शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

नाना तुम्हारा चुक्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:12 IST

गेल्या दोन-अडीच वर्षांत इनकमिंग झालेल्या नावावर नजर टाकली तर मुंबईचे दहीहंडी फेम राम कदम मनसेतून आले.

- सुधीर महाजनगेल्या दोन-अडीच वर्षांत इनकमिंग झालेल्या नावावर नजर टाकली तर मुंबईचे दहीहंडी फेम राम कदम मनसेतून आले. तसे प्रवीण दरेकरही मनसेचेच. पुण्याचे खा. संजय काकडे, काटोलचे आमदार आशिष देशमुख, धुळ्याचे अनिल गोटे, शिवाजीराव नाईक, अनिल बोंडे, गंगापूरचे प्रशांत बंब, किसन कथोरे आणि राष्ट्रवादीत असलेले प्रसाद लाड यांनाही भाजपने पावन करून घेतले.या नाना मंडळींना झालंय तरी काय? तिकडे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा अगोचरपणा केला नाही तर थेट पक्षच सोडला. खासदारकीवर पाणी सोडले. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी एवढी शर्यत असताना नाना पटोलेंना म्हणावे तरी काय? दुसºया नानाची कथा आणखी वेगळी. ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे. त्यांनीही आता खरे खरे बोलण्याचे ठरवले आहे का? औरंगाबादेत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ‘मर्डरर म्हणजे खुनी आणि वेडे सोडून भाजपमध्ये कोणालाही प्रवेश देतात असे वक्तव्य करून त्यांनी धमाल उडवून दिली.नानांना नेमके म्हणायचे होते तरी काय? खुनी हा शब्द आपण समजू शकतो, पण वेडा कोणाला म्हणायचे? तसा विचार केला तर ज्यांच्यासमोर नाना बोलत होते ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते. अगदी जनसंघापासून त्यांची ही निष्ठा. लोकसभेत भाजपचे केवळ दोन खासदार असताना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी घरची भाकरी खाऊन बाहेर किल्ला लढवलेली ही मंडळी. भाजपच्या आजच्या प्रभावळीतून त्यांची नावे गायब आहेत. यांना अजिबात सत्तास्पर्श नाही. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी या निष्ठावंतांनी सर्व पणाला लावले. बागडेंना हे ‘वेडे’ अपेक्षित आहेत का? कारण आजच्या भाजपच्या राजकीय संस्कृतीत हे ‘मिस फिट’ असल्याने वेडेच ठरतात. हवेचा रोख बदलून दिशा बदलणाºयांचा हा काळ आहे. हा बदल ज्यांच्या ध्यानात येतो व मार्ग बदलण्याचा चाणाक्षपणा दाखवतात, ते आजच्या राजकारणात हुशार ठरतात. म्हणजे बागडेंच्या म्हणण्याप्रमाणे ते वेडे नसतात. निष्ठावान मंडळींना नेमके हेच जमले नाही. भाजपमध्ये निष्ठावंत दुर्लक्षित झाले ही सल सगळ्या जुन्या-जाणत्यांना बोचते. जेथे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अडगळीत गेले तेथे एकेकाळच्या गावपुढाºयांचे काय? स्टार्टअप इंडियासाठी शार्प ब्रेन असणारी स्मार्ट पिढीची डिमांड आहे. त्यात निष्ठावानांना स्थान नाही. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बोचणारे शल्य एकच. इतकी वर्षे संघर्ष करीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे तप केले तर ‘हेचि फळ काय मम तपाला’ कारण हा कार्यकर्ता आज दुर्लक्षित आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आली असताना जुने अडगळीत लोटले गेले. नव्या नेत्यांना तर जुने व्यासपीठावरही नको असतात. काहींनी भावना व्यक्त केल्या. गुळाला मुंगळे लागतात तसे सत्तेभोवती अशा मुंगळ्यांची गर्दी होणार, पण गूळ त्यांना फस्त करू द्यायचा का, हाच त्यांचा रोकडा सवाल आहे. पक्षात लोक आले, तर विस्तार होईल, शक्ती वाढणार, पण येणाºया प्रत्येकालाच खांद्यावर घेणार का? जुन्यांच्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची गैरहजेरी जाणवली. ते येणार होते, पण ऐनवेळी ते भाजपमध्ये नव्यानेच आलेल्या एका नेत्याच्या शक्तिप्रदर्शन कार्यक्रमात सामील झाले. त्यांची ही गैरहजेरीसुद्धा चर्चेचा विषय झाला.दोन महिन्यांपूर्वी सुरेश हिरे यांनी औरंगाबाद शहरातील जुन्या कार्यकर्त्यांची अशीच बैठक बोलावली होती. त्यानंतर ही मोठी बैठक झाली. ती दयाराम बसैये बंधूंच्या पुढाकाराने. घरोघर, गावोगाव जाऊन त्यांनी या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. देवजीभाई पटेल, रामभाऊ गावंडे, जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, पांडुरंग बनकर, भाऊसाहेब दहीहंडे, कन्हैयालाल सिद्ध, सुरेश हिरे, ही एकेकाळची आघाडीची मंडळी एकत्र आली. निमित्त होते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसाचे. जुन्या कार्यकर्त्यांनी म्हणजे बागडेंच्या भाषेत वेड्यांनी गाळलेला घाम, सांडलेल्या रक्तामुळे पक्ष वाढला, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे, अशी भावना व्यक्त झाली. ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ अशी स्थिती भाजपमध्ये येणाºयांची आहे. म्हणून अनेक जण पापक्षालनासाठी निघाले आहेत. वेड घेऊन पेडगावला जाणाºयांना विरोध नानांनी केला, पण बेरकेबाज राजकारण्याच्या भाषेत सांगायचे तर ‘नाना तुम्हारा चुक्याच’ 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडे