शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी प्रक्रिया विना थेट जाते ‘वेण्णा’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:01 IST

जलप्रदूषणासोबतच नदीतील जैवविविधतेचाही ऱ्हास

ठळक मुद्देप्रक्रिया प्रकल्प आकाराला येईना

- प्रगती जाधव-पाटील, सचिन काकडेसातारा : साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी वेण्णा नदीत सोडले जात असल्याने नदीसह परिसरातील शेती आणि माणसांचेही आरोग्य बिघडत चालले आहे. सांडपाण्यामुळे जलप्रदूषणासोबतच जैवविविधतेचा ºहास मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा पालिकेच्या स्थापनेला तब्बल १६५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही पालिकेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही.  

सातारा शहराच्या परिसरात कोठेही नदी अथवा मोठा तलाव नाही. त्यामुळे शहराच्या पाण्याची गरज पूर्ण करण्याकरिता प्रारंभी हौदांची उभारणी केली. एकेकाळी शहराला हौदांचे शहर म्हणूनही ओळखले जायचे. संपूर्ण शहराला या हौदांमार्फतच पिण्यासह दैनंदिन कामासाठी पाणीपुरवठा केला जात असे. कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेला अन् त्याच गतीने लोकसंख्याही. शहरीकरणामुळे पाण्याची उणीव भरून काढण्यासाठी कास तलावाची उभारणी करण्यात आली. खापरी नळांच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा केला जाऊ लागला. पुढे खापरी नळाची जागा बंदिस्त पाईपलाईनने घेतली. सध्या कास योजनेतून शहराला दररोज ५.५० लाख लिटर तर शहापूर योजनेच्या माध्यमातून ७.५० लाख लिटर असा एकूण १३ लाख लिटर पाणीपुरवठा पालिकेमार्फत केला जात आहे.

शहराची एकूण लोकसंख्या १ लाख २० हजार इतकी आहे. यापैकी सुमारे ७० हजार नागरिकांना पालिकेडून तर उर्वरित नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरविले जाते. पालिकेमार्फत प्रतिमाणसी १२५ लिटर तर एका कुटुंबाला सरासरी ५०० लिटर इतका पाणीपुरवठा दररोज केला जातो. एकूण पाण्याचा वापर पाहता तब्बल ८० टक्के पाणी  शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने यासह इतर कामकाजासाठी वापरले जाते. हे सांडपाणी बंदिस्त ड्रेनेजच्या माध्यमातून नाले व ओढ्यांमार्फत पुढे वेण्णा नदीत सोडले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेकडून सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. 

सातारा पालिकेने यंदा भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्णत्वास येताच शहरात दोन ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरायोग्य केले जाणार आहे. मात्र सध्या या सांडपाण्यामुळे नदीतील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे. दूषित पाण्यामुळे माशांची नैसर्गिक रचना, रंग बदलत चालला आहे. पूर्वी वेण्णा नदीत काळसर चकचकीत रंगाचे मासे आढळून येत असत. आता निळसर रंगाचे मासे आढळून येतात. त्यांच्या आकारमानातही बदल झाला आहे. नदीत केंजळ व शैवाळाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे माशांचे जैविक खाद्य नष्ट होत चालले आहे. पूर्वी नदीकाठी लहान आकाराचे गवत आढळून यायचे. ही गवती रानं आता घटू लागली आहेत. 

आरोग्य बिघडले माणसांचे : सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने वर्षभरात नदीकाठच्या तसेच खेड, सदर बझार, लक्ष्मी टेकडी, संगममाहुली, वर्ये या भागात कावीळ, डायरिया तसेच त्वचारोगांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.

आणि शेतीचेही : सातारा तालुक्यातील संगममाहुली येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम झाला आहे. वेण्णा नदीच्या पाण्यावर सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टर शेतीक्षेत्र अवलंबून आहे. नदीकाठी वसलेल्या बहुतांश गावांमध्ये स्वत:च्या पाणीयोजना आहेत. मात्र, शेती पूर्णपणे या नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. ५० ते ६० टक्के  शेतकरी या पाण्यावर भाजीपाला पिकवितात. आधीच दूषित पाणी, त्यात रासायनिक औषधांची भर पडत असल्याने शेती आणि माणसांचेही आरोग्य बिघडत आहे. 

वाढत्या जलप्रदूषणाचा जितका प्रभाव जलचरांवर, जैवविविधतेवर पडत आहे तितकाच मनुष्यावरदेखील होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो लिटर सांडपाणी दररोज वेण्णा नदीला मिळत आहे. जलप्रदूषण रोखणे गरजेचे आहे. असे न झाल्यास भविष्यात पर्यावरणाची प्रचंड हानी होईल, शिवाय मनुष्याचे अस्तित्वही धोक्यात येईल.  

- सुधीर सुकाळे, पर्यावरणतज्ज्ञ, सातारा

जलप्रदूषण रोखणे ही काळाची गरज ओळखून सातारा पालिकेने भुयारी गटार योजना आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. ही योजना लवकरच मार्गी लागेल. भविष्यात भेडसावणारी जलप्रदूषणाची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.  - विशाल जाधव, आरोग्य सभापती, सातारा नगरपालिका 

टॅग्स :Waterपाणीriverनदीpollutionप्रदूषण