शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

गांधी नावाच्या ‘ग्लोबल ब्रॅण्ड’चा मेकओव्हर कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 07:28 IST

१२०० कोटी खर्चून साबरमती आश्रमाचा ‘कायापालट’ करण्याचा घाट सरकारने घातला आहे. या ‘वर्ल्डक्लास टुरिझम सेंटर’ची आज गरज आहे, की गांधी-विचारांची?

- नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, औरंगाबाद

मोहन करमचंद गांधी हे जगातलं आठवं आश्चर्य मानायला हरकत नाही. एकविसावं शतक अर्ध्यावर आलं तरी गांधी नावाच्या माणसाचं गारूड आजही कायम आहे. जगाच्या पाठीवर असा एकही देश नसेल जिथं गांधी पोहोचलेले नाहीत. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते शी जिनपिंग, शिन्जो आबे यांच्यापर्यंत जगातील महासत्तांचे राष्ट्रप्रमुख ज्या-ज्या वेळी भारत भेटीवर येतात तेव्हा त्यांच्या कार्यक्रमात ‘गांधीभेट’ ठरलेली असते. मग कोणी दिल्लीतील राजघाटावरील बापूंच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करतात, तर कोणी अहमदाबादेतील साबरमती आश्रमाला भेट देतात. बापूंचा चरखा तर अनेकांसाठी नवलाईची गोष्ट. या चरख्यातून निघालेल्या धाग्याने मानवतेची निरगाठ बांधली. दोन काडीच्या चष्म्यानं संपूर्ण मानवजातीला सहिष्णुतेची दृष्टी दिली आणि अंगावरच्या वीतभर पंचानं साधेपणाची शिकवण. चरखा, चष्मा, पंचा या केवळ बापूंच्या वस्तू नाहीत, तर एका व्रतस्थ फकिरानं स्वीकारलेल्या स्वावलंबी जीवनशैलीची प्रतीकं आहेत. 

साबरमतीचा आश्रम तर साक्षात मानवतेचं मंदिर! अंगभर कपडेही नसलेल्या एका नि:शस्त्र माणसानं बलाढ्य अशा ब्रिटिशांशी लढा दिला, यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही; पण बापूंकडं ‘अहिंसा’ नावाचं ब्रह्मास्त्र होतं, ३३ कोटी लोकांचं पाठबळ होतं. गांधींचा कोणता पंथ नाही, पक्ष नाही की संप्रदाय! पण ‘गांधीवाद’ नावानं ओळखलं जाणारं तत्त्वज्ञान जगभरातल्या विद्यापीठांतून शिकवलं जातं आणि या गांधीविचारानं भारलेली लाखो माणसं दरवर्षी साबरमती आश्रमाला भेट देतात. बापू आणि बा(कस्तुरबा) यांचं निवासस्थान राहिलेल्या ‘हृदयकुंज’चं मनोभावे दर्शन घेतात. याच आश्रमाच्या परिसरात १९६० साली बांधलेल्या संग्रहालयात बापूंशी संबंधित अनेक वस्तू जतन केल्या आहेत. या आश्रमात विनासायास कोणालाही प्रवेश मिळतो. शाळकरी मुलं बापूंच्या वस्तूंना स्पर्श करून या महात्म्याच्या अलौकिकत्वाची अनुभूती घेतात.

बापूंच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या साबरमती आश्रमाचा ‘मेकओव्हर’ करण्याचा निर्णय आता सरकारनं घेतला आहे. सुमारे १२०० कोटी रुपयांचा ‘गांधी आश्रम स्मारक आणि परिसर विकास प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साबरमती आश्रमाचे ‘वर्ल्डक्लास टुरिझम सेंटर’मध्ये परिवर्तन करण्याचा सरकारचा मानस आहे. यात अर्थातच, व्हीआयपींसाठी खास व्यवस्था असणार आणि पासशिवाय कोणालाही प्रवेश नसणार. म्हणूनच, या प्रकल्पाला राजमोहन गांधी यांच्यासह आनंद पटवर्धन, रावसाहेब कसबे, रामचंद्र गुहा, अरुणा रॉय, न्या. ए.पी. शहा आदी नामांकित मंडळींनी आक्षेप घेतला आहे. या बुद्धिवाद्यांच्या आक्षेपाचा मुद्दा असा की, अत्यंत साधेपणानं आयुष्य जगलेल्या या महात्म्याच्या स्मृतिस्थळाचं पर्यटनाच्या नावाखाली बाजारीकरण करणं योग्य नाही. जगभरातील गांधीप्रेमी आज लाखोंच्या संख्येनं साबरमती आश्रमाला भेट देत असताना पर्यटनवृद्धीसाठी या ऐतिहासिक स्मारकाचं मनोरंजन पार्कमध्ये रूपांतर करणं म्हणजे एक प्रकारे गांधीविचारांची प्रतारणा ठरेल. सत्य, अहिंसा आणि साधेपणा ही गांधीजींच्या जीवनाची त्रिसूत्री होती. मात्र, या प्रकल्पाच्या माध्यमातून साबरमती आश्रम नावाच्या या मानवतेच्या मंदिराचे काँक्रिटीकरण होणार असेल, तर त्यास कडाडून विरोध केला पाहिजे. - तसाही या सरकारला स्मारकं आणि भव्यतेचा भारी सोस. सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारला. आता गांधींच्या नावानं एका ‘इव्हेंट’ची तयारी सुरू आहे. त्यासाठी साबरमती आश्रमासारखी दुसरी जागा कोणती असू शकते?Nandu.patil@lokmat.com

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी