शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खोतकर खरेच लढणार का? दानवेंचा घाम काढणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 8:00 AM

अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे?

- सुधीर महाजन

निवडणुका जाहीर झाल्या, त्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेची गाठ पुन्हा बांधली गेली तरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हट्ट का सोडत नाहीत? खा. रावसाहेब दानवेंशी दिलजमाई करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले आणि झाले गेले गंगेला मिळाले, अशा शब्दांत दोघांचे मनोमिलन घडवून आणले तरी अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे? एक तर निवडणूक लढवायची असेल तर सेना त्यांना उमेदवारी देणार नाही आणि काँग्रेस त्यांना तिकीट देणार असे गृहीत धरले तरी खोतकर काँग्रेसला कितपत पचनी पडतील, हाही एक मुद्दा आहेच. कारण कैलाश गोरंट्याल यांना ते कितपत मान्य होईल.

खोतकर कोणाच्या बळावर लोकसभा लढवू पाहतात याचा आढावा घेतला, तर सिल्लोडमधून आ. अब्दुल सत्तारांचा त्यांना उघड पाठिंबा दिसतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून सत्तार आणि खोतकर यांची जवळीक वाढली आहे. इकडे दानवेंना पराभूत करण्याचा तिढा सत्तार यांनी उचलला आणि त्यासाठी खोतकर उपयुक्त प्यादे ठरू शकतात, असे वरकरणी दिसते आणि त्याच धोरणात गेल्या दीड-दोन वर्षांपासून हे निवडणूक लढण्याचे दबावतंत्र चालू आहे. सत्तार यांचा संपूर्ण पाठिंबा, जालना विधानसभेतील त्यांची स्वत:ची ‘मतपेढी’ आणि अंबडमधून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्याकडून मिळणारी रसद एवढ्या शिदोरीवर खोतकर रावसाहेबांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे हे २ लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले असले तरी ती काही त्यांची मते नव्हती. देशभरात निर्माण झालेल्या ‘मोदी लाटे’चा तो परिणाम होता. रावसाहेबांची खरी परिस्थिती तपासायची असेल तर २00९ च्या निवडणुकीचा आधार घ्यायला पाहिजे. त्यावेळी ते अवघ्या साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. लोकसभेसाठी हा विजय निसटता समजला जातो. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा मुलगा संतोष हे भोकरदनचे आमदार आहेत. मुलगी जि.प. सदस्या आहे. खोतकरांमुळेच ती अध्यक्ष होऊ शकली नाही. सर्व सत्ताकेंद्र दानवेंकडे असली तरी तीच त्यांच्याविषयीच्या नाराजीची कारणे ठरू शकतात. हे सर्व त्रैराशिक मोडूनच खोतकर लढण्याची भाषा करतात; पण आता मध्येच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून घूमजाव केले होते. ‘मातोश्री’वरही त्यांच्या कानावर समजुतीच्या चार गोष्टी घातल्या गेल्या. सारी निरवानिरव झाली असताना पुन्हा त्यांनी लढण्याची भाषा सुरू केली.

याचवेळी परवा सत्तार-दानवेंचे दिलखुलास गप्पा करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावरून सगळीकडे परसले. त्यामुळे पुन्हा एकदा खोतकरांच्या हट्टाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास सुरुवात झाली. त्यांना नेमके काय हवे आहे, याची लोक चर्चा करायला लागले. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. या समितीत झालेल्या गैरव्यवहाराचा तपास चालू आहे. याशिवाय जो जालना सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे आहे, तेथेही गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. त्याचीही चौकशी चालू आहे. चौकशीची ही भुतावळ गाडून टाकण्यासाठी तर ही लढण्याची भाषा नाही ना? अशी जोरदार चर्चा आहे. याशिवाय आणखी काही छोटी-मोठी प्रकरणे आहेतच. यातून त्यांना सहीसलामत सुटका हवी आहे म्हणूनच ते दानवेंना आव्हान देतात आणि दबाव वाढवतात. चर्चाच त्या, लोकांच्या तोंडाला कोण हात लावणार? प्रश्न मात्र अजून कायम आहे. खोतकर खरोखरच लढणार का?

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेlok sabhaलोकसभाJalanaजालना