शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांना हवा लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:48 IST

आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो.

आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो. तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट किंवा अगदी चारचार जणही बसून जाताना आम्हाला फार मोठा पराक्रम गाजवित असल्याचा अभिमान वाटतो. संपूर्ण देशात वाहतूक नियमांची अशी थट्टा होत असताना महाराष्ट्राची उपराजधानी समजले जाणारे नागपूर शहर तरी त्यापासून कसे अलिप्त राहणार? या शहरातील नागरिक वाहतुकीच्या नियमानुसार गाड्या चालविण्यात पुढाकार घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेले हे वास्तव नागरिकांचा बेजबाबदारपणा, स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाची त्यांना नसलेली पर्वा आणि ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती अधोरेखित करणारे आहे. यावर्षी आतापर्यंत हेल्मेट न घालणाºया ४० हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय मद्यपी वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंकन ड्रायव्हिंग’विरुद्ध युद्धपातळीवर मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत १८ हजारावर वाहनचालकांना पकडण्यात आले. याशिवाय अतिवेगात गाडी चालविणारे, सिग्नल तोडणारे तसेच गाडी चालविताना मोबाईलवर बोलणारेही हजारो बहाद्दर पोलिसांच्या रडारवर आले. स्टंटबाजी करणाºयांचा एक मोठा वर्ग सध्या नागपुरात जन्मास आला आहे. अशा १८६६ स्टंटबाजांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विदर्भातील अन्य भागातही वाहतूक नियमांबाबत यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाही. सर्वत्र वाहनचालकांची एकच तºहा आहे. खरे तर वाहतूक पोलीस शाखेतर्फे वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात. परंतु ‘पालथ्या घडावर पाणी’ अशी अवस्था आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाचे ‘अपघातमुक्त’ शहराचे स्वप्न भविष्यात कधी पूर्णत्वास येईल अशी आशा नाही. नागपूरचा विचार केल्यास यंदा जानेवारी ते सप्टेंबर या काळात शहरात ९०० वर अपघात झाले. यातील १८ टक्के अपघात प्राणांतिक ठरले. अपघातात बळी जाणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. एकंदरीतच वाहतूक नियमांबाबत कुणीही फारसे गंभीर नाही. काही दिवस हवा असते मग परिस्थिती जैसे थे होते. हेल्मेट सक्तीबाबत हा अनुभव सर्वांनी घेतला आहे. सातत्य असल्याशिवाय सार्वजनिक शिस्त लागत नाही. प्रत्येक व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघातांना आळा बसेल आणि लाखो जीव वाचतील.

टॅग्स :carकारhighwayमहामार्गnagpurनागपूर