शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्ट्याचा शाप दूर होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:58 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला गती दिली तर खारपाणपट्ट्याचा शाप दूर होईल.

- राजेश शेगोकारखारपाण पट्टा.... विदर्भातील तीन जिल्हे अन् १६ तालुक्यांचे दु:ख... या प्रश्नावर सरकारने मलमपट्टी तर केलीच नाही, मात्र सदैव ही जखम भळभळती ठेवण्याचेच काम केले. फडणवीस सरकारनेही या पट्ट्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशी योजना आणली. या योजनेत खारपाणपट्ट्यासोबतच दुष्काळ प्रभावित १५ जिल्ह्यांचा समावेश केला; मात्र ही योजनाही आता पांढरा हत्ती होते काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये खारपाणपट्टा आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याची मुबलकता असताना त्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक आहे. परिणामी हे क्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरता येत नाही. या पाण्याचा मानवी आरोग्यावरदेखील परिणाम होतोय. या जमिनी बेसॉल्ट खडकापासून तयार झाल्याचा निष्कर्षही कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी नोंदविला आहे. पूर्व ते पश्चिम १५० किलोमीटर लांब आणि उत्तर ते दक्षिण ६० किलोमीटर रुंद असा हा खारपाणपट्टा विस्तारला आहे. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३५५ गावे, अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ३७२ गावे, बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ८९४ गावे खारपाणपट्ट्यात आहेत. यामुळे ओलिताची शेती करणे शेतकऱ्यांना कठीण जाते. सध्याच्या फडणवीस सरकारने राज्यातील खारपाणपट्ट्याच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची घोषणा केली. जागतिक बँकेच्या मदतीने चार हजार कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली. राज्यातील १५ दुष्काळ प्रभावित आणि खारपाणपट्टा असलेल्या जिल्ह्यात ही योजना जागतिक बँकेच्या मदतीने राबविली जाणार आहे. यात जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि लातूरचा समावेश आहे. राज्यातील १५ जिल्ह्यातील ५ हजार गावे या योजनेत समाविष्ट आहेत. या गावांतील नागरिकांना अधिक चांगले जीवनमान देण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. कागदावरची ही सुंदर योजना मात्र शेतकºयांच्या बांधापर्यंत अद्यापही गेलीच नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने अकोला जिल्ह्यात पाच बॅरेजेसला मंजुरी दिली; मात्र ना हे बॅरेजेस पूर्ण झालेत, ना त्यात पाणी जमा झाले. अशीच स्थिती इतर जिल्ह्यातील योजनांची आहे. खरं तर खारपाणपट्ट्यातील शेतकºयाचे भाग्य बदलवून टाकणारी ही योजना आहे; मात्र योजनेला संथगतीचा शाप लागल्याने आता यामधील प्रकल्पांच्या किमती वाढल्या आहेत. एकीकडे महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असताना दुसरीकडे विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या थाटामाटात रखडलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्याची मुदत जाहीरपणे ठरवून दिली होती. ती मुदत कधीचीच संपली; मात्र प्रकल्पाची कामे ठप्पच आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार पुन्हा एकदा नागपुरात आले आहे. विदर्भात अधिवेशन असले म्हणजे विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होते, त्यामुळे या अधिवेशनात खारपाणपट्ट्यासोबतच रखडलेल्या प्रकल्पांचा प्रश्न ऐरणीवर आला पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती