शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

बोर्डाच्या परीक्षा आता होणार वर्षातून दोनदा; ११वी, १२वी मध्ये विषय निवडीचे स्वातंत्र्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 06:42 IST

दोन भाषांचा अभ्यास; किमान एक भाषा भारतीय असायला हवी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार केला असून त्याअंतर्गत आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील व विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याचा पर्याय असेल. विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीत विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल आणि यापैकी किमान एक भाषा भारतीय असावी.

‘इस्रो’चे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बनविलेल्या एनसीएफमध्ये म्हटले की, शाळा मंडळे योग्यवेळी मागणीनुसार परीक्षा घेण्याची क्षमता विकसित करतील. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार आहे आणि त्यावर आधारित, २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातील.

महत्त्वाचे काय?

  • दीर्घकाळासाठी सर्व मंडळांनी सेमिस्टर किंवा नियतकालिक पद्धतीचा अवलंब करावा.
  • एकूण प्रमाणीकरणात कामगिरीवर आधारित मूल्यांकनावर ७५ टक्के आणि लेखी परीक्षेवर २५ टक्के भर द्यावा.
  • विज्ञान आणि इतर विषयांचे मूल्यमापन कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असावे. विषयाच्या प्रमाणीकरणात त्याला २०-२५ टक्के महत्त्व असायला हवे.
टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय