शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात चुका, संदिग्धता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 09:17 IST

शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चेत पुनर्लेखनाची एकमुखी मागणी

मुंबई : महाराष्ट्राने सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत देशाचे नेतृत्व केले आहे. त्याचे प्रतिबिंब राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात उमटलेले दिसत नाही. तसेच, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे तयार केलेल्या राज्याच्या आराखड्यात अनेक चुका आणि त्रुटी आहेत. त्यामुळे तो संदिग्ध, समजण्यास कठीण आहे.

असा आराखडा अभिप्रायासाठी  वापरणे म्हणजे सर्वांचाच वेळ वाया घालवण्यासारखे आहे. त्यामुळे हा आराखडा सरकारने मागे घ्यावा आणि नव्याने समित्या स्थापन करून त्याचे पुनर्लेखन करावे, अशी भूमिका यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचातर्फे आयोजित शिक्षण कट्टा या चर्चेत घेण्यात आली.

राज्य अभ्यासक्रम आराखड्यावरील चर्चेत मंचाचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे, बालभारतीच्या माजी विद्यासचिव धनवंती हर्डीकर, शिक्षण अभ्यासक किशोर दरक, माजी शिक्षण संचालक भाऊ गावंडे, बसंती रॉय, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसाहेब चासकर, सुभाष मोरे, सुशील शेजुळे, महेंद्र गणपुले आदींनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात सर्व बाबी सविस्तर आणि योग्य पद्धतीने मांडल्या आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखड्यात त्याचे योग्य भाषांतर व्हायला हवे होते. मात्र, यात अनेक महत्त्वाच्या बाबी गाळल्या आहेत. हा आराखडा फक्त मराठी माध्यमाच्या शाळांना विचारात घेऊनच केलेला दिसतो. राज्यातील अनेक भाषा माध्यमांचा विचार यात दिसत नाही. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार आपण महाराष्ट्रात नेमके काय करणार आहोत, याचे चित्र त्यात उमटत नाही.- डॉ. वसंत काळपांडे

हे राष्ट्रीय आराखड्याचे सुमार दर्जाचे भाषांतर आहे. हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आपल्या लोकशाही देशात संविधानाच्या तात्त्विक चौकटीला जे महत्त्व आहे तेच शिक्षणात राज्य अभ्यासक्रम आराखड्याला आहे. परंतु, तो गांभीर्याने तयार झालेला दिसत नाही. तो मागे घेऊन त्याचे पुनर्लेखन करावे आणि मग तो अभिप्रायार्थ ठेवावा.- धनवंती हर्डीकर

टॅग्स :Educationशिक्षण