शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बोर्डाच्या परीक्षा आता होणार वर्षातून दोनदा; ११वी, १२वी मध्ये विषय निवडीचे स्वातंत्र्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 06:42 IST

दोन भाषांचा अभ्यास; किमान एक भाषा भारतीय असायला हवी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार केला असून त्याअंतर्गत आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील व विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याचा पर्याय असेल. विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीत विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल आणि यापैकी किमान एक भाषा भारतीय असावी.

‘इस्रो’चे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बनविलेल्या एनसीएफमध्ये म्हटले की, शाळा मंडळे योग्यवेळी मागणीनुसार परीक्षा घेण्याची क्षमता विकसित करतील. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार आहे आणि त्यावर आधारित, २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातील.

महत्त्वाचे काय?

  • दीर्घकाळासाठी सर्व मंडळांनी सेमिस्टर किंवा नियतकालिक पद्धतीचा अवलंब करावा.
  • एकूण प्रमाणीकरणात कामगिरीवर आधारित मूल्यांकनावर ७५ टक्के आणि लेखी परीक्षेवर २५ टक्के भर द्यावा.
  • विज्ञान आणि इतर विषयांचे मूल्यमापन कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असावे. विषयाच्या प्रमाणीकरणात त्याला २०-२५ टक्के महत्त्व असायला हवे.
टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय