शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पहिली ते चौथीच्या विदयार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा ..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 11:17 IST

पास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी 

ठळक मुद्देपास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम 

पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन म्हणजे त्यांच्या आवडी निवडी, उपक्रमामधील सहभाग, परिवार अभ्यासाविषयी, सामान्य ज्ञानाविषयी असलेली माहिती आणि गणिताची सांडगी आकडेमोड, भाषेतील अक्षरांची शब्दांची ओळख व वाक्यरचना हे सारे असते. याचसोबत अंतिम निकालावर असते ती त्याचे वजन, उंची, खेळातील सहभाग यांच्याविषयीची माहिती असते. एकूणच आकारिक आणि संकलित मूल्यमापन या दोन्हीचा समावेश अंतिम निकालात असतो आणि त्या आधारावर त्यांचे गुणांकन केले जाते. मात्र यंदा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या संकलित मूल्यमापनावर विद्यार्थ्यांना वर्गोन्नतचा शेरा निकालावर मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणच घेतले नाही किंवा उपस्थिती नाही त्यांचे मूल्यांकन करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. 

राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी ? निकाल कसा द्यावा यासंबंधी मार्गदर्शक सूचना शाळांना दिल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नसल्याने शाळांना आणि तेथील शिक्षकांना विद्यर्थ्यांचे संकलित मूल्यमापनही करता आलेले नाही. त्यामुळे आरटीई कलम १६ च्या नियमानुसार प्रतिपुस्तकावर आरटीई ऍक्ट १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा देण्यात येणार आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फक्त संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्याची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्या काही छोट्या परीक्षा, चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यानुसार यंदा त्यांना गुणदान करून त्यांचे श्रेणीत रूपांतर करून त्यांना सदर शेरा देण्यात येईल अशी माहिती कुर्ला येथील शिशु विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अशोक वेताळ यांनी दिली.संकरित आणि आकारिक मूल्यमापन याना ५० - ५० गुणांची विभागणी करून हे मूल्यमापन करणे अपेक्षित होते मात्र अनेक विदयार्थ्यांची ऑनलाईन अनुपस्थिती, उपक्रमात असलेला प्रत्यक्ष सहभागाचे यांमुळे या सगळ्याला मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले. 

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम एससीईआरटीकडून नमूद करण्यात आल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे मूल्यमापन होऊ शकले नाही त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई शेरा नमूद करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारच्या विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे असे म्हटले आहे. तसेच एससीईआरटीकडून तयार करण्यात आलेल्या विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी, सोबत नियमित वर्ग शिकवणीची प्रक्रयाही पूर्ण करावॆ से स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एससीईआरटीकडून  शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार त्याचं सूचना स्वतंत्रते देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील पहिली ते चौथी विद्यार्थी संख्या पालिका - डिव्हायडी (उपसंचालक कार्यालय अखत्यारीतील)

  • पहिली - १३१८९५- २४३४० 
  • दुसरी - १३३३८१- २५२२२
  • तिसरी - १४०५७८- २५४९२ 
  • चौथी - १४६५२५- २४९३३

वर्षभरापासून घरात असल्याने आता सुट्टीचाही कंटाळा आला आहे. शाळा सुरु असती तर मित्रांना भेटलो असतो, खेळलो असतो आणि अभ्यासही झाला असता. - श्रवण राणे, चौथी, नरवडे प्राथमिक विद्यामंदिर आता ऑनलाईन अभ्यासाचा कंटाळा आहे. प्रगतीपुस्तक हातात आले नाही. मात्र आम्ही पास आहोत हे माहिती आहे. मात्र शाळा आता लवकरात लवकर सुरु व्हायला हवी. शिक्षकांसोबत शाळेत अभ्यास जास्त चांगला होतो. किमया आचरेकर, चौथी, दहिसर विद्यामंदिर 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या