शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 01:23 IST

समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे.

कांदळवने ही निसर्गाने पृथ्वीला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पृथ्वीवरील सजीवांसाठी प्राणवायू निर्माण करण्यासोबतच ती प्रदूषित पाण्यालाही स्वच्छ करतात. वातावरणातील वाढलेला कार्बन शोषून घेऊन ही कांदळवने मासे, झिंगे, खेकडे यांना खाद्य तसेच सुरक्षाकवच पुरवितात. वादळासारख्या आपत्तींमध्ये तर कांदळवने चक्क ढाल बनून वादळाचा आवेग कमी करण्याचे तसेच त्यांना आत येण्यापासून रोखण्याचे काम करतात. एवढे सर्व करूनही माणूस मात्र ‘विकासाच्या’ नावाखाली या कांदळवनांचा सतत ºहासच करीत राहिला.

आमची समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे. कांदळवनांसोबतच समुद्री प्रवाळ, किनाºयावरील पाणथळ जागा यांच्यावरही माणसाने आज आक्रमण केले आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होणे, समुद्राच्या पाण्याच्या आम्लधर्मात बदल होणे व समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढणे, यासारख्या भयावह गोष्टी घडून आल्या आहेत. त्यामुळे आज पृथ्वीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून आता आमच्या परिसंस्थांच्या होणाºया ºहासावर पूर्णत: निर्बंध लादले पाहिजेत.

या परिसंस्थांची बिघडलेली स्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागेल. समुद्री किनाºयावर ºहास झालेल्या जागी कांदळवनांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी लागेल. समुद्री किनाºयावर येऊ घातलेल्या विकास प्रकल्पांवर आता निर्बंध घातले पाहिजेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणाºया वाढीकडे पूर्णत: दुर्लक्ष करून प्रस्तावित केलेले नवी मुंबई विमानतळ, मुंबईचा समुद्री किनाºयालगतचा महामार्ग (कोस्टल रोड), भुयारी मेट्रो-३ प्रकल्प या घातक प्रकल्पांवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.            -देबी गोएंका,कार्यकारी ट्रस्टी,  कॉन्झर्व्हेशन एक्शन ट्रस्ट, मुंबई

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण