शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

असे जीवघेणे साहस कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 21:50 IST

मिलिंद कुलकर्णी जीवन अनमोल आहे, असे आपण म्हणत असलो तरी जीवावर उदार होऊन जेव्हा काही लोक अकारण साहस करतात, ...

मिलिंद कुलकर्णीजीवन अनमोल आहे, असे आपण म्हणत असलो तरी जीवावर उदार होऊन जेव्हा काही लोक अकारण साहस करतात, ते का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. यंदाही गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचा तलाव, नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे.खान्देशकन्या शीतल महाजन ही स्कायडायव्हींगमध्ये विश्वविक्रम करणारी तरुणी आहे. शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेऊन तिने असे अनेक साहसी पराक्रम केले. एखाद्या विषयात पारंगत होऊन धाडस करणे वेगळे आणि अतिआत्मविश्वासाने पराक्रम करायला जाणे वेगळे. असा हा फाजील आत्मविश्वास जीवघेणा ठरतो आणि स्वत:चा जीव गमावण्यासोबत संपूर्ण कुटुंबाला दु:खाच्या खाईत लोटतो, हे कटुसत्य लक्षात घ्यायला हवे.

पावसाळ्यात वर्षा सहलीची मजा काही और असते. यंदा कोरोनामुळे हा आनंद घेता आला नाही. पण तरीही नियमभंग करीत अनेक जण धबधबे, नदी - नाले याठिकाणी गेले. प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, अटकाव करणे शक्य नाही. त्यातून दुर्घटना घडल्या. पाणी बघीतल्यावर त्यात उतरण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. जलतरण तलावात पोहण्याचा सराव असलेली मंडळी उत्साहाने आणि विशेषत: मित्रमंडळींना कसब दाखविण्यासाठी नदी, तलावांमध्ये उतरतात. जलतरण तलावातील स्थिर पाणी, सुरक्षित वातावरण आणि नदी, तलावातील पाणी, खोली यात फरक असतो. कुठे डोह असतो, कुठे भोवरा असतो, त्याचा अंदाज नसल्याने दुर्घटना घडतात. एक जण बुडायला लागला की, त्याचे मित्र, सहकारी त्याला वाचवायला जातात आणि तेदेखील बुडतात. पुरेशी काळजी न घेता, खबरदारी न घेता केलेले हे साहस अंगलट येते आणि कुटुंबाला अंधाराच्या खाईत ढकलते.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी फरशी पुलांवरुन पुराचे पाणी वाहते. मोठे पूल नसल्याने असा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतो. त्यामुळे फरशी पुलावरुन पाणी कमी होण्याची वाट पाहायला हवी. अनेक जण तसे करतात. परंतु, काहींना भलतीच घाई झालेली असते तर काहींना आपल्या धाडसीवृत्तीचा परिचय करुन द्यायचा असतो. त्यातून दुर्घटना घडतात. संयम हा खूप महत्त्वाचा असतो, हे अशा घटनांमधून कळते.

मोबाईलद्वारे घेतली जाणारी सेल्फी हे देखील दुर्घटनांचे मोठे कारण आहे. किल्ले, दरी -डोंगर, धबधबे, नदी -तलाव याठिकाणी जाऊन निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायला हवा. पण हा आनंद कॅमेराबध्द करण्याची धडपड अनाठायी वाटते. हे दुष्टचक्र आहे. धोकेदायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, हे वेड जीव घेणारे ठरत आहे. असे फोटो काढून ते फेसबूक, व्हॉटस अ‍ॅप अशा समाजमाध्यमांवर टाकले जातात. आपल्या आवडी, छंद जगजाहीर करणे, त्याचे प्रदर्शन करणे आणि त्याला आभासी जगतात पसंती मिळावी, यासाठी ही धडपड असल्याचे दिसून येत आहे. त्यातून अचाट पराक्रम केले जातात आणि ते अंगलट येत असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी तरुणाईचे कुठे तरी प्रबोधन व्हायला हवे. आभासी जग आणि वास्तवातील जग यातील अंतर, फरक त्यांना कळण्यासाठी समाजाकडून प्रयत्न व्हायला हवे, हे प्रकर्षाने जाणवते.

पालकांच्या दुर्लक्षाकडे अंगुलीनिर्देश केला जातो. पण पालकांना पूर्ण दोष देऊन चालणार नाही. पालकांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे. स्वत: पालकांच्या धाकात वाढलेली, त्यामुळे अंगी शिस्त बाणलेली ही पालकांची पिढी एकविसाव्या शतकात पाल्यांना स्वातंत्र्य देण्याच्या भूमिकेपर्यंत आली आहे. आपण नाही मोकळेपणाने जगू शकलो, पण मुलांना तसे जगू देऊया, असा विचार करणारे बहुसंख्य पालक आहेत. पाल्यांचे स्वतंत्र जग आहे, त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात जास्त डोकावू नये, म्हणून आताशा पाल्यांसाठी स्वतंत्र खोल्या आल्या आणि पालकांनी त्यांना स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,याची जाणीव पाल्यांनी ठेवायला हवी. त्यासोबतच पालकांनीदेखील अगदी निर्धास्त राहून चालणार नाही. पाल्याचे मित्र कोण, तो कोणाकडे जातो, त्याच्याकडे कोण येतो, सवयी काय, पैशांचा विनियोग कसा करतो, यासंबंधी किमान चौकस रहायला हवे. लक्ष ठेवायला हवे. ढवळाढवळ नको, पण लक्ष असायला हवे. त्यातून पाल्यांवर नैतिक दडपण राहते. एकंदरीत गोळाबेरीज केली तर परिपक्वता, समंजसपणा आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो, हे लक्षात येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव