शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तू कर वटवट...

By admin | Updated: November 12, 2016 01:12 IST

अखेर पुन्हा एकदा थेट सर्वोच्च न्यायालयालाच राजधानी दिल्लीतील वाढत्या आणि अधिकाधिक घातक होत चाललेल्या प्रदूषणाच्या प्रश्नात लक्ष घालणे भाग पडले आहे.

अखेर पुन्हा एकदा थेट सर्वोच्च न्यायालयालाच राजधानी दिल्लीतील वाढत्या आणि अधिकाधिक घातक होत चाललेल्या प्रदूषणाच्या प्रश्नात लक्ष घालणे भाग पडले आहे. याचे महत्वाचे कारण दिल्ली शहरावर नेमकी हुकुमत केन्द्र सरकारची की तेथील राज्य सरकारची यावरुन पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या विरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छेडलेली ‘जंग’! अर्थात न्यायालयाने दिल्ली शहराच्या प्रदूषण प्रकरणी प्रथमच हस्तक्षेप केला असे नाही. या आधीही तो केला होता आणि प्रदूषणाचे मोठे कारण समजल्या जाणाऱ्या मोटारींच्या वर्दळीवर निर्बन्ध लादण्यासाठी सम-विषमचा उपाय न्यायालयानेच सुचविला होता. शिवाय पंधरा वर्षांहून अधिक जुन्या मोटारी आणि मालमोटारी यांना प्रवेशबंदी, भल्यामोठ्या आलिशान पण डिझेलवर चालणाऱ्या नव्या मोटारींच्या नोंदणीवर प्रतिबंध असे काही उपायही न्यायालयानेच सुचविले होते. पण या उपायांचा काहीही किंवा फारसा उपयोग झाला नसल्याचे आता आढळून आले आहे. आता नव्याने प्रदूषणाचे खलनायक निश्चित करताना, सुरु असलेली बांधकामे व जुन्या बांधकामांची मोडतोड यातून हवेत पसरणारे धुळीचे कण, केरकचरा आणि विशेषत: झाडांचा वाळलेला पालापाचोळा यांचे ज्वलन यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले आहे. पण या विषयावर न्यायालय इतके संतप्त झाले की, प्रदूषणाने लोक मरण्याची सरकार वाट पाहात आहे का आणि त्यानंतरच जागे होणार आहे का, असा जळजळीत सवाल न्या. ठाकूर यांनी सरकारी वकिलाला विचारला. सबब येत्या १९ तारखेला सरकारने प्रदूषणासंबंधी सर्व लोकांची एक बैठक पाचारण करावी आणि उपाययोजन तयार करुन ती सादर करावी असा आदेशच न्यायालयाने जारी केला आहे. या उपाययोजनेवर लगेच २५ तारखेस सुनावणी घेतली जााणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री सध्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त आहेत आणि दिल्लीची सत्ता म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची व नागरी विकासाची जबाबदारी इतक्याच मर्यादित अर्थाने ते बघत असावेत. हे दोन्ही विभाग केन्द्राच्या अखत्यारित असल्याने पंतप्रधान मोदींशी येताजाता दोन हात करण्यातच त्यांचा बव्हंशी वेळ खर्ची पडत असल्याने त्यांना प्रदूषणाशी काही कर्तव्य नसावे असेच एकूण चित्र आहे. अर्थात दिल्लीतील प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील हतबल असल्याचेच न्यायालयासमोर उघड झाले आहे. एकूणात दिल्लीशी संबंधित उभय सरकारांची न्यायालयांप्रतीची भावना आणि भूमिका ‘तू कर वटवट आणि मी आहे निगरगट्ट’ अशीच असावी असे दिसते.