शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शाळा मुलांचा ‘टीसी’ नाकारू शकते का?

By प्रगती पाटील | Updated: June 11, 2024 09:34 IST

Education News: एका शाळेकडून दुसऱ्या शाळेत सामील होण्यासाठी मुलाचे हस्तांतरण प्रमाणपत्र मिळविण्याचा अधिकार पालकांना आहे. कोणत्याही कारणास्तव, केवळ विद्यार्थ्याची फी भरलेली नाही म्हणून शाळेच्या अधिकाऱ्यांना हा दाखला देणे नाकारता येत नाही. शाळेच्या विविध प्रकारच्या शुल्कापोटी कोणतीही रक्कम देय असल्यास, वसुलीसाठी पालकांविरुद्ध योग्य कार्यवाही करण्याची मुभा कायद्याने शाळांना दिली आहे; पण शुल्क भरले नाही म्हणून शाळा सोडल्याचा दाखला नाकारणे हे बेकायदेशीर आहे.

- प्रगती जाधव-पाटील (उपसंपादक, लोकमत, सातारा)

काही कारणाने फी भरली नाही तर शाळा टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) नाकारू शकते का?     - रसिका यादव, डोंबिवलीआपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे या उद्देशाने चांगल्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा पालकांचा आग्रह असतो. प्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांचे शैक्षणिक शुल्क पालक भरतात; पण आर्थिक कारणांनी पालक जेव्हा मुलांना शाळेतून काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ करते.  संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरल्याशिवाय हा दाखला न देण्याची भूमिका व्यवस्थापन घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याचा विचार करून कायद्यात स्वतंत्रपणे  तरतूद करण्यात आली आहे. 

एका शाळेकडून दुसऱ्या शाळेत सामील होण्यासाठी मुलाचे हस्तांतरण प्रमाणपत्र मिळविण्याचा अधिकार पालकांना आहे. कोणत्याही कारणास्तव, केवळ विद्यार्थ्याची फी भरलेली नाही म्हणून शाळेच्या अधिकाऱ्यांना हा दाखला देणे नाकारता येत नाही. शाळेच्या विविध प्रकारच्या शुल्कापोटी कोणतीही रक्कम देय असल्यास, वसुलीसाठी पालकांविरुद्ध योग्य कार्यवाही करण्याची मुभा कायद्याने शाळांना दिली आहे; पण शुल्क भरले नाही म्हणून शाळा सोडल्याचा दाखला नाकारणे हे बेकायदेशीर आहे. शाळा विनाअनुदानित असल्यास  तिच्या उदरनिर्वाहासाठी कायदेशीररीत्या देय असलेली फी मिळवण्याचा अधिकार शाळेलाही आहे; पण म्हणून शाळा एखाद्या मुलाला त्याच्या आवडीच्या दुसऱ्या शाळेत दाखल होण्यासाठी आवश्यक  दाखला नाकारू शकत नाही.

दाखला अडविण्याचे प्रकार पुढे आल्यास संबंधित शाळेच्या विरोधात शिक्षण विभागाकडे लेखी तक्रारीद्वारे दाद मागता येते. आपल्या तक्रारीत पालकांनी स्पष्टपणे शाळेचे नाव आणि आपली समस्या मांडणे अपेक्षित आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत शिक्षण विभागाकडून संबंधित शाळेला सूचनापत्र पाठविले जाते.  अपेक्षित उत्तर नाही मिळाले तर संबंधित शाळेच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला मागविला जातो.(सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी