शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

मुक्तबाजार व करारपद्धतीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 01:51 IST

प्रश्न पाचवा

मुलाखत - डॉ. गिरधर पाटील, कृषी-अर्थशास्राचे अभ्यासक

शेतमालाच्या व्यापारात आता ज्या सुधारणा केल्या ते काही पहिल्यांदा घडलेले नाही. २००३ साली काँग्रेसने जो मॉडेल अ‍ॅक्ट आणला त्यातही शेतकºयाला बाजार समितीच्या बाहेर माल विकता येईल, करार शेती करता येईल या तरतुदी होत्या. पण, प्रत्यक्षात त्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही.मॉडेल अ‍ॅक्ट आणण्यामागे जागतिक व्यापार कराराचा एक रेटा होता. आपण जागतिक व्यापार संस्थेचे सभासद असल्याने भारतीय शेतमाल निदान कागदावर नियमन मुक्त व्हावा असा दबाव होता. त्या गरजेपोटी तो कायदा झाला.

भाजप सरकारने आता तीन कृषी विधेयके आणली. कारण, कोरोना पश्चात अर्थव्यवस्थेत उद्योग व गुंतवणुकीचे पर्याय हे औद्योगिक व सेवा या दोन्ही क्षेत्रात कमी होणार आहेत. त्याऐवजी अन्न व अन्नप्रक्रिया उद्योगांत गुंतवणुकीला अधिक संधी निर्माण होणार आहेत. अशा गुंतवणुकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कायद्याचा अडथळा येतो. कारण या कायद्यामुळे ज्याच्याकडे परवाना नाही त्याला थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करता येत नाही. त्यामुळे शेतमाल मुक्त करून कुणालाही तो खरेदी करण्याची परवानगी दिली.

शेतकरी मुक्तपणे कोठेही माल विकू शकतो असे सरकार म्हणते. पण, शेतकरी कोठेही जाऊन माल विकणार कसा? कोणाला विकणार? खरेदीदाराची ऐपत शेतकºयाला कशी समजणार? मालाची प्रत व भाव ठरविण्याची पद्धत काय असेल? शेतकºयाला दळणवळण खर्च परवडेल का? या सर्व बाबींचा विचार अगोदर सरकारने केला असता व तशा सुविधा निर्माण करून कायदा केला असता तर शेतकºयांचा फायदा झाला असता.महाराष्टÑ सरकारने यापूर्वी नियमन मुक्ती करत ४५ प्रकारच्या भाज्या व फळे बाजार समितीच्या बाहेर विकण्याची मुभा दिली. जेव्हा अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा बाजार समित्यांनी विरोध करत बंद पाळला. त्यात शेतकºयांचेच नुकसान झाले. त्यानंतर राज्य सरकारने झुकते घेत नियमन मुक्ती बाजूला ठेवली. त्यामुळे केवळ मुक्तव्यापार कायदा करून फायदा नाही. अंमलबजावणी चांगली झाली तरच फायदा आहे.शेतमालाबाबत करार करण्याची मुभा असली तरी देशात अशा करार शेतीला आज वाव नाही. कारण, कंपन्या व शेतकºयांकडे तशा सुविधा नाहीत. बँकांचेही पाठबळ नाही. पोलीस कायद्याने संरक्षण नाही. काही तंटे झाल्यास कृषीसाठी स्वतंत्र न्यायालये नाहीत. नवीन कायद्यात हे तंटे प्रांताधिकाºयांनी मिटवावे, असे म्हटले आहे. जेथे न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये वायनरी कंपन्यांनी द्राक्ष उत्पादकांशी करार केले. मात्र बाजारात करारापेक्षा स्वस्त दरात द्राक्ष उपलब्ध असल्याचे पाहून या कंपन्यांनी शेतकºयांची द्राक्ष नाकारली. शेतकरी जेव्हा न्यायालयात गेले तेव्हा लक्षात आले की करार शेतीच्या अटीत शेतकºयांच्या बाजूने काहीच तरतुदी नाहीत. आजही तीच परिस्थिती आहे.

बाजार समित्यांमध्येही लिलावाची पद्धत पारदर्शक नाही. हमाल, मापाडीही अडवणूक करतात. काही बाजार समित्यांत दहशतही आहे. सरकार ही व्यवस्था तशीच ठेवून नवा कायदा राबवू पाहत आहे. नवीन मुक्त व्यापारातही पारदर्शकता कशी असणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.नवीन विधेयकांमुळे शेतकºयांना मिळणाºया भावात फारसा फरक पडणार नाही. केवळ बाजार समितीच्या बाहेर माल विकल्यास बाजार समितीला द्यावा लागणारा कर वाचेल. व्यापारी जरी शेतावर आला तरी तो हाताळणी व वाहतूक खर्च धरूनच भाव काढेल.सरकारने लोकसभा, राज्यसभेत या विधेयकांवर चर्चाच होऊ न देता ती मंजूर करणे हे वैध नाही. नवीन शेतकरी विधेयकांतील तरतुदी शेतकºयाच्या हिताच्या वाटतात. पण त्याची अंमलबजावणी कशी होणार?(शब्दांकन : सुधीर लंके)मुलाखत - डॉ. गिरधर पाटील, कृषी-अर्थशास्राचे अभ्यासक

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या