शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

श्वेतपत्रिकेमुळे एसटीची परवड संपेल ? निधी मिळेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 05:52 IST

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा असलेल्या एसटीच्या ७७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक अनोखी घटना घडली.

श्रीरंग बरगे सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा असलेल्या एसटीच्या ७७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक अनोखी घटना घडली. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून एसटीची सद्य:स्थिती विशद केली. उद्देश होता, एसटीच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव  राज्य सरकार, सामान्य जनता आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी करून देणे. यानिमित्ताने एसटीच्या इतिहासात तिच्या आर्थिक स्थितीचा आरसा लोकांसमोर मांडण्याचे साहसी काम मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

सतत तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या कारभारावर श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळात केली असती आणि सरकारने ती मान्य केली असती, तर त्यात काही नवल नव्हते; परंतु यावेळी ही मागणी एसटीमधील एका श्रमिक संघटनेने केली होती. परिवहन मंत्र्यांनी ती तत्काळ मान्य केली. एवढे धाडसी पाऊल उचलणे खरोखरच परिवहन मंत्र्यांसाठी आव्हानात्मक आहे.

एसटीच्या आर्थिक स्थितीची आकडेवारी सांख्यिकी विभाग दर महिन्याला देतच असतो. त्यात नवीन काहीच नाही; पण श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून एसटीच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा महाराष्ट्रासमोर मांडण्यात आला. यामुळे राज्य सरकारच्या अर्थखात्याची जबाबदारी वाढली असून, ‘तिजोरीत खडखडाट’ असल्याचे कारण देत अपुरा निधी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता नजर राहील. पुढे आवश्यक निधी दिला जाईल का? आणि एसटीची परवड संपेल का? हे येणारा काळ ठरवेल. सध्या तरी आशा बाळगायला हरकत नाही, कारण एसटी महामंडळ हा सरकारचा अंगीकृत उपक्रम असून, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून जनतेसाठी प्रवासी दळणवळण सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

एसटी महामंडळ तोट्यात आहे, हे सर्वज्ञात आहे. मात्र, गेल्या ४५ वर्षांमध्ये केवळ आठ आर्थिक वर्षांतच महामंडळ नफ्यात होते, ही नवी बाब या निमित्ताने समोर आली. सध्या एसटीच्या एकूण खर्चात सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. दरवर्षी ४८६४.३४ कोटी रुपये, तर इंधन खर्च ३६५६.७६ कोटी रुपये आहे. म्हणजेच सर्व उत्पन्न हे वेतन व इंधनावर खर्च होत असून, विकासकामे, प्रवाशांच्या सोयीसुविधा, सामान खरेदी व आस्थापना खर्चासाठी काहीच उरत नाही.

उत्पन्न वाढीसाठी कर्मचारी हा अत्यावश्यक घटक आहे. वेतन व भत्ते महागाईच्या काळात योग्य प्रमाणात द्यावे लागतात, अन्यथा त्याचा परिणाम सेवेच्या गुणवत्तेवर होतो. विशेषतः एप्रिल २०२० ते मार्च २०२४ या कालावधीतील ६५०० रुपयांच्या वेतनवाढीचा फरक अजूनही देणे बाकी आहे. याचा उल्लेख श्वेतपत्रिकेत नसल्याने जाणूनबुजून वगळण्यात आला का, असा प्रश्न उपस्थित होतो. घरभाडे भत्ता व महागाई भत्ता याच्या फरकासह  कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची चार हजार कोटी रुपये थकीत रक्कम आहे. श्वेतपत्रिकेत याबाबतचे उपाय सुचवले गेले असते तर बरे झाले असते.

श्वेतपत्रिकेत जाहीर केल्याप्रमाणे इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब आवश्यक आहे. विजेवर चालणाऱ्या, सीएनजी व एलएनजीवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. एलएनजीमध्ये ५००० जुन्या गाड्या रूपांतरित करण्याची घोषणा झाली होती; पण आजवर फक्त पाच गाड्यांचे रूपांतर झाले आहे. सीएनजीमध्ये रूपांतर होणाऱ्या १००० गाड्यांपैकी ८०० तयार आहेत, उर्वरित २०० लवकर तयार व्हाव्यात, यासाठी प्रयत्न व्हावेत. विजेवर चालणाऱ्या ५१५० भाडे तत्त्वावरील बसपैकी केवळ २२० बसच आल्या आहेत. या सर्व पर्यायांची अंमलबजावणी झाली तर खर्चात मोठी बचत होऊ शकते.

एसटीचे एकूण उत्पन्न वाढवण्यासाठी फक्त प्रवासी उत्पन्नावर अवलंबून न राहता, उत्पन्नाचे अन्य स्रोत निर्माण केले पाहिजेत. त्यामध्ये एसटीच्या मोकळ्या जागांचा विकास सरसकट न करता, टप्प्याटप्प्याने करायला हवा. सरकारनेही आवश्यक निधी दिला पाहिजे. कारण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देशभरात कुठेही नफ्यात नाही. महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणाऱ्या एसटीसाठी सरकारने न्यायालयात दिलेला शब्द पाळून निधी द्यावा, म्हणजेच श्वेतपत्रिकेतील आर्थिक आव्हानांवर मात करता येईल आणि एसटीची परवड थांबेल.