शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Topper: 'सर्व बाबा महाकालचा आशीर्वाद'! चेस-क्रिकेट खेळून केली तयारी; मुलांमधील UPSC टॉपर ऐश्वर्य म्हणतो... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 23:34 IST

UPSC result 2021 : "परीक्षा देण्याचा हा माझा चौथा प्रयत्न होता. यात मी यशस्वी झालो, हे सर्व बाबा महाकाल यांचेच आशीर्वाद आहेत. मी लवकरच बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला जाईन."

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) सोमवारी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. या परिक्षेत पहिले ३ क्रमांक मुलींनी पटकावले. तर उज्जैनच्या ऐश्वर्य वर्मा (Aishwarya Verma UPSC Topper) याने UPSC 2021 नागरी सेवा परीक्षेत AIR 4 (All India Rank) मिळवत सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला. खरे तर त्याच्या नावामुळे, सुरुवातीला सर्वांनाच तो एक महिला उमेदवार वाटला. मात्र, नंतर तो पुरुष उमेदवार असून मध्य प्रदेशातील उज्जैनचा असल्याचे स्पष्ट झाले.

ऐश्वर्य म्हणतो 'सर्व बाबा महाकाल यांचे आशीर्वाद' -सध्या ऐश्वर्य आपल्या कुटुंबीयांसोबत उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहतो. बाबा महाकाल यांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनमध्ये ऐश्वर्यचा जन्म झाला आहे. तो म्हणाला, परीक्षा देण्याचा हा माझा चौथा प्रयत्न होता. यात मी यशस्वी झालो, हे सर्व बाबा महाकाल यांचेच आशीर्वाद आहेत. मी लवकरच बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला जाईन.

परीक्षेच्या तयारीसंदर्भात बोलताना ऐश्वर्य म्हणाला, रोज 16-16 तास अभ्यास करणे ही एक भ्रामक गोष्ट आहे. UPSC चा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, अशा स्थितीत लहान, मध्यावधी आणि दीर्घकालीन योजना करून संपूर्ण तयारी करायला हवी. याच बोरबोर त्याने सांगितले, की त्याला चेस आणि क्रिकेट खेळायला आवडते. तो आपल्या तयारीच्या वेळी विश्रांती घेण्यासाठी चेस आणि क्रिकेट खेळत असे. असे केल्याने अनावश्यक ताण कमी होतो.आई-वडील आणि मित्रांना दिलं यशाचं श्रेय -मध्य प्रदेशातील उज्जैनमधील नीमच आणि कटनी येथून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या ऐश्वर्य वर्माने UPSC 2021 मध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना आणि मित्रांना दिले आहे. तो म्हणाला,  'माझ्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. ते प्रत्येक परीक्षा आणि मुलाखतीपूर्वी माझे मनोबल वाढवत होते.' ऐश्वर्यने 2017 मध्ये उत्तराखंडमधील पंत नगर कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून बीईची पदवी मिळवली आहे.

करोनामुळे दिल्ली सोडावी लागली -ऐश्वर्य दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. मात्र, तेथे करोनाच्या उद्रेकामुळे त्याला दिल्ली सोडावी लागली. यानंतर त्याने बरेली आणि उज्जैनमध्ये येऊन तयारी केली.

 

 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीexamपरीक्षाMadhya Pradeshमध्य प्रदेशEducationशिक्षण