शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

उच्चशिक्षण सुविधेबरोबर गुणवत्तेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 00:01 IST

सध्याच्या स्थितीत शिक्षणाबद्दल विचार करायचा असेल, तर जागतिकीकरण, संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचे युग आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांना नजरेआड करून चालणार नाही.

- आविष्कार देसाईआज सर्वच क्षेत्रांतील शिक्षण घेणे महाग झाले आहे. आपल्या मुलाला चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये उत्तम शिक्षण मिळण्यासाठी पालक धडपडत आहेत. या शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली आहे. अशात बेताचीच परिस्थिती असलेले पालकही नाना खटापटी करून, आपल्या मुलांना एरोनॉटिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, फॅशन डिझायनिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंट अशा कोर्सना पाठवत आहेत. त्यासाठी नवी मुंबई ही रायगडमधील अनेक विद्यार्थ्यांसाठी उपकारक ठरल्याचे स्पष्ट चित्र आपल्याला दिसत आहे.शिक्षण हा मानवी उन्नतीचा भक्कम पाया आहे. माणसाचा विकास साधणारे ते साधन आहे. रायगड जिल्हा पनवेलपासून पोलादपूरपर्यंत आणि श्रीवर्धन तालुक्यापर्यंत पसरलेला आहे. सध्याच्या स्थितीत शिक्षणाबद्दल विचार करायचा असेल, तर जागतिकीकरण, संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचे युग आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांना नजरेआड करून चालणार नाही.रायगड जिल्हा मुंबईला लागून आहे आणि विद्येचे माहेरघर समजले जाणारे पुणेही जिल्ह्याच्या जवळ आहे. ही केंद्रे शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. ऐतिहासिक काळातही येथील अनेक सामाजिक राजकीय नेते पुण्या-मुंबईकडे शिकण्यासाठी गेले होते असा इतिहास आहे; परंतु हे प्रमाण तुरळक होते. समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत शिक्षण पोहोचले नव्हते. त्यामुळे शहरांमध्ये शिक्षणासाठी जाणारे आर्थिकदृष्ट्या प्रगत वर्गांमधील होते. १९९०च्या दशकात नवी मुंबईत अनेक शैक्षणिक संस्थांनी जन्म घेतला. त्या ठिकाणी शिक्षण घेणे मध्यमवर्गाच्या आवाक्यात होते. म्हणजेच रायगडमधील पेण आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थी दहावी-बारावीनंतर नवी मुंबईकडे जाऊ शकत होते आणि सध्याही जात आहेत. आपल्या जवळचे आणि शिक्षणाचे उत्तम ठिकाण म्हणून पालक आणि मुलांकडूनही नवी मुंबईला पसंती दिली जात आहेत. विविध क्षेत्राबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारे कॉलेजेस नवी मुंबईत आहेत.रायगड जिल्ह्यातही विविध शिक्षण संस्थांचा विकास झाला. कोकण एज्युकेशन सोसायटी असेल किंवा द.ग. तटकरे अथवा पीएनपी यांची शैक्षणिक संकुले असतील. शिक्षणाचा विकास जिल्ह्यातील ग्रामीण भागातही होत होता. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठही दक्षिण रायगडमधील ग्रामीण भागासाठी अत्यंत उपकारक ठरले. बॅ. ए. आर. अंतुले यांची दूरदृष्टी शिक्षणाच्या प्रांतातही अनुभूतीस येते, हे यावरून सहज लक्षात येते. उत्तर रायगडकर मुंबई-नवी मुंबईकडे उच्चशिक्षणासाठी जात होते आणि तुरळकपणे दक्षिण रायगडमधून नवी मुंबईकडे ओढा होता. माणगाव, महाड, श्रीवर्धन, तळा येथून पुण्याकडेही शिक्षणासाठी जाणारे अनेक होते आणि आजही आहेत.आज अभियांत्रिकी महाविद्यालये रायगडमध्ये आहेत, परंतु अभियांत्रिकी शाखेलाच एक साचलेपण आल्याचा मतप्रवाह आहे. शिक्षणाच्या सुविधा जरूर निर्माण झाल्या, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी वणवण भटकण्याची वेळ येथील युवकांवर आलेली आहे. सरकारने शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक कंपन्या यांच्यात ताळमेळ घालणाऱ्या अनेक योजना आखलेल्या आहेत. मात्र, आजही त्यासाठी राखून ठेवलेला निधी प्रशासनाला वापरतायेत नाही.रायगडपुढे खूप आव्हाने आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्षण, शैक्षणिक सोयी निर्माण झाल्या, पण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी कोण देणार? हा मोठा प्रश्न आजही कायम आहे. भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख हे रोहा येथील होते. सी.डी. देशमुख खरे तर वनस्पती शास्त्रातून एम.एस्सी झाले होते, पण त्यांचे अर्थशास्त्रावरील प्रभुत्व भल्याभल्यांनाही चकीत करणारे असेच होते. गुणवत्ता याला म्हणतात. रायगडच्या शैक्षणिक मूल्यमापनानिमित्त सीडींची आठवण येणे क्रमप्राप्त आहे. असे अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग नेतृत्व रायगडने केलेले आहे ते शिक्षणाच्या जोरावरच. त्यांना दिलेले नुसते शिक्षण नव्हते, तर ते गुणवत्तापूर्ण शिक्षण होते. आज जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची भाषा करणाऱ्यांनी हे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे शिवधनुष्य पेलल्यास युवावर्गाच्या प्रगतीला काही अर्थपूर्ण आयाम निश्चितपणे लाभतील, यामध्ये शंका असण्याचे कारण नाही.