शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

असे जीवघेणे साहस कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 21:50 IST

मिलिंद कुलकर्णी जीवन अनमोल आहे, असे आपण म्हणत असलो तरी जीवावर उदार होऊन जेव्हा काही लोक अकारण साहस करतात, ...

मिलिंद कुलकर्णीजीवन अनमोल आहे, असे आपण म्हणत असलो तरी जीवावर उदार होऊन जेव्हा काही लोक अकारण साहस करतात, ते का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. यंदाही गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचा तलाव, नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे.खान्देशकन्या शीतल महाजन ही स्कायडायव्हींगमध्ये विश्वविक्रम करणारी तरुणी आहे. शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेऊन तिने असे अनेक साहसी पराक्रम केले. एखाद्या विषयात पारंगत होऊन धाडस करणे वेगळे आणि अतिआत्मविश्वासाने पराक्रम करायला जाणे वेगळे. असा हा फाजील आत्मविश्वास जीवघेणा ठरतो आणि स्वत:चा जीव गमावण्यासोबत संपूर्ण कुटुंबाला दु:खाच्या खाईत लोटतो, हे कटुसत्य लक्षात घ्यायला हवे.

पावसाळ्यात वर्षा सहलीची मजा काही और असते. यंदा कोरोनामुळे हा आनंद घेता आला नाही. पण तरीही नियमभंग करीत अनेक जण धबधबे, नदी - नाले याठिकाणी गेले. प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, अटकाव करणे शक्य नाही. त्यातून दुर्घटना घडल्या. पाणी बघीतल्यावर त्यात उतरण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. जलतरण तलावात पोहण्याचा सराव असलेली मंडळी उत्साहाने आणि विशेषत: मित्रमंडळींना कसब दाखविण्यासाठी नदी, तलावांमध्ये उतरतात. जलतरण तलावातील स्थिर पाणी, सुरक्षित वातावरण आणि नदी, तलावातील पाणी, खोली यात फरक असतो. कुठे डोह असतो, कुठे भोवरा असतो, त्याचा अंदाज नसल्याने दुर्घटना घडतात. एक जण बुडायला लागला की, त्याचे मित्र, सहकारी त्याला वाचवायला जातात आणि तेदेखील बुडतात. पुरेशी काळजी न घेता, खबरदारी न घेता केलेले हे साहस अंगलट येते आणि कुटुंबाला अंधाराच्या खाईत ढकलते.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी फरशी पुलांवरुन पुराचे पाणी वाहते. मोठे पूल नसल्याने असा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतो. त्यामुळे फरशी पुलावरुन पाणी कमी होण्याची वाट पाहायला हवी. अनेक जण तसे करतात. परंतु, काहींना भलतीच घाई झालेली असते तर काहींना आपल्या धाडसीवृत्तीचा परिचय करुन द्यायचा असतो. त्यातून दुर्घटना घडतात. संयम हा खूप महत्त्वाचा असतो, हे अशा घटनांमधून कळते.

मोबाईलद्वारे घेतली जाणारी सेल्फी हे देखील दुर्घटनांचे मोठे कारण आहे. किल्ले, दरी -डोंगर, धबधबे, नदी -तलाव याठिकाणी जाऊन निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायला हवा. पण हा आनंद कॅमेराबध्द करण्याची धडपड अनाठायी वाटते. हे दुष्टचक्र आहे. धोकेदायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, हे वेड जीव घेणारे ठरत आहे. असे फोटो काढून ते फेसबूक, व्हॉटस अ‍ॅप अशा समाजमाध्यमांवर टाकले जातात. आपल्या आवडी, छंद जगजाहीर करणे, त्याचे प्रदर्शन करणे आणि त्याला आभासी जगतात पसंती मिळावी, यासाठी ही धडपड असल्याचे दिसून येत आहे. त्यातून अचाट पराक्रम केले जातात आणि ते अंगलट येत असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी तरुणाईचे कुठे तरी प्रबोधन व्हायला हवे. आभासी जग आणि वास्तवातील जग यातील अंतर, फरक त्यांना कळण्यासाठी समाजाकडून प्रयत्न व्हायला हवे, हे प्रकर्षाने जाणवते.

पालकांच्या दुर्लक्षाकडे अंगुलीनिर्देश केला जातो. पण पालकांना पूर्ण दोष देऊन चालणार नाही. पालकांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे. स्वत: पालकांच्या धाकात वाढलेली, त्यामुळे अंगी शिस्त बाणलेली ही पालकांची पिढी एकविसाव्या शतकात पाल्यांना स्वातंत्र्य देण्याच्या भूमिकेपर्यंत आली आहे. आपण नाही मोकळेपणाने जगू शकलो, पण मुलांना तसे जगू देऊया, असा विचार करणारे बहुसंख्य पालक आहेत. पाल्यांचे स्वतंत्र जग आहे, त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात जास्त डोकावू नये, म्हणून आताशा पाल्यांसाठी स्वतंत्र खोल्या आल्या आणि पालकांनी त्यांना स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,याची जाणीव पाल्यांनी ठेवायला हवी. त्यासोबतच पालकांनीदेखील अगदी निर्धास्त राहून चालणार नाही. पाल्याचे मित्र कोण, तो कोणाकडे जातो, त्याच्याकडे कोण येतो, सवयी काय, पैशांचा विनियोग कसा करतो, यासंबंधी किमान चौकस रहायला हवे. लक्ष ठेवायला हवे. ढवळाढवळ नको, पण लक्ष असायला हवे. त्यातून पाल्यांवर नैतिक दडपण राहते. एकंदरीत गोळाबेरीज केली तर परिपक्वता, समंजसपणा आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो, हे लक्षात येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव