शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पर्यटन विकासाचा ध्यास घेतलेली कार्यकर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:10 IST

पतीच्या निधनानंतर कोल्हापुरातच स्थायिक होण्याचा निर्णय. त्यानंतर मग कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न. ६२ वर्षांमध्ये ५२ देश फिरणारी ही पर्यटन अभ्यासिका, लेखिका, कार्यकर्ती अरुणा जगदीश देशपांडे.

- समीर देशपांडे (वरिष्ठ वार्ताहर, कोल्हापूर)पार्ल्यातील ही मध्यमवर्गीय मुलगी. शिक्षणानंतर २0 वर्षे पर्यटन कंपनीमध्ये नोकरी. लग्नानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या भारतातील एका मोठ्या राजकीय नेत्यासमवेत काम. पतीच्या आजारपणामुळे महाराष्ट्राच्या एका टोकाला कोल्हापूरला वास्तव्य. पतीच्या निधनानंतर कोल्हापुरातच स्थायिक होण्याचा निर्णय. त्यानंतर मग कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न. ६२ वर्षांमध्ये ५२ देश फिरणारी ही पर्यटन अभ्यासिका, लेखिका, कार्यकर्ती अरुणा जगदीश देशपांडे.पर्यटन कंपनीमध्ये नोकरी करताना त्यांनी त्यातील सगळे बारकावे समजून घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी उत्तम बोलत असताना जर्मन भाषाही शिकून घेतली; त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमवेत अरुणा असणारच. कोल्हापुरातही परदेशी पर्यटक आले, की हॉटेल मालक संघाच्या उज्ज्वल नागेशकर, सिद्धार्थ लाटकर यांचा फोन अरुणा देशपांडे यांना जायचा. जग फिरताना भारतामधील अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत; परंतु पर्यटक तिथं जात नाहीत; त्यामुळेच त्यांनी ‘बुद्धिस्ट इंडिया रिडिस्कव्हर्ड’ पुस्तक लिहिलं. त्याला जगभरातून मागणी सुरू झाली. कोल्हापूरच्या पर्यटनावर त्यांनी ‘या माझ्या कोल्हापुरी’ हे पुस्तक लिहिलं. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, दलाई लामा यांसारख्या मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील हाजगोळी (ता. आजरा) येथील जगदीश देशपांडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जगदीश हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी; त्यामुळे साहजिकच अरुणा यांचा फर्नांडिस यांच्याशी संपर्क आला. या दोघांनी जॉर्ज यांच्यासाठी खूप काम केलं. जगदीश पाटण्यात राहून, तर अरुणा या मुंबईत असूनही कार्यरत होत्या. जगदीश यांच्या आजारपणामुळे अरुणा या कोल्हापुरात आल्या. जगदीश यांच्या निधनानंतर कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.कोल्हापुरात राहिल्यानंतर मग त्यांचा विचार सुरू झाला. नेहमीच वेगळा विचार करण्याचा आणि स्वत:ला पटेल ते बोलण्याचा स्वभाव असल्याने त्या कोल्हापूरला परदेशी पर्यटक का पसंती देत नाहीत, यावर रोखठोक बोलायच्या. कोल्हापूर, विजापूर आणि गोवा हा पर्यटनासाठीचा सुवर्ण त्रिकोण आहे. तो शासनाने विकसित करण्याची गरज त्या नेहमी बोलायच्या. कोल्हापूरची मराठमोळी संस्कृती, विजापूरची मुस्लीमप्रभावी जीवनशैली आणि गोव्याची आधुनिक आणि ख्रिश्चन संस्कृतीचा प्रभाव असणारी जगण्याची पद्धत. अशा तीन वैविध्यपूर्ण संस्कृती आपल्याला पर्यटकांना केवळ चार, पाच दिवसांत दाखवता येतील, असे त्यांचे म्हणणे होेते. बुद्धप्रिय असणाऱ्या भारतातील स्थळांची माहिती देणारे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्रांनी ज्या मार्गाने वनवास पूर्ण केला, तो प्रवास करून पुस्तक लिहिण्याचा त्यांचा मनोदय होता. ‘भारतातील प्राचीन ॠषी’ या विषयावरही त्यांचे काम चालले होते.कोल्हापुरात धड मार्ग आणि स्थळे दाखविणारे फलक नाहीत याबाबत त्या तीव्र नाराजी व्यक्त करायच्या. जॉर्ज फर्नांडिस यांच्या वाढदिनी दिल्लीत त्यांना भेटून यायच्या तर इतिहास संकलन परिषदेमध्ये शोधनिबंध वाचण्याची तयारी करायच्या. चरितार्थासाठी फार धावपळ करावी, अशी परिस्थिती नसताना गावाकडच्या लोकांपासून ते जॉर्ज फर्नांडिस यांच्या वर्तुळातील मित्रपरिवाराशी सहजपणे संपर्क साधणाºया अरुणा देशपांडे यांनी मार्च २0१९ मध्ये चीनला जाण्याचे नियोजन केले होते; परंतु चौथ्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचे कळल्यानंतर महिनाभरात त्या अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अस्वस्थ असणारे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.

टॅग्स :tourismपर्यटनkolhapurकोल्हापूर