शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

चौथीपर्यंतची वर्गवेळ बदलण्यामागचे लॉजिक काय ? 

By सीमा महांगडे | Updated: June 24, 2024 06:20 IST

सर्व माध्यमांचे चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.

राज्यात चालू शैक्षणिक वर्षापासून सर्व संस्थांमधील, सर्व माध्यमांचे चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला; मात्र त्याला राज्यातील अनेक शाळांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे ज्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी शक्य नाही, ज्या निर्णयाबद्दल मतमतांतरे आणि संदिग्धता आहे, असे निर्णय शिक्षण विभाग का घेतो, असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय, अलीकडे एखाद्या निर्णयावर संबंधितांच्या हरकती, सूचना मागविल्या जातात आणि मग निर्णय घेतला जातो, तसे या निर्णयाबाबत का केले गेले नाही हाही प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला खरंच 'थिंक टैंक'ची आवश्यकता आहे. विद्यार्थी हा प्रयोग करण्याची बाब नाही, याची जाणीव म्हणूनच शिक्षण विभागाला करून द्यायला हवी.

शाळांच्या वेळेत बदल या विषयावर सुरुवातीपासून बराच वाद झाला. निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत अनेक तांत्रिक मुद्देही उपस्थित करण्यात आले. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस चालकांनीही या निर्णयाला विरोध केला होता. शैक्षणिक वर्ष सुरू होताना काही शाळांनी वेळेत बदल केला आहे, तर काही शाळांनी पालकांशी चर्चा करून वेळ ठरवली. काही शाळांनी मात्र या निर्णयाचे पालन केलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुळात लहान मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याची सूचना केली आहे. राज्यपालांची सूचना असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व असले तरी सध्या संपूर्ण महाराष्ट्राची शैक्षणिक पाहणी केली असता असे जाणवते की, आजही महाराष्ट्रामध्ये बहुतांश शाळांसाठी पुरेशा इमारती नाहीत. ज्या शाळांमध्ये इमारती आहेत त्या शाळांमध्ये बालवाडीपासून ते दहावी, बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. आपली लोकसंख्या पाहता सर्व शाळांमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे असलेल्या इमारतीमध्ये एका शिफ्टमध्ये हे संपूर्ण वर्ग आयोजित करता येत नाहीत, म्हणून शाळांच्या वेळा दोन शिफ्टमध्ये केलेल्या आहेत. हेही विचारात घेणे गरजेचे आहे. एकवेळ प्राथमिक शाळांची वेळ दुपारी ठेवा आणि माध्यमिक विभाग सकाळी अशी विभागणी करता येणे शक्य आहे, मात्र त्या ९ किंवा १० नंतर ठेवा हे अजिबात न पटण्यासारखे आहे.

शाळांच्या वेळा घड्याळी तासाप्रमाणे साडेपाच तास असणे गरजेचे आहे. या नियमानुसार त्या रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार का? याचा विचार निर्णयाच्या आधी झाला का? निर्णयाच्या आधी शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा, विद्यार्थी संख्येनुसार इमारती, शिक्षक याची चाचपणी करायला नको का? या सगळ्यांची नीट घडी बसवून मगच शिक्षण विभागाने अशा निर्णया कार्यवाही करणे आवश्यक आहे. मुळात इतक्या वर्षांत शाळांच्या वेळांचे महत्त्व जाणवले नाही का? हा विषय अचानक प्राधान्य क्रमावर का आला? शाळांचा दर्जा, गुणवत्ताधारक शिक्षक, शाळेतील सुविधा, पुरेशी शिक्षक संख्या या विषयांना प्राधान्य कधी देणार, याचा विचारहोणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर अपुऱ्या झोपेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांसाठी पालक आणि मुलांची बदललेली जीवनशैलीही कारणीभूत ठरते, हेही वास्तव आहे. 'लवकर निजे, लवकर उठे, त्याला धनसंपदा लाभे' हे सर्वज्ञात आहे तिचे व्यवस्थित पालन झाले, मुलांना आवश्यक तेवढ्याच उपक्रमांमध्ये भाग घेण्यास लावले, विद्यार्थी तणावमुक्त राहिले तर शाळांची वेळ काय असावी, हा प्रश्नच उरणार नाही. शिवाय, झोप पूर्ण होत नाही या सबबीखाली शाळेच्या वेळेत बदल सुचविताना पालक आणि विद्यार्थ्यांनी या निर्णयाकडे कसे पाहावे, याबाबत सरकारी पातळीवरून सांगण्या-समजावण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे वेळा बदलण्याचा हा सरकारी निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढवू शकते.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र