शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

JEE Main exam :  'या' भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षेची पुन्हा संधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 22:08 IST

JEE Main exam: पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा काही भागांत बसला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, या भागातील जेईई मेन २०२१ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढेही मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र, आता या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठा दिलासा दिला आहे. पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यासंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट केले आहे. "JEE Main परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २५ जुलै आणि २७ जुलै यादरम्यान आयोजित करण्यात आल्यात. मात्र कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल आणि लवकरच नवी तारीख जाहीर केली जाईल", असे ट्विट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.

गेल्या रविवावारपासून राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यात पावसाने धूमाकूळ घातला.यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २७,२८ आणि ३० एप्रिल २०२१ दरम्यान होणार होती. मात्र, देशातला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी दोन टप्प्यांमधील परीक्षा पार पडली होती.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण