शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

शिक्षक अभियोग्यता चाचणी निकाल जाहीर; १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध, ६,३२० निकाल राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:09 IST

२७ मे ते ३० मे आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध केला असून ६,३२० उमेदवारांचा निकाल उचित कारणास्तव राखीव ठेवल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. ज्या उमेदवारांनी मुदतीत कागदपत्रे जमा केली, त्यांपैकी काही उमेदवारांना त्यांचा निकाल दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

बी.एड. परीक्षेसाठी १५,७५६ व डी.एल. एड. परीक्षेसाठी १,३४२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी १४ ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत बी.एड. परीक्षेचे ९,९५१ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे मिळून एकूण १०,७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर केला आहे. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एका महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र परीक्षा परिषद कार्यालयात सादर न केलेल्या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये बी.एड. परीक्षेचे ५,८०५ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५, असे मिळून ६,३२० उमेदवारांचा निकाल थांबविण्यात आला आहे. या संदर्भात ही परीक्षा २७ मे ते ३० मे २०२५ व २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.

४ जुलै रोजी झारी झालेल्या बीएड उत्तीर्ण निकालाची वैध कागदपत्रे परीक्षा परिषदेच्या कार्यालयात १४ जुलै २०२५ रोजी जमा केली होती. तरीही १८ ऑगस्टला अभियोग्यता चाचणी परीक्षा  निकालात माझा निकाल मात्र जाहीर  झालेला नाही. यामुळे खंत वाटते.-इशरत अश्फाक तांबोळी, उमेदवार

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस