शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांना हवा लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:48 IST

आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो.

आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो. तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट किंवा अगदी चारचार जणही बसून जाताना आम्हाला फार मोठा पराक्रम गाजवित असल्याचा अभिमान वाटतो. संपूर्ण देशात वाहतूक नियमांची अशी थट्टा होत असताना महाराष्ट्राची उपराजधानी समजले जाणारे नागपूर शहर तरी त्यापासून कसे अलिप्त राहणार? या शहरातील नागरिक वाहतुकीच्या नियमानुसार गाड्या चालविण्यात पुढाकार घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेले हे वास्तव नागरिकांचा बेजबाबदारपणा, स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाची त्यांना नसलेली पर्वा आणि ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती अधोरेखित करणारे आहे. यावर्षी आतापर्यंत हेल्मेट न घालणाºया ४० हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय मद्यपी वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंकन ड्रायव्हिंग’विरुद्ध युद्धपातळीवर मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत १८ हजारावर वाहनचालकांना पकडण्यात आले. याशिवाय अतिवेगात गाडी चालविणारे, सिग्नल तोडणारे तसेच गाडी चालविताना मोबाईलवर बोलणारेही हजारो बहाद्दर पोलिसांच्या रडारवर आले. स्टंटबाजी करणाºयांचा एक मोठा वर्ग सध्या नागपुरात जन्मास आला आहे. अशा १८६६ स्टंटबाजांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विदर्भातील अन्य भागातही वाहतूक नियमांबाबत यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाही. सर्वत्र वाहनचालकांची एकच तºहा आहे. खरे तर वाहतूक पोलीस शाखेतर्फे वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात. परंतु ‘पालथ्या घडावर पाणी’ अशी अवस्था आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाचे ‘अपघातमुक्त’ शहराचे स्वप्न भविष्यात कधी पूर्णत्वास येईल अशी आशा नाही. नागपूरचा विचार केल्यास यंदा जानेवारी ते सप्टेंबर या काळात शहरात ९०० वर अपघात झाले. यातील १८ टक्के अपघात प्राणांतिक ठरले. अपघातात बळी जाणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. एकंदरीतच वाहतूक नियमांबाबत कुणीही फारसे गंभीर नाही. काही दिवस हवा असते मग परिस्थिती जैसे थे होते. हेल्मेट सक्तीबाबत हा अनुभव सर्वांनी घेतला आहे. सातत्य असल्याशिवाय सार्वजनिक शिस्त लागत नाही. प्रत्येक व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघातांना आळा बसेल आणि लाखो जीव वाचतील.

टॅग्स :carकारhighwayमहामार्गnagpurनागपूर