शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी प्रक्रिया विना थेट जाते ‘वेण्णा’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:01 IST

जलप्रदूषणासोबतच नदीतील जैवविविधतेचाही ऱ्हास

ठळक मुद्देप्रक्रिया प्रकल्प आकाराला येईना

- प्रगती जाधव-पाटील, सचिन काकडेसातारा : साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी वेण्णा नदीत सोडले जात असल्याने नदीसह परिसरातील शेती आणि माणसांचेही आरोग्य बिघडत चालले आहे. सांडपाण्यामुळे जलप्रदूषणासोबतच जैवविविधतेचा ºहास मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा पालिकेच्या स्थापनेला तब्बल १६५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही पालिकेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही.  

सातारा शहराच्या परिसरात कोठेही नदी अथवा मोठा तलाव नाही. त्यामुळे शहराच्या पाण्याची गरज पूर्ण करण्याकरिता प्रारंभी हौदांची उभारणी केली. एकेकाळी शहराला हौदांचे शहर म्हणूनही ओळखले जायचे. संपूर्ण शहराला या हौदांमार्फतच पिण्यासह दैनंदिन कामासाठी पाणीपुरवठा केला जात असे. कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेला अन् त्याच गतीने लोकसंख्याही. शहरीकरणामुळे पाण्याची उणीव भरून काढण्यासाठी कास तलावाची उभारणी करण्यात आली. खापरी नळांच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा केला जाऊ लागला. पुढे खापरी नळाची जागा बंदिस्त पाईपलाईनने घेतली. सध्या कास योजनेतून शहराला दररोज ५.५० लाख लिटर तर शहापूर योजनेच्या माध्यमातून ७.५० लाख लिटर असा एकूण १३ लाख लिटर पाणीपुरवठा पालिकेमार्फत केला जात आहे.

शहराची एकूण लोकसंख्या १ लाख २० हजार इतकी आहे. यापैकी सुमारे ७० हजार नागरिकांना पालिकेडून तर उर्वरित नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरविले जाते. पालिकेमार्फत प्रतिमाणसी १२५ लिटर तर एका कुटुंबाला सरासरी ५०० लिटर इतका पाणीपुरवठा दररोज केला जातो. एकूण पाण्याचा वापर पाहता तब्बल ८० टक्के पाणी  शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने यासह इतर कामकाजासाठी वापरले जाते. हे सांडपाणी बंदिस्त ड्रेनेजच्या माध्यमातून नाले व ओढ्यांमार्फत पुढे वेण्णा नदीत सोडले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेकडून सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. 

सातारा पालिकेने यंदा भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्णत्वास येताच शहरात दोन ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरायोग्य केले जाणार आहे. मात्र सध्या या सांडपाण्यामुळे नदीतील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे. दूषित पाण्यामुळे माशांची नैसर्गिक रचना, रंग बदलत चालला आहे. पूर्वी वेण्णा नदीत काळसर चकचकीत रंगाचे मासे आढळून येत असत. आता निळसर रंगाचे मासे आढळून येतात. त्यांच्या आकारमानातही बदल झाला आहे. नदीत केंजळ व शैवाळाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे माशांचे जैविक खाद्य नष्ट होत चालले आहे. पूर्वी नदीकाठी लहान आकाराचे गवत आढळून यायचे. ही गवती रानं आता घटू लागली आहेत. 

आरोग्य बिघडले माणसांचे : सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने वर्षभरात नदीकाठच्या तसेच खेड, सदर बझार, लक्ष्मी टेकडी, संगममाहुली, वर्ये या भागात कावीळ, डायरिया तसेच त्वचारोगांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.

आणि शेतीचेही : सातारा तालुक्यातील संगममाहुली येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम झाला आहे. वेण्णा नदीच्या पाण्यावर सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टर शेतीक्षेत्र अवलंबून आहे. नदीकाठी वसलेल्या बहुतांश गावांमध्ये स्वत:च्या पाणीयोजना आहेत. मात्र, शेती पूर्णपणे या नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. ५० ते ६० टक्के  शेतकरी या पाण्यावर भाजीपाला पिकवितात. आधीच दूषित पाणी, त्यात रासायनिक औषधांची भर पडत असल्याने शेती आणि माणसांचेही आरोग्य बिघडत आहे. 

वाढत्या जलप्रदूषणाचा जितका प्रभाव जलचरांवर, जैवविविधतेवर पडत आहे तितकाच मनुष्यावरदेखील होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो लिटर सांडपाणी दररोज वेण्णा नदीला मिळत आहे. जलप्रदूषण रोखणे गरजेचे आहे. असे न झाल्यास भविष्यात पर्यावरणाची प्रचंड हानी होईल, शिवाय मनुष्याचे अस्तित्वही धोक्यात येईल.  

- सुधीर सुकाळे, पर्यावरणतज्ज्ञ, सातारा

जलप्रदूषण रोखणे ही काळाची गरज ओळखून सातारा पालिकेने भुयारी गटार योजना आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. ही योजना लवकरच मार्गी लागेल. भविष्यात भेडसावणारी जलप्रदूषणाची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.  - विशाल जाधव, आरोग्य सभापती, सातारा नगरपालिका 

टॅग्स :Waterपाणीriverनदीpollutionप्रदूषण