शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

असे जीवघेणे साहस कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 21:50 IST

मिलिंद कुलकर्णी जीवन अनमोल आहे, असे आपण म्हणत असलो तरी जीवावर उदार होऊन जेव्हा काही लोक अकारण साहस करतात, ...

मिलिंद कुलकर्णीजीवन अनमोल आहे, असे आपण म्हणत असलो तरी जीवावर उदार होऊन जेव्हा काही लोक अकारण साहस करतात, ते का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. यंदाही गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचा तलाव, नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे.खान्देशकन्या शीतल महाजन ही स्कायडायव्हींगमध्ये विश्वविक्रम करणारी तरुणी आहे. शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेऊन तिने असे अनेक साहसी पराक्रम केले. एखाद्या विषयात पारंगत होऊन धाडस करणे वेगळे आणि अतिआत्मविश्वासाने पराक्रम करायला जाणे वेगळे. असा हा फाजील आत्मविश्वास जीवघेणा ठरतो आणि स्वत:चा जीव गमावण्यासोबत संपूर्ण कुटुंबाला दु:खाच्या खाईत लोटतो, हे कटुसत्य लक्षात घ्यायला हवे.

पावसाळ्यात वर्षा सहलीची मजा काही और असते. यंदा कोरोनामुळे हा आनंद घेता आला नाही. पण तरीही नियमभंग करीत अनेक जण धबधबे, नदी - नाले याठिकाणी गेले. प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, अटकाव करणे शक्य नाही. त्यातून दुर्घटना घडल्या. पाणी बघीतल्यावर त्यात उतरण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. जलतरण तलावात पोहण्याचा सराव असलेली मंडळी उत्साहाने आणि विशेषत: मित्रमंडळींना कसब दाखविण्यासाठी नदी, तलावांमध्ये उतरतात. जलतरण तलावातील स्थिर पाणी, सुरक्षित वातावरण आणि नदी, तलावातील पाणी, खोली यात फरक असतो. कुठे डोह असतो, कुठे भोवरा असतो, त्याचा अंदाज नसल्याने दुर्घटना घडतात. एक जण बुडायला लागला की, त्याचे मित्र, सहकारी त्याला वाचवायला जातात आणि तेदेखील बुडतात. पुरेशी काळजी न घेता, खबरदारी न घेता केलेले हे साहस अंगलट येते आणि कुटुंबाला अंधाराच्या खाईत ढकलते.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी फरशी पुलांवरुन पुराचे पाणी वाहते. मोठे पूल नसल्याने असा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतो. त्यामुळे फरशी पुलावरुन पाणी कमी होण्याची वाट पाहायला हवी. अनेक जण तसे करतात. परंतु, काहींना भलतीच घाई झालेली असते तर काहींना आपल्या धाडसीवृत्तीचा परिचय करुन द्यायचा असतो. त्यातून दुर्घटना घडतात. संयम हा खूप महत्त्वाचा असतो, हे अशा घटनांमधून कळते.

मोबाईलद्वारे घेतली जाणारी सेल्फी हे देखील दुर्घटनांचे मोठे कारण आहे. किल्ले, दरी -डोंगर, धबधबे, नदी -तलाव याठिकाणी जाऊन निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायला हवा. पण हा आनंद कॅमेराबध्द करण्याची धडपड अनाठायी वाटते. हे दुष्टचक्र आहे. धोकेदायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, हे वेड जीव घेणारे ठरत आहे. असे फोटो काढून ते फेसबूक, व्हॉटस अ‍ॅप अशा समाजमाध्यमांवर टाकले जातात. आपल्या आवडी, छंद जगजाहीर करणे, त्याचे प्रदर्शन करणे आणि त्याला आभासी जगतात पसंती मिळावी, यासाठी ही धडपड असल्याचे दिसून येत आहे. त्यातून अचाट पराक्रम केले जातात आणि ते अंगलट येत असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी तरुणाईचे कुठे तरी प्रबोधन व्हायला हवे. आभासी जग आणि वास्तवातील जग यातील अंतर, फरक त्यांना कळण्यासाठी समाजाकडून प्रयत्न व्हायला हवे, हे प्रकर्षाने जाणवते.

पालकांच्या दुर्लक्षाकडे अंगुलीनिर्देश केला जातो. पण पालकांना पूर्ण दोष देऊन चालणार नाही. पालकांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे. स्वत: पालकांच्या धाकात वाढलेली, त्यामुळे अंगी शिस्त बाणलेली ही पालकांची पिढी एकविसाव्या शतकात पाल्यांना स्वातंत्र्य देण्याच्या भूमिकेपर्यंत आली आहे. आपण नाही मोकळेपणाने जगू शकलो, पण मुलांना तसे जगू देऊया, असा विचार करणारे बहुसंख्य पालक आहेत. पाल्यांचे स्वतंत्र जग आहे, त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात जास्त डोकावू नये, म्हणून आताशा पाल्यांसाठी स्वतंत्र खोल्या आल्या आणि पालकांनी त्यांना स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,याची जाणीव पाल्यांनी ठेवायला हवी. त्यासोबतच पालकांनीदेखील अगदी निर्धास्त राहून चालणार नाही. पाल्याचे मित्र कोण, तो कोणाकडे जातो, त्याच्याकडे कोण येतो, सवयी काय, पैशांचा विनियोग कसा करतो, यासंबंधी किमान चौकस रहायला हवे. लक्ष ठेवायला हवे. ढवळाढवळ नको, पण लक्ष असायला हवे. त्यातून पाल्यांवर नैतिक दडपण राहते. एकंदरीत गोळाबेरीज केली तर परिपक्वता, समंजसपणा आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो, हे लक्षात येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव