शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते चौथीच्या विदयार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा ..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 11:17 IST

पास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी 

ठळक मुद्देपास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम 

पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन म्हणजे त्यांच्या आवडी निवडी, उपक्रमामधील सहभाग, परिवार अभ्यासाविषयी, सामान्य ज्ञानाविषयी असलेली माहिती आणि गणिताची सांडगी आकडेमोड, भाषेतील अक्षरांची शब्दांची ओळख व वाक्यरचना हे सारे असते. याचसोबत अंतिम निकालावर असते ती त्याचे वजन, उंची, खेळातील सहभाग यांच्याविषयीची माहिती असते. एकूणच आकारिक आणि संकलित मूल्यमापन या दोन्हीचा समावेश अंतिम निकालात असतो आणि त्या आधारावर त्यांचे गुणांकन केले जाते. मात्र यंदा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या संकलित मूल्यमापनावर विद्यार्थ्यांना वर्गोन्नतचा शेरा निकालावर मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणच घेतले नाही किंवा उपस्थिती नाही त्यांचे मूल्यांकन करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. 

राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी ? निकाल कसा द्यावा यासंबंधी मार्गदर्शक सूचना शाळांना दिल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नसल्याने शाळांना आणि तेथील शिक्षकांना विद्यर्थ्यांचे संकलित मूल्यमापनही करता आलेले नाही. त्यामुळे आरटीई कलम १६ च्या नियमानुसार प्रतिपुस्तकावर आरटीई ऍक्ट १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा देण्यात येणार आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फक्त संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्याची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्या काही छोट्या परीक्षा, चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यानुसार यंदा त्यांना गुणदान करून त्यांचे श्रेणीत रूपांतर करून त्यांना सदर शेरा देण्यात येईल अशी माहिती कुर्ला येथील शिशु विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अशोक वेताळ यांनी दिली.संकरित आणि आकारिक मूल्यमापन याना ५० - ५० गुणांची विभागणी करून हे मूल्यमापन करणे अपेक्षित होते मात्र अनेक विदयार्थ्यांची ऑनलाईन अनुपस्थिती, उपक्रमात असलेला प्रत्यक्ष सहभागाचे यांमुळे या सगळ्याला मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले. 

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम एससीईआरटीकडून नमूद करण्यात आल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे मूल्यमापन होऊ शकले नाही त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई शेरा नमूद करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारच्या विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे असे म्हटले आहे. तसेच एससीईआरटीकडून तयार करण्यात आलेल्या विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी, सोबत नियमित वर्ग शिकवणीची प्रक्रयाही पूर्ण करावॆ से स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एससीईआरटीकडून  शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार त्याचं सूचना स्वतंत्रते देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील पहिली ते चौथी विद्यार्थी संख्या पालिका - डिव्हायडी (उपसंचालक कार्यालय अखत्यारीतील)

  • पहिली - १३१८९५- २४३४० 
  • दुसरी - १३३३८१- २५२२२
  • तिसरी - १४०५७८- २५४९२ 
  • चौथी - १४६५२५- २४९३३

वर्षभरापासून घरात असल्याने आता सुट्टीचाही कंटाळा आला आहे. शाळा सुरु असती तर मित्रांना भेटलो असतो, खेळलो असतो आणि अभ्यासही झाला असता. - श्रवण राणे, चौथी, नरवडे प्राथमिक विद्यामंदिर आता ऑनलाईन अभ्यासाचा कंटाळा आहे. प्रगतीपुस्तक हातात आले नाही. मात्र आम्ही पास आहोत हे माहिती आहे. मात्र शाळा आता लवकरात लवकर सुरु व्हायला हवी. शिक्षकांसोबत शाळेत अभ्यास जास्त चांगला होतो. किमया आचरेकर, चौथी, दहिसर विद्यामंदिर 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या