शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 06:01 IST

नव्या धोरणानुसार, त्रिभाषा सूत्राची (मराठी, इंग्रजी, हिंदी) अंमलबजावणी कोणत्या इयत्तेपासून करावी, असा थेट प्रश्न विचारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ८ ऑक्टोबर रोजी  तिसऱ्या भाषेसंदर्भात राज्यातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी  गुगल फॉर्म माध्यमातून  प्रश्नावली, तर शिक्षक, प्राध्यापक, संस्था, संघटनांसाठी मतावली जारी केली. त्यावर प्रश्नावलीचा फार्स कशाला, असा  मराठी भाषातज्ज्ञ, मराठीप्रेमी आणि शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित करून शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच, असा सल्ला दिला आहे.  

राज्यात सर्व शाळांमध्ये पहिलीपासून  तिसरी हिंदी भाषा म्हणून सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाला विरोधी पक्ष, भाषातज्ज्ञ, शिक्षक  संघटनांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही शासन निर्णय रद्द करून डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती गठीत केली असून, ती समिती आता जनमत जाणून घेणार आहे. सध्या मराठी माध्यमांच्या  शाळांमध्ये इयत्ता पाचवीपासून हिंदी भाषा अनिवार्य आहे. 

नव्या धोरणानुसार, त्रिभाषा सूत्राची (मराठी, इंग्रजी, हिंदी) अंमलबजावणी कोणत्या इयत्तेपासून करावी, असा थेट प्रश्न विचारला आहे. बालवाडी ते दुसरीपर्यंत  इंग्रजी आणि हिंदी भाषेचे अध्यापन कोणत्या इयत्तेपासून सुरू करावे. इयत्ता ८ ते १० वीसाठी हिंदी, संस्कृत, पाली, अर्धमागधी (संपूर्ण किंवा ५०:५० टक्के) या भाषिक पर्यायांपैकी कोणते कायम ठेवावेत. तसेच इंग्रजी संभाषणकला, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांबाबतही मतं विचारली गेली आहेत.

शासनाला जे हवं ते करून घेण्यासाठी त्यांची व्यूहरचना आहे. राज्यातील बारा कोटी जनतेने विरोध केल्यानंतरही प्रश्नावलीचा फार्स कशासाठी करावा.चिन्मयी सुमीत, अभिनेत्री, मराठी शाळांच्या सदिच्छा दूत 

मुळात तिसरी भाषा नकोच. मग प्रश्नावलीचा प्रश्न उद्भवतच नाही. शासन मराठी भाषिक जनतेला वेडे समजत आहे काय? श्रीपाद भालचंद्र जोशी, लेखक, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषद

समिती खरंच मराठी जनतेचे  ऐकणार असेल, तर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मराठी भाषा, पाचवीपासून इंग्रजी, सातवी इयत्तेपासून हिंदी भाषा असावी. म्हणजे मुलांना योग्य वयात भाषेचा सराव  चांगल्या तऱ्हेने होईल, भाषा  शिकता येईल. दहावीमध्ये मुलं उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतील.रमेश पानसे, शिक्षण तज्ज्ञ 

तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच. जाधव समितीचीदेखील गरज नाही. सरकारने गुगल अर्जाच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तो आणून पाडू.डॉ. दीपक पवार, निमंत्रक, शालेय शिक्षण अभ्यास आणि समन्वय कृती समिती

English
हिंदी सारांश
Web Title : No Compulsory Third Language in Schools; Experts Question Survey Necessity

Web Summary : Experts oppose mandatory third language in schools, questioning the need for a survey after public opposition. They suggest phased language introduction from primary to higher classes.
टॅग्स :marathiमराठीhindiहिंदी