शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

एकाच वर्षात 400 हून अधिक पीएचडीधारक! आयआयटी बॉम्बे ठरली देशातील पहिली शैक्षणिक संस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 06:56 IST

एकाच वर्षी तब्बल ४०० हून अधिक पदवीधर संशोधक देणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे.

मुंबई :

एकाच वर्षी तब्बल ४०० हून अधिक पदवीधर संशोधक देणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. यंदा आयआयटी बॉम्बेतून तब्बल ४४९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. यामुळे स्टेम शिक्षणातील (सायन्स, टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी, गणित) हा एक मैलाचा दगड ठरला आहे. आयआयटी बॉम्बेचा ६० वा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. कोविड पूर्वकाळातील वातावरण, कोविडकाळातील अडचणी - समस्या आणि कोविडकाळानंतर येणाऱ्या संधी असे ३ विविध टप्पे पाहिलेली यंदाची पदवीची बॅच असल्याने आयआयटी बॉम्बेचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

आयआयटी बॉम्बेच्या ६० व्या दीक्षांत समारंभात २ हजार ३२४ विद्यार्थ्यांना एकूण २ हजार ५५१ पदव्या बहाल करण्यात आल्या. आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली. तुम्ही सगळे भारताचे भविष्य असून आज तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता पदवी प्राप्त करून सिद्ध केली आहे, आता या जगातील माणुसकीला बळकटी देणे आणि ती कायम राखण्याची जबाबदारी तुमची असल्याचे बिर्ला यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

दीक्षांत समारंभात ३५ संशोधक विद्यार्थ्यांची नाईक आणि रस्तोगी सर्वोत्कृष्ट  पीएचडी प्रबंध पुरस्कारासाठी ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी ४ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके बहाल करण्यात आली. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेच्या मोहम्मद अली रेहान याला प्रेसिडेंट ऑफ इंडिया मेडलने सन्मानित करण्यात आले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या कौस्तुव जाना याला २०२०-२१ साठी तर अर्यमान मिथानी याला २०२१-२२ साठी इन्स्टिट्यूट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले.  कॉम्प्युटर सायन्स आनंद इंजिनिअरिंग विभागाच्या श्रेया पथक हिला डॉ. शंकर दयाल शर्मा  गोल्ड मेडल बहाल करण्यात आले. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी काळात संस्थेकडून देण्यात आलेले प्रशिक्षण नक्कीच सक्षम नेतृत्व घडविण्यात मदत करेल. देशाच्या गरजा ध्यानात घेऊन हे विद्यार्थी नक्कीच शैक्षणिक व कॉर्पोरेट क्षेत्रात आपले योगदान देतील. - प्रा. शुभाशीष चौधरी, संचालक, आयआयटी बॉम्बे 

 

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षण