शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

JEE Main Result 2021: कौतुकास्पद! मुंबईच्या सिद्धांतला जेईई मुख्य परीक्षेत १०० पर्सेंटाईल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 11:41 IST

Siddhant Mukherjee And JEE Main Result 2021 : जेईई एडव्हान्समध्ये चांगले गुण घेऊन आयआयटी मुंबईच्या कम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश मिळविण्याची त्याची इच्छा आहे.

मुंबई - जेईई मुख्य परीक्षा २०२१ च्या जाहीर झालेल्या निकालात देशातील ६ विद्यार्थी हे देशातून या परीक्षेत १०० पर्सेंटाइल (एनटीए स्कोअर) मिळवून अव्वल आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबईचा सिद्धांत मुखर्जी याने सुद्धा बाजी मारली आहे. मुंबईच्या अंधेरीत राहत असलेल्या सिद्धांतने ऍलन अकॅडेमीतून अभ्यास करत कोटा , राजस्थान येथून जेईई २०२१ ची परीक्षा दिली. कॉम्पुटर सायन्समध्ये करिअर करू इच्छिणारा सिद्धांत जेईई एडव्हान्सची तयारी करून अधिक चांगला रँक मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सिद्धांताच्या आईने नमूद केले आहे.

दहावीपर्यंत वांद्रे कुर्ला संकुलातील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेमधून झालेल्या सिद्धांतने पुढील शिक्षण दिशा डेल्फी पब्लिक स्कुलमधून घेतली आहे. कोविड १९ च्या काळामधील संधीचा फायदा घेत आपल्या प्रवासाचा वेळ वाचावीत आणि ऑनलाईन क्लासेसवर पूर्ण लक्ष देऊन अभ्यास केल्याचे त्याने नमूद केले. या यशाने हुरळून न जाता आपले लक्ष्य हे जेईई एडव्हान्समध्ये चान्गले गुण आणणे हे असल्याचे त्याने अधोरेखित केले. सिद्धांतचे वडील संदीप मुखर्जी यांची रिस्क मॅनेजमेंट कन्सल्टंसी असून आई नवनिता मुखर्जी या सीए आहेत. या दोघांच्याही आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचे सिद्धांतने सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमीच्या भ्यासावर लक्ष केंद्रित करावे , सीबीएसईचा अभ्यास करावा आणि परीक्षेची तयारी करावी असा कानमंत्र ही त्याने दिला. 

जेईई मुख्य परीक्षा २०२१ च्या काळात प्रवासाच्या कारणास्तव दूरवरील केंद्रावर जावे लागणार असल्याने अनेक विद्यर्थायनी परीक्षा ड्रॉप केली मात्र आपल्याला तशा काहीच समस्या आल्या नाहीत, आणि केंद्रावरील सुरक्षिततेची व्यवस्था ही चोख असल्याचे सिद्धांत याने सांगितले. जेईई एडव्हान्समध्ये चांगले गुण घेऊन आयआयटी मुंबईच्या कम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश मिळविण्याची त्याची इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत केंब्रिज विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाला असूनही तो जेईई एडव्हान्ससाठी प्रयत्न करत आहे. 

इनोव्हेट इन इंडिया फॉर इंडिया

 शिक्षण कुठेही झाले तरी देशातील नागरिकांसाठी , त्यांचा वेळ वाचेल, त्यांच्या दैनंदिन वापरात उपयोग होईल असे काहीतरी आपल्याला शिक्षणातून भारतीयांसाठी करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. हे संशोधन किंवा शिक्षणातून घडलेले उपक्रम देशवासीयांसोबतच जगालाही उपयुक्त होईल असे कार्य करायचे असल्याचे सिद्धांताने नमूद केले आहे.

 

टॅग्स :examपरीक्षाMumbaiमुंबईStudentविद्यार्थी