शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

शिष्यवृत्ती बंदच की  पुन्हा नापासांचे लाड? परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:22 IST

सामाजिक न्याय विभागाने यापूर्वीही नियमांना मोडता घालत नापास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली होती. ४० ते ५० विद्यार्थ्यांना त्यामुळे गतकाळात फायदाही झाला होता.

मुंबई : राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीच्या आधारे परदेशात शिक्षण घेणारे अनुसूचित जातींचे विद्यार्थी एखाद्या सेमिस्टरमध्ये नापास झाले तर शिष्यवृत्ती दिली जाणार नाही या सरकारच्या निर्णयात यंदाही बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री व सामाजिक न्याय खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे. 

सामाजिक न्याय विभागाने यापूर्वीही नियमांना मोडता घालत नापास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली होती. ४० ते ५० विद्यार्थ्यांना त्यामुळे गतकाळात फायदाही झाला होता. मात्र, नापास होऊनही शिष्यवृत्ती कायम राहत असल्याने अभ्यासाकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. आणखी सहा महिने सरकारच्या पैशाने परदेशात राहायला मिळते अशी चुकीची भावना बळावत चालल्याचेही म्हटले जाते. धोरणात्मक निर्णयाला असा अपवाद दरवेळी करणे योग्य आहे का, असा सवालही गुणी विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.  

परदेशातील विद्यापीठात विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे शुल्क भरण्याची हमी ही राज्य सरकार देत असते. त्यामुळे ही विद्यापीठे सरकारकडे शुल्कासाठी तगादा लावतात. विद्यार्थ्यांनी पुढच्या सेमिस्टरसाठीचे शुल्क भरले नाही तर त्यांचा प्रवेश रद्द करण्याची भूमिका संबंधित विद्यापीठांकडून घेतली जाते. शुल्क नियमित न भरणाऱ्या देशांना वा राज्यांना काळ्या यादीत टाकायचे आणि त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे प्रवेशच द्यायचा नाही अशी भूमिकाही काही विद्यापीठांकडून घेतली जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. 

नापास झालेल्या विद्यार्थ्यांबाबत अपवाद करून त्यांना शिष्यवृत्ती द्यावी असा प्रस्ताव आमच्या आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. सरकार त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल.- प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण, पुणे.  

टॅग्स :Studentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण