शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नाना तुम्हारा चुक्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:12 IST

गेल्या दोन-अडीच वर्षांत इनकमिंग झालेल्या नावावर नजर टाकली तर मुंबईचे दहीहंडी फेम राम कदम मनसेतून आले.

- सुधीर महाजनगेल्या दोन-अडीच वर्षांत इनकमिंग झालेल्या नावावर नजर टाकली तर मुंबईचे दहीहंडी फेम राम कदम मनसेतून आले. तसे प्रवीण दरेकरही मनसेचेच. पुण्याचे खा. संजय काकडे, काटोलचे आमदार आशिष देशमुख, धुळ्याचे अनिल गोटे, शिवाजीराव नाईक, अनिल बोंडे, गंगापूरचे प्रशांत बंब, किसन कथोरे आणि राष्ट्रवादीत असलेले प्रसाद लाड यांनाही भाजपने पावन करून घेतले.या नाना मंडळींना झालंय तरी काय? तिकडे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा अगोचरपणा केला नाही तर थेट पक्षच सोडला. खासदारकीवर पाणी सोडले. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी एवढी शर्यत असताना नाना पटोलेंना म्हणावे तरी काय? दुसºया नानाची कथा आणखी वेगळी. ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे. त्यांनीही आता खरे खरे बोलण्याचे ठरवले आहे का? औरंगाबादेत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ‘मर्डरर म्हणजे खुनी आणि वेडे सोडून भाजपमध्ये कोणालाही प्रवेश देतात असे वक्तव्य करून त्यांनी धमाल उडवून दिली.नानांना नेमके म्हणायचे होते तरी काय? खुनी हा शब्द आपण समजू शकतो, पण वेडा कोणाला म्हणायचे? तसा विचार केला तर ज्यांच्यासमोर नाना बोलत होते ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते. अगदी जनसंघापासून त्यांची ही निष्ठा. लोकसभेत भाजपचे केवळ दोन खासदार असताना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी घरची भाकरी खाऊन बाहेर किल्ला लढवलेली ही मंडळी. भाजपच्या आजच्या प्रभावळीतून त्यांची नावे गायब आहेत. यांना अजिबात सत्तास्पर्श नाही. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी या निष्ठावंतांनी सर्व पणाला लावले. बागडेंना हे ‘वेडे’ अपेक्षित आहेत का? कारण आजच्या भाजपच्या राजकीय संस्कृतीत हे ‘मिस फिट’ असल्याने वेडेच ठरतात. हवेचा रोख बदलून दिशा बदलणाºयांचा हा काळ आहे. हा बदल ज्यांच्या ध्यानात येतो व मार्ग बदलण्याचा चाणाक्षपणा दाखवतात, ते आजच्या राजकारणात हुशार ठरतात. म्हणजे बागडेंच्या म्हणण्याप्रमाणे ते वेडे नसतात. निष्ठावान मंडळींना नेमके हेच जमले नाही. भाजपमध्ये निष्ठावंत दुर्लक्षित झाले ही सल सगळ्या जुन्या-जाणत्यांना बोचते. जेथे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अडगळीत गेले तेथे एकेकाळच्या गावपुढाºयांचे काय? स्टार्टअप इंडियासाठी शार्प ब्रेन असणारी स्मार्ट पिढीची डिमांड आहे. त्यात निष्ठावानांना स्थान नाही. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बोचणारे शल्य एकच. इतकी वर्षे संघर्ष करीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे तप केले तर ‘हेचि फळ काय मम तपाला’ कारण हा कार्यकर्ता आज दुर्लक्षित आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आली असताना जुने अडगळीत लोटले गेले. नव्या नेत्यांना तर जुने व्यासपीठावरही नको असतात. काहींनी भावना व्यक्त केल्या. गुळाला मुंगळे लागतात तसे सत्तेभोवती अशा मुंगळ्यांची गर्दी होणार, पण गूळ त्यांना फस्त करू द्यायचा का, हाच त्यांचा रोकडा सवाल आहे. पक्षात लोक आले, तर विस्तार होईल, शक्ती वाढणार, पण येणाºया प्रत्येकालाच खांद्यावर घेणार का? जुन्यांच्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची गैरहजेरी जाणवली. ते येणार होते, पण ऐनवेळी ते भाजपमध्ये नव्यानेच आलेल्या एका नेत्याच्या शक्तिप्रदर्शन कार्यक्रमात सामील झाले. त्यांची ही गैरहजेरीसुद्धा चर्चेचा विषय झाला.दोन महिन्यांपूर्वी सुरेश हिरे यांनी औरंगाबाद शहरातील जुन्या कार्यकर्त्यांची अशीच बैठक बोलावली होती. त्यानंतर ही मोठी बैठक झाली. ती दयाराम बसैये बंधूंच्या पुढाकाराने. घरोघर, गावोगाव जाऊन त्यांनी या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. देवजीभाई पटेल, रामभाऊ गावंडे, जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, पांडुरंग बनकर, भाऊसाहेब दहीहंडे, कन्हैयालाल सिद्ध, सुरेश हिरे, ही एकेकाळची आघाडीची मंडळी एकत्र आली. निमित्त होते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसाचे. जुन्या कार्यकर्त्यांनी म्हणजे बागडेंच्या भाषेत वेड्यांनी गाळलेला घाम, सांडलेल्या रक्तामुळे पक्ष वाढला, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे, अशी भावना व्यक्त झाली. ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ अशी स्थिती भाजपमध्ये येणाºयांची आहे. म्हणून अनेक जण पापक्षालनासाठी निघाले आहेत. वेड घेऊन पेडगावला जाणाºयांना विरोध नानांनी केला, पण बेरकेबाज राजकारण्याच्या भाषेत सांगायचे तर ‘नाना तुम्हारा चुक्याच’ 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडे