शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पहिली ते चौथीच्या विदयार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा ..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 11:17 IST

पास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी 

ठळक मुद्देपास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम 

पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन म्हणजे त्यांच्या आवडी निवडी, उपक्रमामधील सहभाग, परिवार अभ्यासाविषयी, सामान्य ज्ञानाविषयी असलेली माहिती आणि गणिताची सांडगी आकडेमोड, भाषेतील अक्षरांची शब्दांची ओळख व वाक्यरचना हे सारे असते. याचसोबत अंतिम निकालावर असते ती त्याचे वजन, उंची, खेळातील सहभाग यांच्याविषयीची माहिती असते. एकूणच आकारिक आणि संकलित मूल्यमापन या दोन्हीचा समावेश अंतिम निकालात असतो आणि त्या आधारावर त्यांचे गुणांकन केले जाते. मात्र यंदा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या संकलित मूल्यमापनावर विद्यार्थ्यांना वर्गोन्नतचा शेरा निकालावर मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणच घेतले नाही किंवा उपस्थिती नाही त्यांचे मूल्यांकन करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. 

राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी ? निकाल कसा द्यावा यासंबंधी मार्गदर्शक सूचना शाळांना दिल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नसल्याने शाळांना आणि तेथील शिक्षकांना विद्यर्थ्यांचे संकलित मूल्यमापनही करता आलेले नाही. त्यामुळे आरटीई कलम १६ च्या नियमानुसार प्रतिपुस्तकावर आरटीई ऍक्ट १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा देण्यात येणार आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फक्त संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्याची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्या काही छोट्या परीक्षा, चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यानुसार यंदा त्यांना गुणदान करून त्यांचे श्रेणीत रूपांतर करून त्यांना सदर शेरा देण्यात येईल अशी माहिती कुर्ला येथील शिशु विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अशोक वेताळ यांनी दिली.संकरित आणि आकारिक मूल्यमापन याना ५० - ५० गुणांची विभागणी करून हे मूल्यमापन करणे अपेक्षित होते मात्र अनेक विदयार्थ्यांची ऑनलाईन अनुपस्थिती, उपक्रमात असलेला प्रत्यक्ष सहभागाचे यांमुळे या सगळ्याला मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले. 

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम एससीईआरटीकडून नमूद करण्यात आल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे मूल्यमापन होऊ शकले नाही त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई शेरा नमूद करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारच्या विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे असे म्हटले आहे. तसेच एससीईआरटीकडून तयार करण्यात आलेल्या विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी, सोबत नियमित वर्ग शिकवणीची प्रक्रयाही पूर्ण करावॆ से स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एससीईआरटीकडून  शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार त्याचं सूचना स्वतंत्रते देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील पहिली ते चौथी विद्यार्थी संख्या पालिका - डिव्हायडी (उपसंचालक कार्यालय अखत्यारीतील)

  • पहिली - १३१८९५- २४३४० 
  • दुसरी - १३३३८१- २५२२२
  • तिसरी - १४०५७८- २५४९२ 
  • चौथी - १४६५२५- २४९३३

वर्षभरापासून घरात असल्याने आता सुट्टीचाही कंटाळा आला आहे. शाळा सुरु असती तर मित्रांना भेटलो असतो, खेळलो असतो आणि अभ्यासही झाला असता. - श्रवण राणे, चौथी, नरवडे प्राथमिक विद्यामंदिर आता ऑनलाईन अभ्यासाचा कंटाळा आहे. प्रगतीपुस्तक हातात आले नाही. मात्र आम्ही पास आहोत हे माहिती आहे. मात्र शाळा आता लवकरात लवकर सुरु व्हायला हवी. शिक्षकांसोबत शाळेत अभ्यास जास्त चांगला होतो. किमया आचरेकर, चौथी, दहिसर विद्यामंदिर 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या