शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शेकडो भारतीय विद्यार्थ्यांचे कॅनडातील उच्च शिक्षण धोक्यात, थेट पंतप्रधानांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 13:21 IST

Education News: २१ ऑगस्टपर्यंत भारतातून येण्यासाठीची विमानसेवा बंद केल्याने पालक-विद्यार्थी चिंतातुर

मुंबई : कॅनडा सरकारने २१ ऑगस्टपर्यंत भारतातून येण्यासाठीची विमानसेवा बंद केल्याने कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाऊ पाहणारे शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. आमचे शैक्षणिक वर्ष वाचवा, असे आर्जव या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले आहे.मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता, पुण्यासह अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा कॅनडामध्ये शिक्षण घेण्याकडे ओढा वाढला आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यांनी तेथे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. बहुतेक अभ्यासक्रमांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना तेथे पोहोचणे अत्यावश्यक आहे. मात्र आता कॅनडा सरकारने भारतासाठीची विमानसेवा २१ ऑगस्टपर्यंत बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. ही विमानसेवा तत्काळ सुरू व्हावी याकरिता आता पालक, विद्यार्थी एकवटले असून त्यांनी त्यासाठी मोहीम उघडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कॅनडासाठीची विमानसेवा सुरू करण्याची विनंती त्यांनी ई-मेलद्वारे केली आहे. पंतप्रधानांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये, आपण कृपया कॅनडाच्या पंतप्रधानांशी चर्चा करून निर्णय करावा, असे साकडेही त्यांनी घातले आहे.कॅनडासाठीची विमानसेवाच बंद असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिसा मिळण्यात अडचणी येत आहेत. ज्यांना तो मिळाला आहे ते देखील २१ ऑगस्टपर्यंत अडकले आहेत. नंतरही विमानसेवा सुरू होईल की, नाही याबाबत अनिश्चितता आहे. शिवाय ते पालकांना घेऊन जाऊ शकत नाहीत. कारण त्यांना व्हिसा मिळत नाही. अन्य देशातून कॅनडाला जाणे एक पर्याय आहे. बहुतेक सर्व विद्यार्थी हे अठरा-एकोणीस वर्षांचे आहेत. अन्य देशातून एकट्याने पोहोचणे आणि हे करताना कोरोना संदर्भातील तेथील नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी दिव्य बनले आहे. कॅनडामध्ये भारतातील कोरोना चाचणी अहवाल स्वीकारला जात नाही. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना इतर देशातून कॅनडात पोहोचायचे तर आधी जवळचे स्थान म्हणून दोहा (कतार) येथे जाऊन तेथे तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल. तेथे आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल आणि मग निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर कॅनडाला जाता येईल. एकूण खर्चातही मोठी वाढ होणार आहे. शिवाय त्यांना पालकांना सोबत नेता येणार नाही. चिंतातुर पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आता व्हॉट्सॲप ग्रुप बनवले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ते प्रचंड पाठपुरावा करत आहेत. 

उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रयत्नाने कॅनडामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून प्रवेश घेतला. मात्र आता त्याबाबत सगळीच अनिश्‍चितता आहे. कॅनडासाठीची विमानसेवा सुरू झाली नाही तर पालक आणि विद्यार्थ्यांच्या आशांवर पाणी फिरले जाईल.- सुनीत कोठारी, एक चिंताग्रस्त पालक

टॅग्स :Educationशिक्षणIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या