शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

दहावीच्या निकाल प्रक्रियेवर बहिष्कार! संतप्त शिक्षक संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 09:50 IST

अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेण्यास गेले असता, शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी सध्या देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे, असा आदेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिला आहे. तरीही शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांत पोहोचण्यास प्रचंड अडचणी येत असल्याने संतप्त शिक्षकांनी अखेर दहावी, बारावी निकालाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दहावीचा निकाल वेळेवर न लागल्यास त्याला सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार असेल, अशी भूमिका शिक्षक संघटनांनी जाहीर केली आहे.

अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेण्यास गेले असता, शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी सध्या देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत मुंबई लेव्हल-३ मधून लेव्हल-२ मध्ये जात नाही तोपर्यंत प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, यादरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून, दंड भरून लोकल प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासन शिक्षकांची परिस्थिती समजून न घेता परवानगी नाकारत असल्याने शिक्षक भारतीने बहिष्काराचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी व बारावीच्या निकालाच्या कामावर त्यांनी प्रवासास परवानगी न मिळाल्यास बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ५० टक्के उपस्थितीच्या निर्णयालाही विरोध करत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देऊन शिक्षणच देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केली आहे. 

शिक्षण राज्यमंत्र्यांचे संघटनेला आश्वासनnलोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांनी सविनय कायदेभंग करून आंदोलन उभे केले आहे. यानंतरही निर्णय लवकर न झाल्यास दहावीच्या निकालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, त्यासही सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. nदरम्यान, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी राज्य शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांच्याशी संवाद साधून शिक्षकांच्या समस्या मांडल्या. तेव्हा आज यासंदर्भातील निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती दराडे यांनी दिली.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल