शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! मदरशांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत मिळणाऱ्या स्कॉलरशीपवर केंद्र सरकारची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 09:52 IST

केंद्र सरकारनं मदरशांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतलं आहे.

लखनौ-

केंद्र सरकारनं मदरशांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतलं आहे. यासाठीच्या सूचना देखील जारी करण्यात आल्यात आहेत. आतापर्यंत मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना १ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळत होती. तर इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोर्सच्या हिशोबानं शिष्यवृत्ती दिली जात होती. 

केंद्र सरकारच्या मतानुसार देशात शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जाते. तसंच विद्यार्थ्यांना आवश्यक इतर सामग्री देखील दिली जाते. इतकंच नव्हे, तर मदरशांमध्ये माध्यान्ह भोजन तसंच पुस्तकं देखील मोफत दिली जातात. मग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची गरज नाही. त्यामुळे केंद्रानं मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण इयत्ता ९ वी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती यापुढेही कायम राहणार आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारले जातील असंही नमूद केलं आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार एकट्या उत्तर प्रदेश राज्यात १६,५५८ मदरशांमध्ये जवळपास ४ ते ५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. यावेळी नोव्हेंबर महिन्यातही मदरशांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. पण केंद्रानं अचानक शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं याआधीच शिष्यवृत्ती बंद केली आहे. 

उत्तर प्रदेशातील मदरशांच्या कमाईची चौकशी होणारउत्तर प्रदेशातील योगी सरकारनं नुकतंच मदरशांचा सर्व्हे केला होता. यात ८४९६ मदरसे मान्यताप्राप्त नसल्याचं आढळून आलं होतं. सर्व्हेमध्ये या मदरशांच्या कमाईचा स्त्रोत देणगी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता यूपी सरकार मदरशांच्या मिळकतीच्या स्त्रोतांचा तपास करण्याची तयारी करत आहे. 

नेपाळ सीमेला खेटून मोठ्या प्रमाणात कोणतीही मान्यता नसलेले मदरसे आढळून आले आहेत. नेपाळ सीमेलगत असलेल्या सिद्धार्थनगर येथे ५००, बलरामपूर येथे ४००, बहारिच आणि श्रावस्तीमध्ये ४००, लखीमपूरमध्ये २००, महाराजगंज येथे ६० हून अधिक अनधिकृत मदरसे असल्याची माहिती समोर आली होती. या मदरशांना कोलकाता, चेन्नई, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, सौदी अरेबिया आणि नेपाळमधून देणगी मिळत असल्याची माहिती आहे. आता याच स्त्रोतांची तपासणी केली जाणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षण