शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 01:12 IST

खय्याम साहेबांना संगीताखेरीज आणखी एक आवड होती, ती म्हणजे गप्पा मारायची.

- संजीव साबडे (समूह वृत्तसमन्वयक, लोकमत)आपल्याला काही ठरावीक गाणी आवडतात, याचे मुख्य कारण त्यांना दिलेल्या चाली हेच असते. एखादी चाल आवडली की ते गाणे आपल्याला आवडते आणि लक्षातही राहते. नंतर ते आपण सतत गुणगुणू लागतो. चालीशिवाय गाणे लक्षात राहणे अवघड वा अशक्यच असते. त्यामुळे गाण्यांना दिलेली चाल वा संगीत याचे स्वत:चे एक वैशिष्ट्य आहे. याची प्रकर्षाने जाणीव व्हावी, अशी गाणी जुन्या पिढीतील अनेक संगीतकारांनी दिली. आपणच काय, पण लहान मुलेही तीच जुनी गाणी अलीकडे गाताना दिसतात. अशा या जुन्या पिढीतील खय्याम साहेब सोमवारी रात्री निवर्तले. ते बराच काळ आजारी होते आणि वयाची ९२ वर्षेही त्यांनी पार केली होती. त्यामुळे त्यांचे जाणे फारसे धक्कादायक नसले, तरी दु:खदायक मात्र आहे.

गुलाम मोहमद, नौशाद अशा जुन्या पिढीतील खय्यामसाहेब अगदी आतापर्यंत संगीत क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट २0१६ सालचा. तो प्रदर्शित झाला नसला तरी वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांच्या रोमारोमात संगीत असल्याचा तो पुरावा होता. त्यांचे पूर्ण नाव मोहमद जहूर खय्याम हाश्मी असले तरी संगीतप्रेमींसाठी ते खय्यामच होते. जवळपास ६८ वर्षे ते चित्रपटांना आणि त्यांतील गीतांना संगीतबद्ध करीत राहिले. मात्र एवढ्या काळात त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या ६0 च्या आतच आहे. याचे कारण त्यांनी संगीतकार म्हणून कधी घाई केली नाही. चित्रपटांचे विषय पाहून त्यांनी आपण त्याला संगीत देऊ शकतो की नाही, हे ठरविले. बहुधा त्याचमुळे त्यांनी संगीत दिलेली बहुसंख्य गीते अतिशय लोकप्रिय झाली.

खय्याम म्हणताच आठवतात ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, ‘बाजार’ या चित्रपटांतील गाणी. कभी कभी चित्रपटात प्रेमाचा बाजार नव्हता. उमराव जान हाही बाजारी चित्रपट नव्हता आणि बाजार हा तर प्रत्यक्षात हळवा चित्रपट म्हणता येईल. खय्याम साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गाण्यांना जो संगीताचा बाज चढवला, तोही तशाच प्रकारचा होता. पहाडी राग हा त्यांचा खास आवडता राग. त्या रागात त्यांनी अनेक फिल्मी गीते संगीतबद्ध केली.

खय्याम साहेबांनी संगीत दिलेले बाजारमधील ‘हम है मता ए कुचा, ओ बाजार की तरह’ वा ‘दिखाई दिये यूँ के बेखुद किया, हमे आप से भी जुदा कर चले’ हे गाणे असो, ते त्या शब्दांमुळे लक्षात राहूच शकत नाही. ते लक्षात राहते ते केवळ संगीताच्या बाजामुळे. वो सुबह कभी तो आएगी आणि आसमां पे है खुदा और जमीं पे हम, (फिर सुबह होगी), बहारों, मेरा जीवन भी सवारो (आखरी खत), ए दिले नादान (रझिया सुलतान), दिल चीज क्या है, इन आखों की मस्ती के, ये क्या जगह है दोस्तो (उमराव जान) अशी शेकडो गाणी आजही संगीतरसिकांना भुरळ घालतात. याशिवाय खानदान, थोडीसी बेवफाई, त्रिशूल, नूरी, आहिस्ता आहिस्ता, पर्बत के उस पार अशा त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांतील गाणी आजही मनात रुंजी घालत राहतात.

त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात निष्कारण वाद्यांचा धांगडधिंगा आढळत नाही. वाद्यांचा बारकाईने वापर करणे आणि तालवाद्यांचा अतिवापर नसणे ही खय्याम साहेबांच्या संगीताची वैशिष्ट्ये. त्यामुळे त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचे शब्द लक्षात राहिले नाहीत, असे होत नाही. किंबहुना गाण्यातील भावना व शब्द रसिकांपर्यंत नीट पोहोचावेत, असाच त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी संगीत दिलेल्या ‘शगुन’ चित्रपटातील ‘तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो’ हे गाणे तर खूपच गाजले. खय्याम साहेबांच्या पत्नी जगजीत कौर यांनी ते गायले होते.

खय्याम साहेबांना संगीताखेरीज आणखी एक आवड होती, ती म्हणजे गप्पा मारायची. गप्पांत ते अनेक आठवणी सांगत, एखाद्या गीताचे संगीत कसे सुचले, ते सांगत. फोनवर असो की समोरासमोर बसलेले असो, ते गप्पांमध्ये रंगून जात. त्यांना फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार मिळाले, संगीत नाटक अकादमीने त्यांचा गौरव केला आणि ^‘पद्मभूषण’ किताबही त्यांना मिळाला; पण खय्याम प्रसिद्धीच्या मागे मात्र धावले नाहीत. मी ओळखला जातो संगीतकार म्हणून. त्यामुळे मी नव्हे, तर माझे संगीतच बोलते, असे ते म्हणत. त्यांनी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून आपली सारी संपत्ती ट्रस्टला दिली होती. आपण व पत्नी यांचे फार आयुष्य शिल्लक नाही, हे ते ओळखून होते. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील गरजू तंत्रज्ञ व कलाकार यांना त्या ट्रस्टद्वारे ते मदत करीत. चित्रपटांतून आलेला पैसा त्यांनी पुन्हा चित्रपटांसाठीच दिला, असे म्हणता येईल.

टॅग्स :Mohammed Zahur Khayyamमोहम्मद जहूर खय्याम