शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 06:17 IST

सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा  “लाइक्स”च्या आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणाा फास तयार झाला आहे.

- नंदकिशोर पाटील, कार्यकारी संपादक, लोकमत

समीर गायकवाड, पूजा चव्हाण, रफी शेख, सिया कक्कर ही नावे अनेकांच्या चांगल्याच परिचयाची आहेत. विशेषत: जे सोशल मीडिया नावाच्या आभासी दुनियेत वावरत असतात, त्यांच्यापैकी अनेकांसाठी तर ही मंडळी ‘आयकाॅन’ असू शकतील. वर उल्लेख केलेल्या नावांच्या व्यक्ती नाव, गाव, स्थलपरत्वे भिन्न असतील; पण त्यांच्यात एक साधर्म्य आहे, ते म्हणजे, हे सगळे जण टिक-टाॅक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरचे स्टार आहेत आणि या सर्वांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा अकाली संपविली आहे. नाचगाणे, अथवा काॅमेडीचा एखादा व्हिडिओ पोस्ट करून ही मंडळी रातोरात स्टार बनली होती. पुढे तो त्यांचा दिनक्रम बनला आणि त्यातून त्यांना लाखो चाहतेही (फाॅलोअर्स) मिळाले. लाइक्स, शेअर अन्‌ कमेंटची अक्षरश: झिंग चढलेले आभासी दुनियेतील हे तथाकथित स्टार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलतात, हा  चिंतनाचा आणि सामाजिक चिंतेचा विषय आहे. एखाद्याच्या आत्महत्येमागे कौटुंबिक, आर्थिक वा इतर काही वैयक्तिक कारणे असू शकतात, पण सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा “लाइक्स”च्या  आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणा फास  तयार झाला आहे. मिळालेली प्रसिद्धी हाताळू न शकलेले अनेक तरुण चेहेरे अचानक गायब तरी होतात, विस्म्रृतीत जातात. ज्यांना हे असे विसरले जाणे, विसरले जाण्याची शक्यताही सहन करता येत नाही, ते स्वत:लाच संपविण्याचा मार्ग पत्करतात  असे दिसते.  

तारुण्यात आयुष्याचा अकाली अंत करून घेण्यापूर्वी त्यांनी घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घेतला असता तर कदाचित त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले नसते; पण आजकाल त्यांना विचारते कोण? घरच्यांपेक्षा मित्र-मैत्रिणी, फेसबुक फ्रेंड‌स्‌ जवळचे वाटू लागले आहेत. फेसबुकवरच्या न्यूज फिडवर सतत व्यक्त होणारी ही पिढी इतरांचे काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसते. व्हर्च्युअल आणि खऱ्या आयुष्याची गल्लत झाल्याने ऑनलाइनवर जे दिसते तेच खरे मानून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणारी तरुणाई भावनिक हिंदोळ्यात अडकली, की पुरती गोंधळून जाते. सोशल मीडियात मिळणाऱ्या लाइक्समुळे त्यांच्यात एक प्रकारचा सुपरिऑरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो. स्वत:ला ते आयकॉन, मॉडेल समजू लागतात. त्यामुळे विरोधातली एखादी कमेंटही त्यांना अस्वस्थ करून जाते. आपला स्टारडम कमी होईल की काय, अशा अनामिक भीतीच्या सावटात ते सतत वावरत असतात. नार्सिस्ट होतात म्हणजे स्वतःच्याच प्रेमात असतात. हल्ली हा रोग तर समाजातील अनेकांना जडलेला आहे.

सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण जगभर वाढू लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार जगभरात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते आणि त्यात तरुणांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. मानसिक तणाव हे आत्महत्यांमागचे प्रमुख कारण  आहे. व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्यांना सतत भावनिक चढ-उताराचा सामना करावा लागतो. इथल्या स्पर्धेत आपण अव्वल राहू की नाही, या भीतीपोटी ते अधिकाधिक वेळ ऑनलाइन असतात. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे रातोरात स्टार बनलेले नाहीत. त्यांच्या स्टारडममागे अपार मेहनत आहे. त्यांच्याही आयुष्यात मान-अपमानाचे प्रसंग आले, त्यांनाही यशाने अनेकदा हुलकावणी दिली; पण म्हणून ते खचले नाहीत. स्टारडमसुद्धा तितक्याच निगुतीने जपावे लागते. त्यासाठी प्रयत्नांचे सातत्य लागते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मुलांना हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. वयात आलेल्या मुलांच्या वर्तनात अचानक झालेला बदल हा सोशल मीडियाचा परिणाम असू शकतो आणि तो वेळीच हेरता आला नाही, तर पुढे आक्रित घडू शकते. 

हल्ली अनेकांना फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर व्यक्त होण्याची इतकी सवय जडली आहे, की पोस्ट टाकली नाही, तर कदाचित आपण जगाच्या मागे राहू, अशी भीती त्यांना वाटते. त्यातूनच ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पोस्टवर पोस्ट टाकत असतात. या व्हर्च्युअल जगाने खऱ्या आयुष्यावर मात केली, की अवतीभवतीचे जगही खोटे वाटू लागते, मग खऱ्या आयुष्यात निर्माण झालेल्या समस्येचा सामना करताना ते नैराश्येच्या गर्तेत ओढले जातात. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकPooja Chavanपूजा चव्हाण