शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

2019 ठरलं 'सुपर हॉट', 1901 नंतर भारतातील सातवं उष्ण वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 11:19 IST

कार्बन डायऑक्साइड आणि अन्य ग्रीनहाउस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.

ठळक मुद्देकार्बन डायऑक्साइड आणि अन्य ग्रीनहाउस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.हवामान बदलामुळे २०१९ देखील सातवे उष्ण वर्ष ठरल्याची नोंद करण्यात आली आहे.२०१९ साली सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविण्यात आले.

मुंबई - कार्बन डायऑक्साइड आणि अन्य ग्रीनहाउस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्याचप्रमाणे, हवामानातील बदलांमुळेही प्रादेशिक स्तरावर तापमानात बदल होतात. अशाच काहीशा हवामान बदलामुळे २०१९ देखील सातवे उष्ण वर्ष ठरल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने सोमवारी (6 जानेवारी) दिली.

तापमानवाढीची सर्वाधिक नोंद अंटार्क्टिक प्रदेशात होत आहे. या प्रदेशात बर्फाचे वितळणे वर्षभर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. त्याचबरोबर, अंटार्क्टिक प्रदेशातील बर्फाचा थर कमी होत गेल्याचेही आढळून आले आहे. जगाच्या अनेक भागांत या वर्षात उष्णतेची लाट, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ अशा परस्परविरोधी घटना अनुभवायला मिळाल्या. भारतातसुद्धा या वर्षी उत्तर भारतासह दक्षिण भारतातदेखील महापूर आला आहे. तापमान वाढीने तर कहर केला.

२०१९ साली सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविण्यात आले. १९०१ सालापासून ही नोंद घेण्यात येत आहे. यापूर्वी २०१६ साल हे देशात उष्ण म्हणून नोंदविण्यात आले होते. तापमानवाढीची ही नोंद +०.३६ एवढी असून, महापूर, चक्रीवादळे हे त्याचे परिणाम आहेत. भारतीय समुद्रात या वर्षी ८ चक्रीवादळे आली असून, देशात या वर्षी ११० टक्के एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे.

२०१८

१९५१ ते १९८० या ३० वर्षांतील तापमानाची सरासरी काढल्यास, त्यापेक्षा २०१८ मध्ये पृथ्वीचे तापमान नासाच्या मते ०.८३ अंस सेल्सिअसने अधिक नोंदविले गेले.

तीन वर्षे

२०१५, २०१६ व २०१७ या तीन वर्षांपेक्षा २०१८चे तापमान किंचित कमी असले, तरी गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास २०१८ हे सर्वात तप्त वर्ष ठरले.

१ अंश वाढ

१८८० पासून जागतिक सरासरी तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारी

अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'!

JNU Attack : गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगी

JNU Attack: 'बुरखा घालून काळोखात हल्ले करणं म्हणजे मर्दानगी नाही'

फिर एक बार मुख्यमंत्रिपदी केजरीवाल; तब्बल ७० टक्के दिल्लीकरांची पसंती

 

टॅग्स :IndiaभारतTemperatureतापमानenvironmentपर्यावरण