शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

नवीन कृषी विधेयकामुळे बाजार समित्या अस्तित्वात राहतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 02:04 IST

मुलाखत - कॉ. डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा महाराष्ट्र

 

शेतकरी का संतापले आहेत?

बाजार समितीच्या आवारात नोंदणीकृत व्यापारीच शेतमालाची खरेदी - विक्री करू शकतात. आडते, हमालांचीही नोंद असते. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवू नयेत यासाठी व्यापाºयांना आपल्या मालमत्तेची नोंद बाजार समितीत करावी लागते. काही करारपत्रेही असतात. जामीनदार असतात. त्यामुळे व्यापारी शक्यतो शेतकºयांच्या मालाचे पैसे बुडवू शकत नाहीत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होते. शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याची पावती व्यापारी शेतकºयाला देतात.

नवीन ‘कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०’ यात व्यापाºयांना बाजार समितीच्या बाहेर केवळ पॅनकार्ड असल्याच्या अटीवर मुक्त बाजारात कोठेही शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यावर बाजार समित्यांचे काहीही बंधन नसेल. बाहेर व्यापारी केवळ पॅनकार्ड दाखवून शेतमालाची खरेदी-विक्री करू शकतात. अशा परिस्थितीत व्यापाºयांनी पैसे बुडविले तर ते वसूल कसे करायचे हा प्रश्नच आहे. कायद्यात याबाबत पुरेशी तरतूद नाही. लवादाकडे किंवा प्रांताधिकारी व नंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागायचा आहे. न्यायालयात जाण्याचीही बंदी आहे. ही एक प्रकारची न्यायबंदीच आहे.बाजार समितीच्या आवारात हमीभावाच्या खाली शेतमाल खरेदी करण्यास बंदी आहे. नवीन विधेयकात बाजार समितीच्या बाहेर हमीभाव देण्याचे काहीही बंधन व्यापाºयांवर नाही. त्यामुळे बाजार समितीच्या बाहेर व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी करतील. ज्यात शेतकºयांचे नुकसान होईल.बाजार समित्यांच्या आवारात शेतमालाची खरेदी विक्री झाली तर बाजार समितीला कर मिळतो. नवीन विधेयकात बाजार समितीत येऊनच शेतमाल खरेदी करावा, असे बंधन व्यापाºयांवर नसल्याने ते बाजार समितीत शेतमाल खरेदी करणे टाळतील. त्यामुळे बाजार समित्यांना उत्पन्न मिळणेच बंद होईल. परिणामी त्या हळूहळू मोडकळीस येतील.बाजार समित्यांच्या आवारात व बाहेर व्यापाºयांसाठी सारखेच नियम व सर्वत्र हमीभावाची सक्ती असली तरच स्पर्धा निर्माण होऊन शेतकºयांचा फायदा होईल. अशी स्पर्धा असलीच पाहिजे. मात्र केंद्राने मंजूर केलेल्या नवीन कृषी विधेयकात अशी समानता नसून बाजार समित्यांच्या बाहेर व्यापाºयांना मोठी मोकळीक देण्यात आली आहे.बाजार समित्यांतही काही अनिष्ट प्रथा व शेतकºयांची लूट आहे. ती रोखण्यासाठी कठोर प्रयत्न हवे आहेत. मात्र, तसे न करता बाजार समित्या कमजोर करण्याचा प्रयत्न या विधेयकाने केला आहे. यातून बाजार समित्यांच्या बाहेर व्यापारी व कॉर्पोरेट्स यांची मक्तेदारी तयार होईल. यातून लूट वाढेल. शेतकरी आगीतून फुफाट्यात पडेल.दूध व्यवसायात पूर्वी सहकारी दूध संघ होते. आता ७६ टक्के दूध संघ खासगी आहेत. त्यांचे गावोगाव जाळे झाले. त्यामुळे सरकारी व सहकारी दूध संघ मोडीत निघाले. खासगी दूध संघ एकत्रितपणे भाव पाडतात. तेच आता शेतमालाचे होईल. जागोजागी शेतमाल खरेदीचे खासगी मार्केट उभे राहतील. तेथे व्यापारी भाव ठरवतील. त्यांची साखळी तयार होईल व बाजार समित्या हळूहळू मोडीत निघतील.पंजाबसारख्या राज्यात सरकार थेट बाजार समितीतून (मंडी) गहू खरेदी करते. त्यामुळे शेतकºयांना हमीभाव मिळतो. बाजार समितीला कर मिळतो व सरकारलाही चांगला गहू मिळतो. नवीन विधेयकांमुळे शेतकरी, सरकार दोघेही व्यापाºयांवर अवलंबून राहतील. व्यापारी सरकारला गरज असेल तेव्हा शेतमाल देतील का? हा प्रश्न आहे.बाजार समित्यांच्या आवारातदेखील व्यापारी प्रतवारीनुसार दर ठरवून अथवा अनेक प्रकारची तूट दाखवून शेतकºयांची अडवणूक करतात, माल नाकारतात. बाजार समित्यांच्या बाहेर तर अशी लूट अधिक होईल.

(शब्दांकन : सुधीर लंके ) 

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाब