शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हां खान साहब, भारतके कंट्रोल में है क्रिकेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 05:42 IST

परिस्थिती आपल्या देशात बिघडलेली आहे आणि आरोप भारतावर करता? आपल्या घरात जरा डोकवा इम्रानभाई, खुदाची तरी थोडी भीती बाळगा!

-  विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहप्रिय इम्रान खान साहेब,आपले दु:ख मी समजू शकतो. सामना सुरू होण्याच्या आधी न्यूझीलंडने हे म्हणावे की,  येथे दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे, आम्ही नाही खेळू शकत. तो संघ परत जातो. मग इंग्लंड तुमच्याकडे येत नाही म्हणून तुमची किरकिर होते, हेही स्वाभाविकच म्हणा! एक तर पाकिस्तानसाठी ही लाजिरवाणी गोष्ट, शिवाय सामन्यातून जो नफा होतो, खिसा भरतो तोही गेला. याला म्हणतात, ‘दुष्काळात तेरावा महिना.’ अशा स्थितीतले दु:ख, बेचैनी स्वाभाविक आहे. न्यूझीलंडचा संघ परत जात होता तेव्हा मला वाटले पाकिस्तानातील दहशतवादाबद्दल आतातरी आपण काही बोलाल. विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डात सुधारणा करू म्हणाल; पण आपण हे काय केलेत, न्यूझीलंड संघाला पाठविण्यात आलेल्या धमकीच्या संदेशाचे सूत्रचालन भारतातून झाले होते, ई-मेल भारतातून आला होता, अशी बहुमूल्य माहिती आपले माहिती मंत्री फवाद चौधरी यांना कोणीतरी पुरविली. मुंबईच्या कोणी ओमप्रकाश मिश्रा यांचे नावही आरोपी म्हणून त्यांनी घेऊन टाकले. एखाद्या देशाचा माहितीमंत्री इतक्या मूर्खपणाच्या गोष्टी कशा करू शकतो याचे मला मात्र आश्चर्य वाटले. आता पाहा ना, पाक क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा लगेच म्हणू लागले ‘ही सगळी भारताची चाल आहे.’खानसाहेब, परिस्थिती आपल्या देशात बिघडलेली आहे, आपले लष्कर आणि आयएसआय दहशतवाद्यांना पाळत आहे आणि आरोप भारतावर. खुदाची तरी थोडी भीती बाळगा. आता आपण म्हणत आहात, जागतिक क्रिकेटवर भारताचे नियंत्रण आहे. हां खान साहब, ‘भारत के कंट्रोल में है क्रिकेट!’ ते खरेच आहे आणि  ज्याची पात्रता असते, ज्याचे खेळाडू राष्ट्र आणि खेळाविषयी समर्पण भाव बाळगतात, त्याचेच नियंत्रण असते.

- मी राष्ट्र हा शब्द इथे मुद्दाम वापरत आहे, ते का, हे कदाचीत  आपल्याला समजणार नाही.  केरी पॅकर आठवा. १९७७ ते ७९ या काळात पॅकर यांनी अनेक संघ तयार केले. त्यावेळी पाकचे सगळे खेळाडू त्यांच्याकडे गेले. आठवतेय का खानसाहेब, आपणही गेला होतात. त्यावेळी एकही भारतीय खेळाडू तिकडे गेला नाही, कारण पैशापेक्षा त्यांना देशासाठी खेळण्यात धन्यता वाटत होती. आपले किती खेळाडू देशात राहतात आणि किती विदेशात याचाही जरा विचार करा. आपणही जास्त काळ विदेशातच घालविला आहे. विषय निघालाच आहे तर भारतीय क्रिकेटविषयी काही गोष्टी आपणास सांगितल्या पाहिजेत. क्रिकेटचे बाळकडू ज्या ब्रिटिशांकडून आम्ही घेतले त्यांच्याच संघाला आम्ही पहिल्यांदा हरविले होते. पहिली मालिका भारताने पाकविरुद्धच जिंकली होती हे क्रिकेटमधल्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितले असेलच. जागतिक क्रिकेटचे नियंत्रण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडे कसे आले आणि आपण मागे का पडलात, हे जरा पाहू. सगळ्यात पहिली गोष्ट भारतीय बोर्ड सुरुवातीपासून स्वतंत्र संघटन आहे. विशेषत: गेली ३०-४० वर्षे ते ज्या पद्धतीने चालविले गेले ते प्रशंसनीय आहे. १९८३ साली विश्वचषक जिंकल्यावर आमच्याकडे पैसा यायला लागला. त्याचा आम्ही चांगला वापर केला. आज आमच्याकडे प्रत्येक राज्यात चांगले स्टेडियम आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत क्रिकेट खेळले जाते. शाळेपासून विद्यापीठापर्यंत खेळाच्या उत्तम सुविधा पुरविल्या जातात. त्यातून मुले पुढे येतात. मग त्यांना राज्याकडून खेळता येते. त्यानंतर दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफीसाठी त्यांना खेळायला मिळते. ११ खेळाडू खेळत असतात तेव्हा मागच्या रांगेत किती तयारीत असतात हे नाही सांगता येणार. आयपीएलच्या रूपाने आम्ही क्रिकेटला शानदार आकार दिला आहे. जगभरातल्या खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली. आपल्या कुरापती सुरू असतात, त्यामुळे पाक खेळाडूंना नाही घेता आले ही गोष्ट वेगळी. पाकिस्तानात भारतासारख्या पायाभूत क्रिकेट सुविधा द्यायला हव्यात असे आपणच म्हणत असता. आता तर आपणच खुद्द पंतप्रधान आहात, मग त्या देत का नाही? जनाब, आपल्याकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डावर सरकारचे नियंत्रण आहे आणि स्थिती अराजकाची! प्रत्येक ठिकाणी राजकारण! आपले देशांतर्गत क्रिकेट बरबाद झाले आहे. जे खेळाडू पुढे येतात ते स्वत:च्या कष्टावर! त्यांना प्रोत्साहन नाही. क्षमा करा, पण आपल्याकडे क्रिकेट खेळाडूंचा अहंकार मोठा असतो. ते आपल्या मर्जीचे  मालक! आपण स्वत: तीनदा निवृत्त झाला होतात हे आपणास आठवत असेलच. आपण गोलंदाज म्हणून सुपरस्टार होतात; पण १९९२ साली आपल्याला हुक्की आली आणि म्हणालात आता मी फलंदाज होणार. वाटले तर गोलंदाजीही करीन. खांसाहेब आमच्याकडे कुठल्याही खेळाडूने असा अहंकार नाही दाखविला.
जागतिक क्रिकेट आम्ही आमच्या पैशाने चालवितो याचाही अहंकार आम्हाला नाही. क्रिकेट मोठे करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. न्यूझीलंड आपल्याकडून गेले आणि इंग्लंडचा संघ आला नाही, तर त्यात आमचा काही गुन्हा नाही. दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे पाप पाकिस्तानने केले आहे. ३ मार्च २००९ या दिवशी श्रीलंकेच्या संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता हे  आपण विसरलात काय, त्यात ६ खेळाडू घायाळ झाले आणि आपल्या सुरक्षा यंत्रणेतल्या ६ जवानांसह ८ लोक मारले गेले होते. अशा स्थितीत आपल्यावर कोण विश्वास टाकील आपल्या घरात जरा डोकवा खानसाहेब. भारतीय क्रिकेट आपल्याशिवाय अधिक कोणाला माहिती असणार, तरी या अशा गोष्टी करता, ही आपली काही राजनैतिक मजबुरी आहे की दबाव, एका खेळाडूची भाषा तर अशी नाही असू शकत, नाही का?

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानBCCIबीसीसीआय