शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

लोकशाहीचे चारही स्तंभ 'पंचप्राणा'च्या मूल्यांसाठी एकसाथ काम का करीत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 11:25 IST

अद्यापही काही टप्पे गाठावे लागतील. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंचप्राण (पंचसूत्री) मांडली आहे. तशी ती नवीन नाही. पहिल्या चार सूत्रांसाठी प्रत्येकाने नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे.

सर्वांना अभिमान वाटावा असा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाने तर वातावरण उत्साहित झाले होते. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून  भाषण करतात. त्यातून देशाच्या वाटचालीची दिशा स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषणही अमृतमहोत्सवी होते. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्याची घोषणा संसदेत १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री करताना हा नियतीशी केलेला करार आहे, असे म्हटले होते. त्यावेळी मांडलेली भूमिका कमी-अधिक का असेना यशस्वीपणे राबविण्यात आपण मोठी मजल मारली आहे.

अद्यापही काही टप्पे गाठावे लागतील. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंचप्राण (पंचसूत्री) मांडली आहे. तशी ती नवीन नाही. पहिल्या चार सूत्रांसाठी प्रत्येकाने नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे. पाचवे सूत्रही महत्त्वाचे आहे. त्यात स्वत: पंतप्रधान, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि नागरिकांचा समावेश अपेक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणे, कोणाच्या मनात गुलामीचा अंश असता कामा नये, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान, विविधतेतील एकता जपणे या चार सूत्रांचा त्यांनी उल्लेख केला आहे.  मात्र जात-धर्म, समाज घटक म्हणून इतरांचे शोषण करण्यासाठी गुलामी लादण्याचा अंशच जर भारतीयांच्या मनात आजही खोलवर रुजला असेल तर त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे.

यासाठी जात-धर्म किंवा गरीब-श्रीमंतच्या भेदातून गुलामीचा अंश राहणार नाही, याचा पाठपुरावा सरकारच्या धोरणातूनच वारंवार व्यक्त झाला पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतानादेखील तसे वातावरण आपण निर्माण करू शकलो आहोत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. वैभवशाली वारसा खूपच मोठा आहे. कारण हा देश गौतम बुद्धांचा आणि भगवान महावीर यांच्या तत्त्वज्ञानाला जन्म देणारा आहे. अहिंसेचे शस्त्र बनवून स्वातंत्र्य मिळवणारा पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. हा वारसाच आपली शक्ती आहे. विविधतेतील एकतेचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आहे. एकाच देशात एवढी विविधता सापडणे अशक्य आहे. ती विविधता भाषेत आहे, पेहरावात आहे, खाद्यसंस्कृतीत आहे, संगीत-गायनात आहे, राहणीमानात आहे.

तिची जपणूक करणेसुद्धा जागतिकीकरणात आव्हान आहे.  शेकडो-हजारो वर्षांची परंपरा निर्माण होणे, त्यातून मानवी मूल्यांना आकार देणे, ही सोपी गोष्ट नाही. तिची जपणूक प्राणपणाने केली पाहिजेच. पाचवे सूत्र सांगताना पंतप्रधान म्हणतात की, नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. त्यात पंतप्रधान आणि सर्वच मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल असे ते मानतात. मात्र सध्याची भ्रष्ट, गैरव्यवहार आणि शोषणाचे अंश असणारी व्यवस्था पाहून मनात प्रश्न निर्माण होतो.

शिक्षणाचा बाजार, पैशाचा बाजार, सेवेचा बाजार पाहता भ्रष्ट मार्गाने संपत्तीप्रधान  होणे गैर वाटू नये असा आदर्श समाजात निर्माण कसा होतो?  अन्याय, अत्याचार आणि शोषण याला पायबंद घालणारे कमकुवत कसे ठरतात?  लोकशाहीचे चारही स्तंभ या पंचप्राणाच्या मूल्यांच्या जपवणुकीसाठी एकसाथ काम का करीत नाहीत? त्यांच्यामध्ये अविश्वासाचे वातावरण का निर्माण झाले आहे, याचाही यानिमित्त विचार व्हायला हवा. भारताला अशा पंचप्राणांची (पंचसूत्री) फार गरज आहे. मात्र वास्तव वेगळे दिसते आहे. विविध राज्यांत सरकारे पडताना आणि पुन्हा उभी राहताना जो व्यवहार होतो तो पारदर्शी असतो का?

आपली न्याय व्यवस्था सर्वांना न्यायदान करण्यास पुरेशी पडते आहे का? माध्यमे आपली जबाबदारी पार पाडत आहेत का? आदी बाबींचा फेरविचार करून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार पुढील २५ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती साधायची असेल तर कटिबद्ध व्हायला हवे. आजवरच्या सर्वच सरकारांनी किंबहुना पंतप्रधानांनी भारतीय वारसा जपून विकासाचा प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न अपुरे पडले हे मान्य करावे लागेल. त्यावर आता मार्ग काढण्यासाठी या पंचप्राणांचा स्वीकार करून तसे वर्तन करणे आणि आपले कर्तव्य पार पाडणे प्रत्येकाची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची  ऊर्मी यानिमित्ताने मिळो !

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन