शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे! विद्यार्थी संख्येत मात्र झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 06:28 IST

कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर टांगती तलवार असताना, राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे लागल्याचे वास्तव समोर आले आहे.

मुंबई :

कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर टांगती तलवार असताना, राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे लागल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ वर्षात राज्यात १ लाख १० हजार ११४ शाळा अस्तित्वात होत्या. मात्र, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात त्यामधील विविध व्यवस्थापनांच्या ५०९ शाळा बंद झाल्या आहेत. शाळा बंद झाल्यामुळे शिक्षक संख्येतही १५ हजारांहून अधिकची घट झाली आहे, तर मागील वर्षीपेक्षा यंदाच्या विद्यार्थी प्रवेशांत मात्र ७४ हजार ८५६ विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 

राज्यात सध्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची काय स्थिती आहे, याची माहिती शिक्षण विभागाकडून शासनाने मागविल्यानंतर असंतोष निर्माण झाला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर न करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून केली जात आहे. 

मराठी अभ्यास केंद्राकडून मराठी शाळांसाठी बृहत आराखडा सादर करून, ग्रामीण आणि आवश्यकता असलेल्या भागात २,५०० शाळांची आवश्यकता असल्याचे निवेदन शासनास सादर करून, त्याला मान्यता मागितली होती. मात्र, २०१७ साली तो रद्द करण्यात आल्याने जिथे आवश्यकता होती, तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. विद्यार्थी संख्या वाढत असताना, शाळांची संख्या घटल्यास ते हानिकारक असेल. - सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ

शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्यावर्ष    २०२०-२१    २०२१-२२राज्यातील शाळा    १,१०,११४    १,०९,६०५ शिक्षक संख्या    ७,६६,९१६    ७,४८,५८९ विद्यार्थी संख्या    २,२५,११,८३९    २,२५,८६,६९५

टॅग्स :Educationशिक्षण