शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

खासगी शाळांच्या शुल्कात १५ टक्के कपात, ठाकरे सरकारचा निर्णय; संस्थाचालक कोर्टात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 09:51 IST

मंत्रिमंडळाचा निर्णय; शुल्क भरलेल्यांचे काय? संदिग्धता कायम

मुंबई : सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या खासगी शाळांमधील शालेय शुल्कात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, ज्यांनी आधी हे शुल्क भरले आहे, त्यांना त्यातील १५ टक्के रक्कम परत मिळणार काय, याबाबत संदिग्धता कायम आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, शालेय शुल्कात कपात करण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानप्रकरणी दिले होते. राजस्थान सरकारने शालेय शुल्कात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा निर्णय आज घेण्यात आला आहे. राज्य बोर्डासह सर्व बोर्डाच्या शाळांकरिता हा निर्णय लागू राहील. ज्या शाळा पंधरा टक्के शुल्क कपात करणार नाहीत, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली जाईल, असेही त्या म्हणाल्या.

काही शाळांनी आधीच मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ केली आहे, याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या की, शुल्कवाढ करू नये, असा आदेश गेल्यावर्षीच काढण्यात आला होता. या आदेशाचे उल्लंघन एखाद्या शाळेने केले असेल तर त्याविरुद्ध कारवाई केली जाईल. कोरोना लॉकडाऊनमुळे लाखो पालकांची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने आजचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांचे पूर्ण शुल्क आधीच भरले आहे, त्यांना पंधरा टक्के रक्कम परत दिली जाईल काय, या पत्रकारांच्या प्रश्नावर गायकवाड यांनी स्पष्ट केले की, येत्या तीन-चार दिवसांत यासंदर्भात स्वयंस्पष्ट असा आदेश काढण्यात येईल. १५ टक्के शुल्क निश्चितपणे परत केले जाईल, अशी कोणतीही भूमिका गायकवाड यांनी आज पत्रकारांसमोर मांडली नाही. त्यामुळे शासन नेमका काय अध्यादेश काढणार, आधी शुल्क भरलेल्यांना १५ टक्‍के रक्कम परत मिळणार का, याबाबतची संदिग्धता कायम आहे.

ना पालक खूश ना संस्थाचालकशाळांचे शुल्क १५ टक्के कमी करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिक्षण संस्थाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पालकांच्या संघटनेनेदेखील या निर्णयास विरोध केला आहे. त्यामुळे पालकही खूश नाहीत आणि संस्थाचालकही खूश नाहीत, असे चित्र आहे.

आजचा निर्णय ही निव्वळ धूळफेक आहे. संस्थाचालकांनी आधीच २५ ते ४०% शुल्कवाढ केली आहे. आता १५% शुल्ककपातीचा लॉलीपॉप सरकार दाखवत आहे. शाळांचे ऑडिट करून त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार शुल्ककपात निश्चित करावी. - अनुभा सहाय, इंडिया वाइड पॅरेंट्स असोसिएशन

शाळा संस्थाचालकांनी पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन २५ टक्के शालेय शुल्ककपात आधीच केलेली आहे. वरून सरकार आता १५ टक्के कपात लादत आहे. ती आम्हाला मान्य नाही. या निर्णयाविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागू. - संजयराव तायडे पाटील, राज्य अध्यक्ष, मेस्टा

टॅग्स :SchoolशाळाCourtन्यायालयEducationशिक्षण