शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

अकोल्यातील काँग्रेस एवढी मागे का पडतेय?

By किरण अग्रवाल | Updated: April 10, 2022 11:59 IST

Why is the Congress in Akola lagging behind? : अकोला महापालिकेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, पण येथल्या काँग्रेसला लोकमानस घडविता येत नाहीये.

- किरण अग्रवाल

एकीकडे उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना, दुसरीकडे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. सोमय्यांचा निषेध, तसेच पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त होत असताना, सामान्यांच्या प्रश्नावर मात्र तितकीशी आक्रमकता दिसत नाही. विशेषत: केंद्राच्या अखत्यारीतील व अकोला महापालिकेशीही संबंधित अनेक प्रश्न आहेत, पण येथल्या काँग्रेसला लोकमानस घडविता येत नाहीये.

अकोला महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खोळंबलेल्या निवडणुका नेमक्या कधी होतील, याची निश्चिती नसली, तरी उन्हाच्या चटक्याप्रमाणे राजकारणही तापू लागले आहे. मतदारांच्या पुढ्यात जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धावाधाव सुरू झाली असताना, काँग्रेसमधील स्थिती मात्र जोश हरवल्यासारखीच दिसत असल्याने, या पक्षाच्या अजेंड्यावर महापालिका निवडणूक आहे की नाही, असाच प्रश्न पडावा.

एप्रिलच्या प्रारंभातच वऱ्हाडची भूमी तापू लागली असून, अकोल्याने तापमानाचा जागतिक उच्चांक नोंदविला आहे. याचबरोबरीने येथील राजकारणही आता तापायला लागले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडखळल्या आहेत खऱ्या, पण तारखांची वाट न पाहता, सारे पक्ष सक्रिय झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर या पक्षातील नेत्यांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली होती, परंतु शिव संवाद अभियानात खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने गोपीकिशन बाजोरिया व नितीन देशमुख यांना साखर भरवून त्यांच्यातील वाद प्रथमदर्शनी तरी मिटविण्यात आला आहे. अर्थात, हातात असलेला विजय डोळ्यादेखत पक्षांतर्गत कलहामुळे गमावून बसण्याचे दुःख पचविण्यास अवघडच असते, त्यामुळे हे शिवबंधन किती टिकते, याबद्दल शंकाच घेतल्या जात आहेत, पण तसे असले, तरी किरीट सोमय्या यांचा निषेध करण्याच्या निमित्ताने सारी शिवसेना एकवटून जागोजागी रस्त्यावर उतरलेली दिसून आली. शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमकपणे पुढे येतेय, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे काय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात राज्यभर महागाईच्या निषेधासाठी सप्ताह पाळण्याचे नियोजन केले होते, यात केवळ हजेरी लावण्याखेरीज अकोल्यातील आंदोलन प्रभावकारी ठरू शकले नाही. नेत्यांचीच गर्दी झाली, कार्यकर्त्यांचा पत्ताच नाही, असे या पक्षातील सध्याचे वास्तव आहे. मागे पक्षातर्फे ‘भारत बंद’चे आवाहन केले गेले असता, ज्या अकोल्यात खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना भाऊंनी एक रॅली काढली होती, त्याच शहरात आज या पक्षाला आंदोलनासाठी कार्यकर्ते मिळत नाहीत. युवक काँग्रेसचे पदाधिकारी यंदा मतदानाने निवडले गेले, त्यामुळे त्यांच्या निवडीचा जल्लोष झाला, पण नंतर या पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी काही आंदोलने छेडल्याचे अभावानेच दिसून आले.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या मर्जीतील म्हणून अशोक मानकर यांना काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नेमले गेल्यावर, राजकीय पार्श्वभूमी नसलेला नवीन चेहरा म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले गेले, पण अल्पावधीतच त्यांनाही गटातटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. अजून वर्षही झाले नाही, पण त्यांना बदलण्यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत. त्यांनी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीला म्हणजे, त्यांच्या कार्यकारणीलाही एक-दोनदा नव्हे, तर तीन वेळा प्रदेशकडून स्थगिती मिळाली, यावरून या पक्षात कान भरणाऱ्यांचे किती फावले आहे, ते लक्षात यावे.

महिलांनी प्रदेश स्तरीय परिषद अकोल्यात घेतली, पण युथ व फादर काँग्रेसला तेवढी संघटन शक्ती दाखविता आली नाही. अलीकडेच नजीकच्या शेगाव येथे ओबीसी प्रश्नावर परिषद घेतली गेली. त्यास छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहिले. ते अकोल्यातच विमानाने उतरून रस्तामार्गे शेगावला गेले, पण त्याही संधीचे सोने अकोलेकरांना करता आले नाही. वरून आलेला कार्यक्रम राबविण्याखेरीज स्वतःच्या मर्जीने स्थानिक पातळीवर काही केले जाताना फारसे दिसतच नाही. अशा स्थितीत महापालिकेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढणार, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यास पडला असेल, तर तो गैर ठरू नये. विशेष म्हणजे, पटोले अतिशय आक्रमकपणे सत्तेतील सहकारी पक्षांनाही अंगावर घेण्याचे धाडस दाखवत असताना, त्यांचे शिलेदार असे निवडणुकीच्या तोंडावरही स्वस्थ कसे, असाही प्रश्न उपस्थित होणारा आहे.

सारांशात, सक्षम नेतृत्वाअभावी अकोल्यात काँग्रेस मागे पडताना दिसत आहे. ज्या काळात सामान्यांच्या प्रश्नावर रान पेटवून लोकमानसात पक्षाची प्रतिमा मजबूत करायची, त्या काळात जिल्हाध्यक्ष विरुद्धची धुसफूस वाढीस लागलेली दिसून यावी, हे आपल्याच हातून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे ठरावे.