शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अध्यात्माचा विसर का पडतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:54 PM

मिलिंद कुलकर्णी धर्म, अध्यात्म किंवा धार्मिक आणि अध्यात्मिक या संकल्पनांविषयी समाजजीवनात संभ्रमाचे वातावरण दिसते. धर्म म्हणजे काय, अध्यात्म कोणते ...

मिलिंद कुलकर्णीधर्म, अध्यात्म किंवा धार्मिक आणि अध्यात्मिक या संकल्पनांविषयी समाजजीवनात संभ्रमाचे वातावरण दिसते. धर्म म्हणजे काय, अध्यात्म कोणते याची व्याख्या, विवेचन अनेकांनी केलेले आहे. पण दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करताना गल्लत होताना दिसतेय. लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या माध्यमांकडून देखील अशीच कृती होताना दिसत आहे. यासंबंधी विचारमंथन करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या जगातील सर्वात मोठ्या अध्यात्मिक संस्थेने राजस्थानातील माऊंट अबू येथे राष्टÑीय संमेलन घेतले. त्यात सहभागी झाल्यानंतर देशभरातील विविध पत्रकारांच्या भूमिका समजून घेता आल्या.एकीकडे केवळ अध्यात्म हा एकमेव विषय घेऊन चालणाऱ्या दूरचित्रवाहिन्या आहेत, दुसरीकडे वाचकांची मागणी असल्याने वर्तमानपत्रात दैनंदिन स्वरुपात अध्यात्माविषयी मजकूर दिला जात आहे. त्यासोबत हिंसक घटना, गुन्हेगारी कृत्ये याविषयी वेगवेगळे कार्यक्रम, कथा सादर करणाºया वाहिन्या आणि मुद्रित माध्यमे आहेत. अध्यात्म व गुन्हेगारीविषयक दिवसभर चालणारे कार्यक्रम असो की, ठराविक जागेत येणारा मजकूर असो..दोघांनाही चांगला श्रोता वा वाचक वर्ग आहे. वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, संस्था, प्रवचनकार, कीर्तनकार हे रसाळ भाषेतून अध्यात्म उलगडून सांगत आहेत. बोजड भाषेतील तत्त्वज्ञानापेक्षा रसाळ भाषेतील भावार्थ लोकांना आवडतो, समजतो. जीवनातील, संसारातील छोट्या छोट्या उदाहरणांवरुन ते अध्यात्मातील संकल्पना लोकांना उलगडून सांगतात, तेव्हा हे अध्यात्म पुस्तकी वाटत नाही, जवळचे वाटते.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयासारख्या अध्यात्मिक संस्था आणखी पुढचा विचार करताना दिसत आहेत. अध्यात्माचा प्रचार, प्रसार करीत असताना प्रत्येक घटकाने त्याच्या दैनंदिन जीवनात अध्यात्माचा अंगिकार करायला हवा. उक्ती आणि कृतीमध्ये समानता दिसायला हवी, तरच लोकांना त्या घटकावर विश्वास बसतो. पत्रकारांनी वार्तांकन करताना नकारात्मक बाबींना महत्त्व न देता सकारात्मक गोष्टींवर भर द्यायला हवा. संमेलनात झालेल्या चर्चेनुसार, गुन्हेगारी किंवा हिंसक कृत्यांची संख्या सुमारे ५ ते १० टक्के असावी. परंतु, त्या घटनांची प्रसारमाध्यमांवरील व्याप्ती ही ८० ते ९० टक्कयांवर असते. दूरचित्रवाहिन्यांवरील ठळक बातम्यांमध्ये त्याचे प्रत्यंतर आपल्याला येते. अर्थात अलिकडे बदल होऊ लागला आहे. बहुसंख्य वर्तमानपत्रे आता मुखपृष्ठावर अपघात, खून अशा घटनांची छायाचित्रे प्रसिध्द करीत नाहीत. सकारात्मक बातम्या देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. या उपक्रमांचे लोक स्वागत देखील करतात.कोणताही धर्म हा हिंसा शिकवत नाही. सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय अशाच कथा, प्रसंग आपल्या बहुसंख्य धर्मग्रंथांमध्ये दिसून येतील. परस्परांचा द्वेष करु नका, असे धर्मसंस्थापक सांगताना दिसतात. मग जगभर धर्मा-धर्मांमध्ये वाद का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. धर्मातील अध्यात्मिक मूल्याकडे झालेले दुर्लक्ष याला कारणीभूत आहे, असे मला वाटते. आम्ही सोयीचे तेवढे तत्त्वज्ञान उचलतो, तेच घेऊन भूमिका बनवितो. त्यातून हे संघर्ष उभे राहतात. अशा स्थितीत लोकशाहीच्या चारही स्तंभांनी तारतम्य भाव ठेवून कर्तव्यपालन केले तर हे प्रसंग टाळता येऊ शकतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव