शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 05:29 IST

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा शाळा वेळेवर सुरू करता आलेल्या नाहीत. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पहिली ते बारावीचा २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम मागील वर्षाप्रमाणेच २५ टक्के कमी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

१५ जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामधील विविध अडचणी आणि विद्यार्थ्यांवर पडणारा ताण याचा विचार करता शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांच्यामार्फत हा निर्णय जारी करण्यात आला आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना राज्याचे शैक्षणिक संशोधक परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

परीक्षांच्या मूल्यमापनाचे धोरण निश्चित करावे 

याआधी सेतू अभ्यासक्रमामुळे ४५ दिवस आणि त्याआधीचे १५ दिवस याप्रमाणे शैक्षणिक कामकाजातील ६० दिवस कमी झाल्याने अभ्यासक्रमाचे नियोजन कसे करावे, याबाबत शिक्षण विभागाकडून आराखडा किंवा नियोजन मार्गदर्शक सूचनांची मागणी केंगार यांनी केली आहे. आयसीएसईप्रमाणे मूल्यमापनाचे धोरण निश्चित करावे म्हणजे शिक्षक मुख्याध्यापक यांना मदत होईल, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

विषय तज्ज्ञांचा समावेश करावा 

- शाळा, महाविद्यालये बंद ठेवल्याने शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांकडून सातत्याने अभ्यासक्रम कपातीची मागणी होत होती. त्यानंतर केवळ २५% अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. अजूनही कोरोना संसर्ग कमी झाला नसल्याने शाळा कधी सुरू होणार याबाबतीत अनिश्चितता आहे. 

- उपलब्ध कालावधीचा विचार करून अभ्यासक्रम ४०% इतका कमी करावा लागल्यास त्याची तयारी ठेवावी, अशी विनंती मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आली आहे. कपातीमध्ये संभ्रम वा संदिग्धता राहू नये यासाठी निर्णयात त्या-त्या विषयांतील तज्ज्ञांचा सहभाग करावा, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेच्या पांडुरंग केंगार यांनी केली आहे.   

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण