शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

JEE Main Result 2021: कौतुकास्पद! मुंबईच्या सिद्धांतला जेईई मुख्य परीक्षेत १०० पर्सेंटाईल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 11:41 IST

Siddhant Mukherjee And JEE Main Result 2021 : जेईई एडव्हान्समध्ये चांगले गुण घेऊन आयआयटी मुंबईच्या कम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश मिळविण्याची त्याची इच्छा आहे.

मुंबई - जेईई मुख्य परीक्षा २०२१ च्या जाहीर झालेल्या निकालात देशातील ६ विद्यार्थी हे देशातून या परीक्षेत १०० पर्सेंटाइल (एनटीए स्कोअर) मिळवून अव्वल आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबईचा सिद्धांत मुखर्जी याने सुद्धा बाजी मारली आहे. मुंबईच्या अंधेरीत राहत असलेल्या सिद्धांतने ऍलन अकॅडेमीतून अभ्यास करत कोटा , राजस्थान येथून जेईई २०२१ ची परीक्षा दिली. कॉम्पुटर सायन्समध्ये करिअर करू इच्छिणारा सिद्धांत जेईई एडव्हान्सची तयारी करून अधिक चांगला रँक मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सिद्धांताच्या आईने नमूद केले आहे.

दहावीपर्यंत वांद्रे कुर्ला संकुलातील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेमधून झालेल्या सिद्धांतने पुढील शिक्षण दिशा डेल्फी पब्लिक स्कुलमधून घेतली आहे. कोविड १९ च्या काळामधील संधीचा फायदा घेत आपल्या प्रवासाचा वेळ वाचावीत आणि ऑनलाईन क्लासेसवर पूर्ण लक्ष देऊन अभ्यास केल्याचे त्याने नमूद केले. या यशाने हुरळून न जाता आपले लक्ष्य हे जेईई एडव्हान्समध्ये चान्गले गुण आणणे हे असल्याचे त्याने अधोरेखित केले. सिद्धांतचे वडील संदीप मुखर्जी यांची रिस्क मॅनेजमेंट कन्सल्टंसी असून आई नवनिता मुखर्जी या सीए आहेत. या दोघांच्याही आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचे सिद्धांतने सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमीच्या भ्यासावर लक्ष केंद्रित करावे , सीबीएसईचा अभ्यास करावा आणि परीक्षेची तयारी करावी असा कानमंत्र ही त्याने दिला. 

जेईई मुख्य परीक्षा २०२१ च्या काळात प्रवासाच्या कारणास्तव दूरवरील केंद्रावर जावे लागणार असल्याने अनेक विद्यर्थायनी परीक्षा ड्रॉप केली मात्र आपल्याला तशा काहीच समस्या आल्या नाहीत, आणि केंद्रावरील सुरक्षिततेची व्यवस्था ही चोख असल्याचे सिद्धांत याने सांगितले. जेईई एडव्हान्समध्ये चांगले गुण घेऊन आयआयटी मुंबईच्या कम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश मिळविण्याची त्याची इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत केंब्रिज विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाला असूनही तो जेईई एडव्हान्ससाठी प्रयत्न करत आहे. 

इनोव्हेट इन इंडिया फॉर इंडिया

 शिक्षण कुठेही झाले तरी देशातील नागरिकांसाठी , त्यांचा वेळ वाचेल, त्यांच्या दैनंदिन वापरात उपयोग होईल असे काहीतरी आपल्याला शिक्षणातून भारतीयांसाठी करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. हे संशोधन किंवा शिक्षणातून घडलेले उपक्रम देशवासीयांसोबतच जगालाही उपयुक्त होईल असे कार्य करायचे असल्याचे सिद्धांताने नमूद केले आहे.

 

टॅग्स :examपरीक्षाMumbaiमुंबईStudentविद्यार्थी