शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मुंबई विभागात अकरावीच्या एक लाख जागा रिक्त; वाणिज्य शाखेसाठी झाले सर्वाधिक प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 1:32 AM

एकूण जागांमध्ये वाढ केल्याने रिक्त जागांची संख्या वाढल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत

मुंबई : मुंबई विभागात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक लाख ०८ हजार ०७१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यात सर्वांत जास्त विज्ञान शाखेच्या ४६,९२०, त्यानंतर वाणिज्यच्या ४२,५२३ तर कला शाखेच्या १६,२२४ जागा रिक्त राहिल्या आहेत. एचएसव्हीसी अभ्यासक्रमाच्या २,४०४ रिक्त जागांचाही यात समावेश आहे. सर्वांत जास्त १,३४,७३३ प्रवेश हे वाणिज्य शाखेत झाले. एसईबीसी संवर्गासाठी यंदा एकूण १० टक्के जागा वाढविण्यात आल्या, त्याचा फटका बसून रिक्त जागांच्या संख्येत वाढ झाल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

मुंबई विभागात यंदा प्रवेशासाठी ३,२६,७९६ जागा होत्या. यापैकी १,८८, ८२४ जागा या आॅनलाइन प्रवेशासाठी तर १,३७,९७२ जागा या कोटा प्रवेशासाठी होत्या. त्यातील एकूण २,१८,७२५ जागांवर प्रवेश निश्चिती झाली. अकरावीच्या एकूण प्रवेशांत राज्य मंडळाच्या १,९७,४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर सीबीएसईच्या ७,१८३, आयसीएसई १०,१२४, आयजीसीएसई १२०६, आयबी १०, एनआयओएसच्या ७१३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. यात इतर मंडळाचे २,००२ विद्यार्थी आहेत. खुल्या वर्गातून प्रवेश घेणाऱ्याची संख्या १,५७,०९६ तर एसईबीसी संवर्गातून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या फक्त ५,६६२ आहे. आर्थिक दुर्बल घटकांतून केवळ १,४२९ तर इतर मागास प्रवर्गातूून २४,४२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.मुंबईत सर्वाधिक एक लाख ०८ हजार जागा रिक्तयंदाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे ते चर्चेत राहिले. राज्य मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्याने सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या तुलनेत कमी गुण असलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांपासून वंचित राहावे लागले. यावर पर्याय म्हणून राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालये मिळावीत यासाठी काही महाविद्यालयांना १० टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, उपलब्ध जागांची संख्या वाढली. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागा मुळातच जास्त असताना, त्यात १० टक्के वाढीव जागांची भर पडली. मुंबईत सर्वाधिक एक लाख ०८ हजार ०७१ जागा रिक्त राहिल्या आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी