शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

पाठ्यपुस्तके ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्यावरून राज्यातील शिक्षण तज्ज्ञांकडून कडाडून टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:09 IST

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी बालभारतीला विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके  ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्याचे पत्र पाठवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी बालभारतीला विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके  ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्याचे पत्र पाठवले आहे. मात्र, राज्यात विविध  भाषा आणि विषयांतील शेकडो तज्ज्ञ संशोधक असताना एनसीईआरटीच्या पुस्तकांचे भाषांतर करण्याची गरज नाही, असे म्हणत या भूमिकेवर राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, मराठीप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी टीका केली आहे. शालेय विद्यार्थ्यांची नीट, जेईईसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी सुलभ व्हावी, यासाठी हे धोरण असल्याचे पत्रात म्हटले आहे. 

बौद्धिक दिवाळखोरी !राज्यातील स्थानिक गरजा, भाषा, सांस्कृतिक विविधता आणि शैक्षणिक पारंपरिक अभ्यास लक्षात न घेता दिल्लीतून थेट पुस्तके स्वीकारणे, त्या पुस्तकांची केवळ भाषांतरे करणे म्हणजे ही बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘दुय्यम ठरवण्याचा प्रकार’मराठीशिवाय अन्य माध्यमांसाठी एनसीईआरटी किंवा सीबीएससीईच्या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर करून ती स्वीकारण्यात यावी. हे काम बालभारती मंडळाने करावे. राज्यातील शिक्षण वर्तुळातील जाणकारांनी या मुद्द्यालादेखील आक्षेप घेत वैचारिक दारिद्र्याचे हे लक्षण असल्याची बोचरी टीका केली. हे धोरण राज्यातील अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञांना दुय्यम ठरविण्यासारखे आहे, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बालभारती फक्त एनसीईआरटीच्या पुस्तकांचे ‘जसेच्या तसे’ अनुवाद करणारी सहायक कारकुनी संस्था करायची आहे का? आजवर गणित, विज्ञानाची पुस्तके महाराष्ट्रातील तज्ज्ञ, अभ्यासकच करत आले आहेत. आजच ते अपात्र झाले का? असा प्रश्न साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला.

मागील सुकाणू समितीच्या बैठकीत एनसीईआरटीच्या विज्ञान व गणिताच्या अभ्यासक्रमातून आवश्यक तो सर्व भाग घ्यावा. त्यानुसार राज्यातील पाठ्यपुस्तके तयारी करावीत, असे ठरले होते. आताच्या जीआरमध्येही तसेच म्हटलेले असून, केवळ ‘जशी आहेत तशी’ असा शब्द प्रयोग आल्याने गोंधळ झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज्य शालेय शिक्षण सुकाणू समितीचे मिलिंद नाईक यांनी दिली.

राज्यात पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके तयार करणारे संशोधक, तज्ज्ञ मंडळींसह सक्षम यंत्रणाही राज्यात आहे. दिल्लीच्या एनसीईआरटीच्या ओंजळीने पाणी पिण्याची गरज नाही. अन्यथा हे तर दिवाळखोरीचे लक्षण म्हणावे लागेल, असे महाराष्ट्र शिक्षक सेनेचे शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर म्हणाले.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनEducationशिक्षण