शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइनच; दहावी १५ मार्च, बारावी ४ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:13 IST

यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नियमित मूल्यांकन पद्धतीने होणार.

मुंबई : यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नियमित मूल्यांकन पद्धतीने होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. सोबतच दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान, तर बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी व बारावीचे वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून तयार होते. मात्र, बऱ्याच दिवसांपासून ते सरकारी पातळीवर मंजुरीसाठी प्रलंबित होते. अखेर शिक्षण विभागाकडून या वेळापत्रकाला मंजुरी मिळाली आहे. यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा या २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान, तर बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी/ अंतर्गत परीक्षा या १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान पार पडतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करीत परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, तर दहावी परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

उर्वरित अभ्यासक्रमावरच परीक्षाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत उर्वरित अभ्यासक्रमावरच प्रश्न विचारले जाणार आहेत. याशिवाय प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आउट ऑफ टर्न परीक्षा ५ ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे.

सीबीएसई परीक्षा केंद्रे दुपटीपेक्षा अधिकइयत्ता १० वी व १२ वीच्या सत्र परीक्षेच्या केंद्रांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

१० वी व १२ वीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या जात आहेत. यासाठी देशात ६ हजार केंद्रे होती. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा केंद्रांची संख्या १४ हजार करण्यात आली. या परीक्षा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सीबीएसईने प्राधान्य दिले असून यासाठी हा निर्णय घेतल्याचे सीबीएसईने  पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रVarsha Gaikwadवर्षा गायकवाड