शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

गांधी नावाच्या ‘ग्लोबल ब्रॅण्ड’चा मेकओव्हर कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 07:28 IST

१२०० कोटी खर्चून साबरमती आश्रमाचा ‘कायापालट’ करण्याचा घाट सरकारने घातला आहे. या ‘वर्ल्डक्लास टुरिझम सेंटर’ची आज गरज आहे, की गांधी-विचारांची?

- नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, औरंगाबाद

मोहन करमचंद गांधी हे जगातलं आठवं आश्चर्य मानायला हरकत नाही. एकविसावं शतक अर्ध्यावर आलं तरी गांधी नावाच्या माणसाचं गारूड आजही कायम आहे. जगाच्या पाठीवर असा एकही देश नसेल जिथं गांधी पोहोचलेले नाहीत. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते शी जिनपिंग, शिन्जो आबे यांच्यापर्यंत जगातील महासत्तांचे राष्ट्रप्रमुख ज्या-ज्या वेळी भारत भेटीवर येतात तेव्हा त्यांच्या कार्यक्रमात ‘गांधीभेट’ ठरलेली असते. मग कोणी दिल्लीतील राजघाटावरील बापूंच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करतात, तर कोणी अहमदाबादेतील साबरमती आश्रमाला भेट देतात. बापूंचा चरखा तर अनेकांसाठी नवलाईची गोष्ट. या चरख्यातून निघालेल्या धाग्याने मानवतेची निरगाठ बांधली. दोन काडीच्या चष्म्यानं संपूर्ण मानवजातीला सहिष्णुतेची दृष्टी दिली आणि अंगावरच्या वीतभर पंचानं साधेपणाची शिकवण. चरखा, चष्मा, पंचा या केवळ बापूंच्या वस्तू नाहीत, तर एका व्रतस्थ फकिरानं स्वीकारलेल्या स्वावलंबी जीवनशैलीची प्रतीकं आहेत. 

साबरमतीचा आश्रम तर साक्षात मानवतेचं मंदिर! अंगभर कपडेही नसलेल्या एका नि:शस्त्र माणसानं बलाढ्य अशा ब्रिटिशांशी लढा दिला, यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही; पण बापूंकडं ‘अहिंसा’ नावाचं ब्रह्मास्त्र होतं, ३३ कोटी लोकांचं पाठबळ होतं. गांधींचा कोणता पंथ नाही, पक्ष नाही की संप्रदाय! पण ‘गांधीवाद’ नावानं ओळखलं जाणारं तत्त्वज्ञान जगभरातल्या विद्यापीठांतून शिकवलं जातं आणि या गांधीविचारानं भारलेली लाखो माणसं दरवर्षी साबरमती आश्रमाला भेट देतात. बापू आणि बा(कस्तुरबा) यांचं निवासस्थान राहिलेल्या ‘हृदयकुंज’चं मनोभावे दर्शन घेतात. याच आश्रमाच्या परिसरात १९६० साली बांधलेल्या संग्रहालयात बापूंशी संबंधित अनेक वस्तू जतन केल्या आहेत. या आश्रमात विनासायास कोणालाही प्रवेश मिळतो. शाळकरी मुलं बापूंच्या वस्तूंना स्पर्श करून या महात्म्याच्या अलौकिकत्वाची अनुभूती घेतात.

बापूंच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या साबरमती आश्रमाचा ‘मेकओव्हर’ करण्याचा निर्णय आता सरकारनं घेतला आहे. सुमारे १२०० कोटी रुपयांचा ‘गांधी आश्रम स्मारक आणि परिसर विकास प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साबरमती आश्रमाचे ‘वर्ल्डक्लास टुरिझम सेंटर’मध्ये परिवर्तन करण्याचा सरकारचा मानस आहे. यात अर्थातच, व्हीआयपींसाठी खास व्यवस्था असणार आणि पासशिवाय कोणालाही प्रवेश नसणार. म्हणूनच, या प्रकल्पाला राजमोहन गांधी यांच्यासह आनंद पटवर्धन, रावसाहेब कसबे, रामचंद्र गुहा, अरुणा रॉय, न्या. ए.पी. शहा आदी नामांकित मंडळींनी आक्षेप घेतला आहे. या बुद्धिवाद्यांच्या आक्षेपाचा मुद्दा असा की, अत्यंत साधेपणानं आयुष्य जगलेल्या या महात्म्याच्या स्मृतिस्थळाचं पर्यटनाच्या नावाखाली बाजारीकरण करणं योग्य नाही. जगभरातील गांधीप्रेमी आज लाखोंच्या संख्येनं साबरमती आश्रमाला भेट देत असताना पर्यटनवृद्धीसाठी या ऐतिहासिक स्मारकाचं मनोरंजन पार्कमध्ये रूपांतर करणं म्हणजे एक प्रकारे गांधीविचारांची प्रतारणा ठरेल. सत्य, अहिंसा आणि साधेपणा ही गांधीजींच्या जीवनाची त्रिसूत्री होती. मात्र, या प्रकल्पाच्या माध्यमातून साबरमती आश्रम नावाच्या या मानवतेच्या मंदिराचे काँक्रिटीकरण होणार असेल, तर त्यास कडाडून विरोध केला पाहिजे. - तसाही या सरकारला स्मारकं आणि भव्यतेचा भारी सोस. सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारला. आता गांधींच्या नावानं एका ‘इव्हेंट’ची तयारी सुरू आहे. त्यासाठी साबरमती आश्रमासारखी दुसरी जागा कोणती असू शकते?Nandu.patil@lokmat.com

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी