शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

ऑनलाईन शिक्षण: ‘मीडिअम’ आणि ‘मेथड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 23:51 IST

शिक्षणाची पद्धती अचूक असेल, तर माध्यम कोणते आहे याने फारसा फरक पडत नाही, पडू नये !

ऐपतवाल्या वर्गाने गेली दोन-तीन दशके आपल्या मुलांना प्रथम कम्प्युटर व नंतर स्मार्टफोन ही माध्यमे दिल्याने त्यांच्या मुलांनी शैक्षणिक प्रगतीत जागतिक विक्रम केल्याचे दिसत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी तंत्रवैज्ञानिकदृष्ट्या कितीही अद्ययावत ‘मीडिअम’ वापरले तरी ‘मेथड’ योग्य नसल्यास शिक्षण होत नाही व मेथड अचूक असेल तर कोणतेही मीडिअम वापरले तरी शैक्षणिक निष्पत्तीत फरक पडत नाही हे वैज्ञानिक सत्य ध्यानात घ्यायला हवे. मुलांपर्यंत तयार व्हिडिओ स्वरूपातील माहिती पोहोचवण्याची चढाओढ आपल्याला जिंकायची नाहीय. त्यांना त्यांच्या ज्ञानरचनेत साहाय्य, मार्गदर्शन होईल अशा पद्धतीने कृतींची मांडणी करत, अनुभवांची रेलचेल करत अर्थशोधन व अर्थबांधणी करायला प्रवृत्त करायचे आहे. ज्ञानरचना ही जितकी वैयक्तिक प्रक्रिया आहे तितकीच ती सामाजिक प्रक्रिया आहे. त्यामुळे घरी एकट्याने बसून स्मार्टफोनवर शिक्षकांची व्याख्याने ऐकून ती कशी करता येईल? त्यासाठी शिक्षकांच्या, वर्गमित्रांच्या सान्निध्यात गटातील, वर्गातील आणि शाळेतील शारीरिक, बौद्धिक, भावनिक, वैचारिक क्रिया व आंतरक्रियांची गरज आहे.महाराष्ट्रातील ९७.५ टक्के शालेय शिक्षकांकडे स्मार्टफोन आहेत हे एका पहाणीत समोर आले आहे. शासकीय किंवा शिक्षकांच्या सामायिक व विषयवार संघटनांच्या इ-लर्निंग पोर्टलवरून शिक्षकांना स्वत: तयार केलेले इ-लर्निंग साहित्य आपल्या स्मार्टफोनवरून इतर शिक्षकांशी शेअर करता येईल. तसेच स्मार्टफोनचा प्रभावी वापर शालेय शिक्षकांच्या दैनंदिन प्रशिक्षणासाठी करणे अत्यावश्यक व अपरिहार्य आहे. त्यांना नवनवीन उपक्रमांचे परस्परात शेअरिंग करता येईल. काही उत्साही शिक्षकांमध्ये तसे काही प्रमाणात घडतेही आहे.अकरावी-बारावीच्या व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे वय, जबाबदारीची जाणीव, शारीरिक व मानसिक परिपक्वता व निकड लक्षात घेता त्यांच्या शिक्षणात स्मार्टफोन, इ.चा समुचित वापर स्वागतार्ह आहे. त्यांना शासनाने स्मार्टफोन दिल्यास भेदभाव न होता सर्वांना उच्च गुणवत्तेची इ-शैक्षणिक प्रक्रिया त्यावर उपलब्ध करून देता येईल. इंटरनेटमुळे आज बहुतेक विषयांची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. मुलांना ती सर्च व क्युरेट करायला शिकवले पाहिजे. ती वर्गातून देण्याची गरज उरलेली नाही. व्याख्यान इतरांना उपद्रव न होता एकट्याने ऐकण्या-पहाण्याची गोष्ट असल्याने ती घरी स्मार्टफोनवर पूर्ण करता येईल. वर्गात एवढी सुपीक डोकी एकत्र येतात; पण ती एकाचेच व्याख्यान ऐकतात. एकत्र येऊनही त्यांचा परस्परांना उपयोग होत नाही ही हास्यास्पद गोष्ट आहे. आता वर्गातला वेळ अनेकांच्या सहभागाने करण्याच्या ज्ञानरचनेला देता येईल. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी ज्या कृती व अंतरक्रिया आवश्यक असतात त्यांना पुरेसा वेळ मिळेल. जसे की मुक्तोत्तरी प्रश्नांची वेगवेगळी व्यक्तिनिष्ठ उत्तरे स्वतंत्र विचार करून, प्रश्नाचे नीट विश्लेषण करून व सर्जनशील अभिव्यक्ती साधत वर्गासमोर देणे, तर्क, वादविवाद, चर्चा, मतप्रदर्शन, भिन्न मतांविषयी आदर, कळीचे प्रश्न निर्भयपणे उपस्थित करता येणे व शिक्षकांच्या मदतीने गटाकडून उत्तरे मिळवणे, प्रयोगशाळेत शोध, निरीक्षणे, नोंदी, निष्कर्ष, गट-प्रकल्पांतून सर्जनशील निर्मिती अशा ‘उच्च’ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी वेळ मिळेल. केवळ माहितीचे आदानप्रदान म्हणजे उच्चशिक्षण नव्हे ! माहितीचे समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोजन करण्याच्या संधी देते ते उच्चशिक्षण. माहितीच्या उपयोजनातून समाजाला उपयुक्त व उत्पादक कामातूनच खरीखुरी ज्ञाननिर्मिती होते. उत्पादक काम आणि सैद्धांतिक ज्ञान यांचा सुरेख संगम, त्यांची घट्ट वीण म्हणजे उच्चशिक्षण. अस्तित्वात असलेल्या ज्ञानाला आव्हान द्यायला शिकवते, त्याच्या कक्षा विस्तारायला शिकवते ते उच्चशिक्षण.आता माहिती तंत्रविज्ञानाच्या योग्य वापराने ते साध्य करता येईल. पूर्वीची तूट भरून काढता येईल.(शब्दांकन : मुक्ता चैतन्य)विवेक सावंतचीफ मेंटॉर, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड