शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

प्रियांका गांधी यांना हिमाचल प्रदेशात यश मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:13 IST

अनुकूल वातावरण लक्षात घेऊन प्रियांका गांधी यांनी हिमाचलच्या रिंगणात उतरायचे ठरवले असले तरी राजकीय पंडितांना मात्र यात धोका दिसतो.

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली)

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत वाईट प्रकारे हात पोळून घेतल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी १२ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या विरोधातले वातावरण आणि भाववाढ यामुळे हिमाचलात काँग्रेस पक्षाला सुपीक जमीन मिळेल, असे प्रियांका यांना वाटते. सरकारी कर्मचारी नेहमीच निर्णायक भूमिका बजावत असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा आणण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने सावध पवित्रा घेऊन ठाकूर यांना कायम ठेवण्याचे आणि जुनी पेन्शन योजना पुनरुज्जीवित न करण्याचे ठरविले आहे. पराभवाचे तोंड पाहावे लागले. हिमाचल प्रदेशमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल, असे पक्षाने जाहीर केले आहे.

राहुल गांधी 'भारत जोडो यात्रे'त गुंतलेले असल्यामुळे काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला अजून वेग आलेला नाही. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सूत्रे सोपवल्यानंतर सोनिया गांधी यांनी विश्रांती घ्यायचे ठरवले आहे. प्रियांका गांधी यांनी हिमाचलच्या रिंगणात उतरायचे ठरवले असले तरी राजकीय पंडितांना यात धोका दिसतो. काँग्रेसने हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून भूपेश बघेल यांना पाठवले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र ते अपयशी ठरले होते. दुसरीकडे भाजपने आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. पन्ना प्रमुखापासून ते पंतप्रधान आणि अमित शहा तसेच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापर्यंत सगळेच कामाला लागले आहेत. प्रियांका यांचा प्रयोग पंजाबमध्ये असफल झाला होता. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पाठीमागे त्यांनी आपले बळ उभे केले होते. राजस्थानमध्ये त्यांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. हिमाचल प्रदेशात प्रियांका यांची थोडी जमीन आहे; एवढेच त्यांचे त्या राज्याशी नाते. हिमाचलात त्या यशस्वी ठरतील काय? नक्की सांगता येणे कठीण! 

निवडणूक आयोगाचे गुजरात कोडेलोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुका पाच वर्षातून एकदा, एकाच वेळी घ्याव्या, असे पंतप्रधान मोदी म्हणत आले आहेत. अर्थात या दिशेने सरकार किंवा निवडणूक आयोगाने कोणतेच पाऊल असे उचललेले नाही. नंतर मोदी यांनीही त्याविषयी बोलणे थांबवले. निवडणुका एकाच वेळी घेतल्याने आपल्याला काही फारसा फायदा होईल, असे नाही, हे सत्तारूढ पक्षाच्या लक्षात आले असावे; परंतु निवडणूक आयोगाने मात्र हिमाचल प्रदेशमधील निवडणुका १२ नोव्हेंबरला जाहीर करून आणि गुजरातमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर न करून थोडा धक्का दिला. या दोन राज्यातल्या निवडणुका निवडणूक आयोग एकाच वेळी जाहीर करत असे. आदर्श आचारसंहिताही एकाच वेळी लागू व्हायची. दोन किंवा अधिक राज्यात सहा महिन्यांच्या काळात निवडणुका घ्यायच्या असतील तर तारखा एकत्र करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधला फरक तर महिन्याभराचाच होता. त्यामुळे यावेळीही दोन्ही राज्यातल्या निवडणुका एकाच वेळी जाहीर होतील, अशी अपेक्षा होती.

'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील प्रौढ महिलांना महिना हजार रुपये, राज्यात मोफत वीज आणि पाणी देण्याची घोषणा केल्यानंतर आता पुढे काय करावे, हे भाजपला कळत नव्हते. अशा खैरातींसाठी पक्ष तयार नव्हता; परंतु लवकरच गुजरात सरकारने वर्षाला घरटी दोन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे जाहीर केले. त्याशिवाय सीएनजी आणि पीएनजीचे दरही अनुक्रमे सहा आणि सात रुपये युनिटमागे कमी करण्यात आले. एकट्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदी तीनदा गुजरातच्या दौऱ्यावर गेले. एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उद्घाटने झाली. दुधासाठी लिटरमागे वाढवलेले दोन रुपये गुजरातमध्ये लागू होणार नाहीत, अशी घोषणा करून अमूलनेही काहीसा धक्काच दिला, हे मात्र खरे!

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेश