शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हेळसांड अजून किती काळ चालणार?, स्वतंत्र नियमावलीकडे शाळांचे दुर्लक्ष 

By सीमा महांगडे | Updated: April 11, 2022 06:01 IST

आईच्या कुशीनंतर मुलं ही सगळ्यात जास्त त्यांच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या सहवासात सुरक्षित असतात.

सीमा महांगडे 

आईच्या कुशीनंतर मुलं ही सगळ्यात जास्त त्यांच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या सहवासात सुरक्षित असतात. पण ही संकल्पना बदलत्या काळासह पुसट होऊ लागल्याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. शाळेमध्येच विद्यार्थ्यांवर वाढत्या अत्याचाराच्या घटना, स्कूलबस बेपत्ता होण्याच्या घटना, शाळेतील कमी केलेली शिपाई काका-मावशी अशी पदे, यामुळे विद्यार्थी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. मुलं शाळांमध्ये सुरक्षित नसतील, तर प्रत्यक्ष शिक्षणाने ती सृजनशील कशी होतील, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जात आहे.

ज्ञानाच्या मंदिरात जिथे आयुष्य कसे जगावे, याचे धडे विद्यार्थी घेतात, तिथेच त्यांच्यावर अत्याचाराची घटना घडून शाळा व्यवस्थापनाला त्याची माहिती ही होत नसेल, तर याहून अधिक निष्काळजीपणाची सीमा असू शकणार नाही. आजही विद्यार्थीसंख्येचा एक मोठा भाग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणि अनुदानित किंवा पालिका शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र यातील कुठल्याच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीसारख्या आत्यवश्यक यंत्रणेची सुविधा नाही. यावरून राज्याच्या अर्थसंकल्पाचा किती भाग आपण शिक्षणावर आणि शिक्षणाच्या सोयी-सुविधांवर खर्च करतो, याचा अंदाज यायला वेळ लागणार नाही. 

पोक्सो कायदा काय आहे? किती शाळांमधून त्याची माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचते, याची तपासणी किंवा आढावा शिक्षण विभागाकडून होतो का, यावर प्रश्नचिन्ह आहे. या गोष्टीच विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, तर त्याचा उपयोग होणार तरी कसा? समस्या सुटणार तरी कशा? विद्यार्थी सुरक्षितता ही केवळ कोणा एकाची जबाबदारी नसून,  शाळा व्यवस्थापन, शिक्षक-पालक या सगळ्यांची ती आहे.

स्वतंत्र नियमावलीकडे शाळांचे दुर्लक्ष - स्कूलबससाठी राज्य सरकार व शिक्षण विभागाची स्वतंत्र नियमावली अस्तित्वात असतानाही विद्यार्थी सुरक्षितता वाऱ्यावरच आहे. - मग शाळेत विद्यार्थ्यांना पालकांनी नेमक्या कोणाच्या विश्वासावर पाठवावे, हा प्रश्न साहजिकच पालक प्रतिनिधींमधून उमटणे यात काहीच गैर नाही. - महत्त्वाचे म्हणजे शाळा व्यवस्थापनकडून विद्यार्थी सुरक्षिततेच्याबाबतीत हेळसांड होऊनही अशा शाळा केवळ आश्वासने देऊन सहजासहजी कारवाईविना स्वतःचा बचाव करतात. शिक्षण विभागाची नियमावली आणि निर्णय असेच पायदळी तुडविले जाणार असतील, तर मग शाळांना ते लागूच का केले जातात, असा प्रश्नही पडतोच.

टॅग्स :MumbaiमुंबईSchoolशाळाEducationशिक्षण