शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

International Literacy Day 2022: आज जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या, कोणत्या राज्यात जास्त साक्षर लोक आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:08 IST

International Literacy Day 2022: जगभरात आज साजरा केला जातोय जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

नवी दिल्ली : आज जागतिक साक्षरता दिवस आहे. जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी साक्षरता दिन साजरा केला जातो. प्रत्येक देश आणि राज्यासाठी साक्षरता खूप महत्त्वाची आहे, जी राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) सर्वेक्षणानुसार, भारताचा एकूण साक्षरता दर 77.7 टक्के आहे. ग्रामीण भागात 73.5 टक्के आणि शहरी भागात 87.7 टक्के लोक साक्षर आहेत. देशात केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. केरळमध्ये 96.2 टक्के लोक साक्षर आहेत.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, जगभरातील 771 मिलियन निरक्षर लोकांसमोर साक्षरतेची आव्हाने कायम आहेत, त्यापैकी बहुतांश महिला आहेत, ज्यांच्याकडे अजूनही मूलभूत वाचन आणि लेखन कौशल्य नाही आहे. त्यांना अतिसंवेदनशीलतेचा सामना करावा लागतो.

दुसरीकडे, हितचिंतकांचे म्हणणे असे की, साक्षरतेच्या माध्यमातून केवळ गरिबी, बेरोजगारी आणि लैंगिक असमानता हळूहळू नष्ट केली जाऊ शकत नाही तर त्यांच्या क्षेत्रांमध्ये आणि समाजांमध्ये मानवी हक्कांना चालना देण्यासाठी देखील मदत करू शकतात. जे आपल्या अधिकाऱ्यांच्या ज्ञानाच्या कमतरतेमुळे पीडित आहेत.

दरम्यान, या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची थीम 'ट्रांसफॉर्मिंग लिटरेसी लर्निंग स्पेसेस' (Transforming Literacy Learning Spaces) आहे. याचा फोकस लोकांना साक्षरता शिकण्याच्या जागांच्या मूलभूत महत्त्वाचा पुनर्विचार करण्यासाठी आणि जगभरातील सर्व व्यक्तींसाठी दर्जेदार, न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी आग्रह करणे आहे.

कधीपासून साजरा होत आहे साक्षरता दिवस?आंतरराष्ट्रीय पातळीवर 1966 पासून साक्षरता दिवस साजरा होत आहे. याआधी 1965 मध्ये 8 ते 19 सप्टेंबर दरम्यान इराणची राजधानी तेहरान येथे जगभरातील देशांच्या शिक्षणमंत्र्यांची एक बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर युनेस्कोने दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस (International Literacy Day) साजरा केला जाईल, असे जाहीर केले. या घोषणेनंतर दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जात आहे. 

साक्षरता म्हणजे काय? साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ वाचन आणि लिहिण्यास सक्षम असणे असा होतो. जगातील सर्व देश त्यांच्या प्रत्येक वर्गातील नागरिकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने साक्षरता दिवस साजरा करतात. भारतात सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती किमान एका भाषेत लिहू-वाचू-बोलू शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजतात. थोडक्यात साक्षरतेसाठी देशात अक्षर ओळख असण्याला महत्त्व आहे. पण साक्षरता म्हणजे एवढेच नाही तर साक्षरता म्हणजे आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्यांविषयी जाणीव असणे. 

टॅग्स :Educationशिक्षणKeralaकेरळ