ गावे व पाटण तालुक्यातील २९, अशा ५२ गावांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला होता.

प्रगती जाधव-पाटील सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कास व कोयना जागतिक वारसा स्थळ, तसेच प्रस्तावित पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोनच्या मर्यादा असताना, सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाने तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा डोके वर काढले आहे. शासनाने हा प्रकल्प राबविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. पर्यावरणविषयक कायदे धाब्यावर बसवून होऊ घातलेला हा विकास निसर्गाचा विध्वंस असल्याचे सांगत पश्चिम महाराष्ट्रातील पर्यावरण अभ्यासकांनी पुन्हा लढ्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

सह्याद्रीच्या पठारावरील सातारा तालुक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५ गावे व पाटण तालुक्यातील २९, अशा ५२ गावांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला होता. सुमारे ६७८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात विमानतळासहित पर्यटनासाठी सर्व पंचतारांकित सुविधा निर्माण करण्यात येणार होत्या. पर्यावरणविषयक अभ्यासकांच्या तीव्र विरोधामुळे राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारला हा प्रकल्प गुंडाळावा लागला होता. राज्यातील भाजप-सेना सरकारने या प्रकल्पाला पुन्हा हवा दिली आहे. तशी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. नियोजित प्रकल्पाचे क्षेत्र पश्चिम घाटातील आहे. पश्चिम घाट परिसराला जगातील महाजैविक विविधता केंद्र (ग्लोबल मेगाबायोडायव्हर्सिटी सेंटर) व हॉट स्पॉट रिजन मानले जाते. पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगेत अनेक दुर्मिळ, संकटग्रस्त, इंडेमिकन वनस्पती व प्राण्यांचे वास्तव्य आहे. यामुळे हा भूप्रदेश पर्यावरण व जैविक विविधतेच्या दृष्टीने अति संवेदनशील मानला जातो. त्यामुळे अशा संवेदनशील भूप्रदेशावर मानवी हस्तक्षेप थांबवणे आवश्यक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

३७ हजार २५८ हेक्टर क्षेत्रनवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्प ३७ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर साकारण्याचा सरकारचा इरादा आहे. सातारा तालुक्यातील चाळकेवाडी, ठोसेघर, चिखली, धावली, जांभे, केळवली, जावळीतील वासोटा, कास, कसबे बामणोली, म्हावशी, मुनावळे, कसबे बामणोली, पाटण तालुक्यातील चिरंबे, कारवट, नहिंबे, दास्तान, कुसावडे, रासाटी, बाजे, काठी, नानेल, गोजेगाव, बाजेगाव, केर आदी प्रमुख गावांचा या नियोजित प्रकल्पात समावेश आहे.

नैसर्गिक ‘कॉरिडॉर’ नष्ट होतीलप्रकल्प क्षेत्रावरील पठारे सलगपणे कासपासून कोयनानगरपर्र्यंत पसरली आहेत. या पठारांच्या उतारांवर दाट जंगले आहेत. या पठारांचा उपयोग वन्यजीव स्थलांतर करण्यासाठी करतात. अशा ठिकाणी पर्यटन विकास प्रकल्प राबविल्यास मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक ‘कॉरिडॉर’ नष्ट होतील. त्यांच्या नैसर्गिक जीवनावर विपरीत परिणाम होऊन हे प्राणी मानवी वस्त्यांकडे वळतील, अशी भीती साताऱ्यातील मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.पर्यावरणीय कायदे पायदळी : कासचं पठार, कोयना अभयारण्य नैसर्गिक वारसास्थळे आहेत. मानवी अतिक्रमणामुळे वारसास्थळाचा दर्जा काढून घेतला जाऊ शकतो. याच भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. त्याचे झालर क्षेत्र (बफर झोन) या पठारी डोंगरी भागात मोडते. त्यामुळे विविध पर्यावरणीय कायदे पायदळी तुडवले जाणार आहेत. हा ºहास रोखण्यासाठी प्रकल्पाला विरोधच राहील, असे ‘ड्रोंगो’ या पर्यावरणवादी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे यांनी सांगितले.पर्यटनाच्या नावाखाली महाबळेश्वर-पाचगणी याठिकाणी निसर्ग व पर्यावरणाची अतोनात हानी झाली असल्याने ही ठिकाणे अबाधित राहावीत, म्हणून त्यांना कायद्याचे संरक्षण आहे. ही कायदेशीर अडचण निर्माण झाल्याने कोयना खोºयात शिवसागर जलाशयाच्या पूर्वेकडील काठावर नवीन गिरिस्थान प्रकल्प उभारून नवा लवासा, आंबे व्हॅली उभारण्याचा सरकारचा इरादा दिसतो. -प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर, निसर्ग अभ्यासक, कोल्हापूर

टॅग्स :environmentपर्यावरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान